शहरं
Join us  
Trending Stories
1
सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
2
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पीएम मोदी आदमपूर एअरबेसवर पोहोचले, सैनिकांशी साधला संवाद
3
दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
4
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
5
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
6
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; १० वीचा निकालही लवकरच लागण्याची शक्यता 
7
निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
8
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
9
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?
10
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
11
ना सिक्स पॅक अ‍ॅब्स ना फिल्मी बॅकग्राऊंड, बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर देणारा हा अभिनेता कोण?
12
शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो?
13
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
14
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
15
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
16
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
18
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
19
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
20
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...

शेतीत वाढतोय यांत्रिक साधनांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:56 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अजुनही बदलली नाही. परंतु काळाची गरज काही शेतकरी आधुनिक साधनांचा उपयोग करीत आहेत. सामान्य शेतकऱ्यांनाही यांत्रिकी साधने विकत घेता येईल, यासाठ शासनाने अनुदान द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देअनुदानाची गरज : कृषी कल्याण योजनांची हवी प्रभावी अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अजुनही बदलली नाही. परंतु काळाची गरज काही शेतकरी आधुनिक साधनांचा उपयोग करीत आहेत. सामान्य शेतकऱ्यांनाही यांत्रिकी साधने विकत घेता येईल, यासाठ शासनाने अनुदान द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.पूर्वी मनुष्यबळ व बैलांचा वापर करून वखरणी, नांगरणीपासून पीक काढण्यापर्यंतची कामे केल्या जात होती. आजही हीच पद्धत सुरू आहे. योग्य प्रमाणात गाय-बैलांना पुरेसे खाद्यान्न मिळत होते. परंतु तंत्रज्ञानाचा विकास होत गेला व नवनवीन शेतीपूरक साधने तयार होऊ लागली. यामध्ये ट्रॅक्टर, हार्वेस्टर मशीन ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेची झाली आहे. शेतीमध्ये तंत्रज्ञान वापरण्याची शेतकऱ्यांची क्षमता नाही. परंतु या तंत्रज्ञानाचे महत्त्व शेतकऱ्यांनी ओळखले आहे. शेतकऱ्यांची दुसरी पिढी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यास उत्सूक आहे. पूर्वी बैलांच्या मदतीने शेतााची वखरणी करण्यासाठी सहा-सात दिवस लागायचे.पैसा व वेळेची बचत होत असली तरी बैलजोडीचा अभाव व शेतमजुांची कमतरता हे प्रश्न कायम होते. वखरणी झाल्यानंतर निंदन, कीटकनाशकाची फवारणी ही सर्व कामे आता मशीनच्या सहाय्याने होऊ लागली आहे.एवढेच काय तर पीक काढण्यासाठी हार्वेस्टर मशीनचा उपयोग होऊ लागला. शेतात चिमण्या-पाखरांचा किलकिलाट यंत्रणांच्या आवाजाने दबला आहे. माळराणातून शेतीचे गाणे ऐकू येणे नाहीसे झाले. शेतकºयांची आर्थिक परिस्थितीच हलाखीची असल्याने कवी कल्पना उपयोगाच्या नाहीत. ही स्थिती बदलावी म्हणून तो यांत्रिक साधनांकडे आशावादी दृष्टीने पाहत आहे. खतांचा वारेमाप वापर, तणनाशक जाळणे यामुळे जमिनीची सुपिकता नाहीशी झाली. तरीही तंत्रज्ञानावर शेतकऱ्यांचा विश्वास आहे. शासनाने नवीन धोरण तयार करून शेतकऱ्यांना अल्प दरात शेतीची साधने उपलब्ध करून दिली पाहिजे.कृषी विभागाची जबाबदारीराज्य शासनाचा कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभागाकडून अनेक योजना राबविल्या जातात. परंतु ग्रामीण, आदिवासी भागातील गरजु शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही. मागील वर्षी खरीप हंगाम अनेक शेतकºयांनी यांत्रिक साधनाची मागणी कृषी विभागाकडे केली होती. पण, उपयोग झाला नव्हता.

टॅग्स :agricultureशेती