शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमी अद्यापही उपेक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 22:50 IST

विसाव्या शतकातील लोककलेने रसिकांच्या आश्रयावर श्रीमंती मिळविली. मनोरंजनासोबत तिने समाज प्रबोधन केले. पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीने लोकाश्रय प्राप्त केला. पण राजाश्रय न मिळाल्यामुळे उपेक्षितच असल्याची खंत प्रसिद्ध सिनेकलावंत मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देमकरंद अनासपुरे यांची खंत : विसापुरात आयोजित नाट्यप्रयोगप्रसंगी ‘लोकमत’शी संवाद

अनेकश्वर मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : विसाव्या शतकातील लोककलेने रसिकांच्या आश्रयावर श्रीमंती मिळविली. मनोरंजनासोबत तिने समाज प्रबोधन केले. पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीने लोकाश्रय प्राप्त केला. पण राजाश्रय न मिळाल्यामुळे उपेक्षितच असल्याची खंत प्रसिद्ध सिनेकलावंत मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली.विसापूरात संत रविदास मंडळाने संजय ठाकरे लिखित रंगकर्मी रंगभूमीमार्फत ‘बाळा जगू कशी तुज्याविना’ हा नाट्यप्रयोग झाला. यानिमित्ताने आले होते. दरम्यान, त्यांनी ‘लोकमत’शी बातचित करताना ही खंत व्यक्त केली.मराठी रंगभूमी व झाडीपट्टी रंगभूमी यामध्ये नेमकी तफावत काय? यावर विचार मांडताना मकरंद अनासपुरे म्हणाले, मराठी रंगभूमीचे नाटक प्रायोजकांपुरते चालते. झाडीपट्टी रंगभूमीचे मात्र तसे नाही. झाडीपट्टीला लोककलेचा समृद्ध व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या भागातील रसिकांनी तो जपला आहे. ही लोकाश्रयाची ताकद आहे. झाडीपट्टी रंगभूमीचा प्रवास प्रतिथयश वाटचालीकडे असून मराठी रंगभूमीप्रमाणे झाडीपट्टी रंगभूमीला राजाश्रय मिळणे गरजेचे आहे. झाडीपट्टी रंगभूमीचे नाटक आशय विषयाची अपूवार्ही वैशिष्ट्य आहे. म्हणूनच रसिकराज येथील रंगभूमीला आपलेसे करतात.आपण झाडीपट्टी रंगभूमीच्या नाटकातील भूमिका साकारताना कसे वाटते, यावर धीरगंभीर आवाजात मकरंद अनासपुरे म्हणाले, विदर्भाच्या झाडीपट्टी रंगभूमीने नाट्यसंपदा जपली. नेपथ्य, प्रकाश, संगीताचे तंत्र प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आहे. कलावंतांच्या संवादातून सामाजिक बांधिलकीचा संदेश, प्रबोधनात्मक नाट्यप्रयोग पे्रक्षकांना आवडतात. म्हणून येथील नाटकाला रसिकांची दिवस उजाडेपर्यंतची गर्दी झाडीपट्टी रंगभूमीसाठी अभिमानास्पद आहे. मीच नाही तर अनेक सिनेकलावंतांनी झाडीपट्टी रंगभूमीवर अलोट प्रेमाचा वर्षाव केला आहे, असेही मकरचंद अनासपुरे म्हणाले.लोककलेला रसिकांचे पाठबळविदर्भातील वडसा (देसाईगंज), नवरगाव, सिंदेवाही या भागात जवळपास ५५ ते ६० नाट्यमंडळे असून, रंगभूमीला गौरवशाली करणारी हीच मंडळे आहेत. नोव्हेंबरपासून मार्च महिन्यापर्यंत गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर व वर्धा जिल्ह्याचा सीमावर्ती भाग झाडीपट्टी रंगभूमीने व्यापलेला असतो. झाडीपट्टी रंगभूमीचा नाट्यप्रपंच ग्रामीण भागातील कष्टकरी लोकाश्रयावर अवलंबून आहे. शतकाची परंपरा असलेल्या लोककलेला रसिकराज जनतेचे पाठबळ आहे. मराठी रंगभूमीकडे प्रेक्षकांनी पाठ फिरविली. मात्र मनोरंजनासोबतच प्रबोधन घडविणारी झाडीपट्टी रंगभूमी तग धरून आहे. या रंगभूमीचा उपेक्षितपणा दूर सारणे गरजेचे आहे.