शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

प्रदूषण कमी करण्यासाठी मूल शहरात सौरऊर्जेचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:25 IST

मूल : दिवसेंदिवस विद्युतच्या वापराने प्रदूषण मानवजातीसाठी घातक परिणाम करणारे ठरत आहे. त्यावर उपाय म्हणजे जास्तीतजास्त सौरऊर्जेचा वापर करणे ...

मूल : दिवसेंदिवस विद्युतच्या वापराने प्रदूषण मानवजातीसाठी घातक परिणाम करणारे ठरत आहे. त्यावर उपाय म्हणजे जास्तीतजास्त सौरऊर्जेचा वापर करणे गरजेचे आहे. हे हेरून मूल शहरात प्रथमच गांधी चौकात सौरऊर्जेचे वाहतूक सिग्नल लावण्यात आले. हे सिग्नल व्यवस्थित सुरू असल्याने सौरऊर्जेचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. यासाठी नगरपरिषदेच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात असल्याने, सौरऊर्जेचा वापर अधिकाधिक वाढला असून, मूल शहरात दुकाने, घरात, कार्यालय, राइस मिल आदी ठिकाणी सौरऊर्जा संच बसविण्यात आला आहे. त्यामुळे प्रदूषणावर काही प्रमाणात आळा बसणार आहे.

प्रदूषण ही फार मोठी समस्या असून, दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येते. विद्युतचा वापर घरापासून तर कारखान्यापर्यंत केला जातो. यात होणारी स्पार्किंग असो की, जास्त दाबामुळे जळणारे ट्रान्स्फार्मर असो यामुळे सर्वत्र प्रदूषण पसरत असते. यासाठी सौरऊर्जेवर चालणारी विद्युत वाहिनीचा वापर करणे आवश्यक ठरते. हे हेरून मूल शहरात घरगुतीपासून तर औद्योगिक कामासाठी सौरऊर्जाचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. प्रदूषण वाढू नये, यासाठी शासनाने प्लास्टीकवर बंदी घातली आहे. मात्र, आडमार्गाने काही प्रमाणात प्लास्टीकचा वापर सुरू आहे. हा वापर बंद होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, तसेच दुचाकीऐवजी सायकलचा वापर झाल्यास प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.