शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

शेतीला पूरक दुगव्यवसायतुन साधली उन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:22 IST

वसंत खेडेकर फोटो बल्लारपूर : प्रचंड मेहनत घेण्याची तैयारी, जिद्द आणि उत्तम नियोजन असले की कोणत्याही क्षेत्रात यशाचे शिखर ...

वसंत खेडेकर

फोटो

बल्लारपूर : प्रचंड मेहनत घेण्याची तैयारी, जिद्द आणि उत्तम नियोजन असले की कोणत्याही क्षेत्रात यशाचे शिखर गाठता येते आणि आणि त्यात सातत्य ठेवले की ते स्थान कायम राखता येते, याची प्रचिती येथील परिश्रमी शेतकरी राजू शर्मा यांनी, शेतीला पूरक दुग्धव्यवसायातून साधलेल्या भरभराटीतून येते. ते घेत असलेले परिश्रम व त्यांनी मिळवलेले यश इतरांना प्रेरणादायी ठरावे, असे मोठे आहे.

राजू शर्मा यांची वर्धा नदीला लागून, गणपती घाटाजवळ १४ एकर शेतजमीन आहे. शेतीला पूरक त्यांचा दुग्धव्यवसाय शेतातच आहे. त्यांचे वडील रेल्वेला नोकरीला होते. बदली बल्लारपूरला झाल्यानंतर नोकरी सांभाळत गाय व म्हशी विकत घेऊन घरीच दुधाचा व्यवसाय सुरू केला. घरातील सर्वच त्यात गुंतले. व्यवसाय वाढत गेला आर्थिक बाजू भक्कम झाल्यानंतर त्यांनी गणपती घाटाजवळील १४ एकर शेत विकत घेतले. दुधाचा धंदा शेतात हलविला. शेतीसोबतच मेहनत घेत त्यांनी दुग्धव्यवसायही वाढविला. आज त्यांच्याकडे दुधाळू ३५ म्हशी व १४ गायी आहेत. राजू शर्मा व त्यांची मुलं त्यात राबतात. एक मुलगा येथेच नोकरीला आहे. फावल्या वेळात तोही दूध दुभत्याचे काम करतो. शर्मा हे अल्पभूधारक नसल्याने शासनाचा कोणताही लाभ त्यांना मिळत नाही. स्वबळावरच त्यांना सर्व करावे लागते. शेतीला पूरक दुग्ध व्यवसाय उत्तम आहे. जनावरांना चाऱ्याची सोय शेतीतून होते. बऱ्यापैकी आर्थिक लाभ होतो. परिश्रम आणि जनावरांची काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे. हल्ली निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती पीक पुरेसे हातात येईलच, याची शाश्वती नाही. त्याची भरपाई दुग्ध व्यवसायातून होते, असे सांगत शर्मा यांनी म्हणूनच लहान-मोठ्या कास्तकारांनी पूरक धंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळावे, असा त्यांचा सल्ला सर्व कास्तकारांना आहे.