शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमी अद्यापही उपेक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 22:50 IST

विसाव्या शतकातील लोककलेने रसिकांच्या आश्रयावर श्रीमंती मिळविली. मनोरंजनासोबत तिने समाज प्रबोधन केले. पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीने लोकाश्रय प्राप्त केला. पण राजाश्रय न मिळाल्यामुळे उपेक्षितच असल्याची खंत प्रसिद्ध सिनेकलावंत मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देमकरंद अनासपुरे यांची खंत : विसापुरात आयोजित नाट्यप्रयोगप्रसंगी ‘लोकमत’शी संवाद

अनेकश्वर मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : विसाव्या शतकातील लोककलेने रसिकांच्या आश्रयावर श्रीमंती मिळविली. मनोरंजनासोबत तिने समाज प्रबोधन केले. पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीने लोकाश्रय प्राप्त केला. पण राजाश्रय न मिळाल्यामुळे उपेक्षितच असल्याची खंत प्रसिद्ध सिनेकलावंत मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली.विसापूरात संत रविदास मंडळाने संजय ठाकरे लिखित रंगकर्मी रंगभूमीमार्फत ‘बाळा जगू कशी तुज्याविना’ हा नाट्यप्रयोग झाला. यानिमित्ताने आले होते. दरम्यान, त्यांनी ‘लोकमत’शी बातचित करताना ही खंत व्यक्त केली.मराठी रंगभूमी व झाडीपट्टी रंगभूमी यामध्ये नेमकी तफावत काय? यावर विचार मांडताना मकरंद अनासपुरे म्हणाले, मराठी रंगभूमीचे नाटक प्रायोजकांपुरते चालते. झाडीपट्टी रंगभूमीचे मात्र तसे नाही. झाडीपट्टीला लोककलेचा समृद्ध व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या भागातील रसिकांनी तो जपला आहे. ही लोकाश्रयाची ताकद आहे. झाडीपट्टी रंगभूमीचा प्रवास प्रतिथयश वाटचालीकडे असून मराठी रंगभूमीप्रमाणे झाडीपट्टी रंगभूमीला राजाश्रय मिळणे गरजेचे आहे. झाडीपट्टी रंगभूमीचे नाटक आशय विषयाची अपूवार्ही वैशिष्ट्य आहे. म्हणूनच रसिकराज येथील रंगभूमीला आपलेसे करतात.आपण झाडीपट्टी रंगभूमीच्या नाटकातील भूमिका साकारताना कसे वाटते, यावर धीरगंभीर आवाजात मकरंद अनासपुरे म्हणाले, विदर्भाच्या झाडीपट्टी रंगभूमीने नाट्यसंपदा जपली. नेपथ्य, प्रकाश, संगीताचे तंत्र प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आहे. कलावंतांच्या संवादातून सामाजिक बांधिलकीचा संदेश, प्रबोधनात्मक नाट्यप्रयोग पे्रक्षकांना आवडतात. म्हणून येथील नाटकाला रसिकांची दिवस उजाडेपर्यंतची गर्दी झाडीपट्टी रंगभूमीसाठी अभिमानास्पद आहे. मीच नाही तर अनेक सिनेकलावंतांनी झाडीपट्टी रंगभूमीवर अलोट प्रेमाचा वर्षाव केला आहे, असेही मकरचंद अनासपुरे म्हणाले.लोककलेला रसिकांचे पाठबळविदर्भातील वडसा (देसाईगंज), नवरगाव, सिंदेवाही या भागात जवळपास ५५ ते ६० नाट्यमंडळे असून, रंगभूमीला गौरवशाली करणारी हीच मंडळे आहेत. नोव्हेंबरपासून मार्च महिन्यापर्यंत गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर व वर्धा जिल्ह्याचा सीमावर्ती भाग झाडीपट्टी रंगभूमीने व्यापलेला असतो. झाडीपट्टी रंगभूमीचा नाट्यप्रपंच ग्रामीण भागातील कष्टकरी लोकाश्रयावर अवलंबून आहे. शतकाची परंपरा असलेल्या लोककलेला रसिकराज जनतेचे पाठबळ आहे. मराठी रंगभूमीकडे प्रेक्षकांनी पाठ फिरविली. मात्र मनोरंजनासोबतच प्रबोधन घडविणारी झाडीपट्टी रंगभूमी तग धरून आहे. या रंगभूमीचा उपेक्षितपणा दूर सारणे गरजेचे आहे.