शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

कढोली येथे राष्ट्रसंतांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

By admin | Updated: March 8, 2016 00:47 IST

री गुरुदेव ग्रामोन्नती युवक मंडळ, संत निरंकारी मंडळ आणि कढोली (बु.) येथील ग्रामस्थांच्यावतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याच्या..

वामनराव चटप : सर्व आघाड्यांवर राष्ट्र यशस्वी व्हावे, हे राष्ट्रसंतांचे स्वप्नकढोली : श्री गुरुदेव ग्रामोन्नती युवक मंडळ, संत निरंकारी मंडळ आणि कढोली (बु.) येथील ग्रामस्थांच्यावतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संत गाडगेबाबा जयंती पर्वाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे उद्घाटन आदर्श गाव राजगडचे शिल्पकार चंदू पाटील मारकवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी साहित्यिक माजी आमदार एकनाथ साळवे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार सुदर्शन निमकर, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, डॉ. सुरेश उपगंन्लावार, सरपंच रसिका पडवेकर उपस्थित होते. देवराव ठावरी, विलास उगे, मारोती साव, देवराव कोंडेकर, श्यामसुंदर पोडे, सतिश लोंढे, राहुल सराफ, भाऊराव झाडे, संजीव पोडे, प्रेमलाल पारधी, मोहन मेश्राम, रंगराव पवार, सुधाकर गेडेकर आदींची उपस्थिती होती.राष्ट्रसंताच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभानिमित्ताने श्री गुरुदेव कार्यकर्ता संमेलन, समाज प्रबोधनपर विनोदी एकपात्री कार्यक्रम, इंजिनिअर भाऊ थुटे यांचे सप्तखंजिरी वादन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक अ‍ॅड. राजेंद्र जेनेकर यांनी केले. याप्रसंगी बंडोपंत बोढेकर यांनीही मार्गदर्शन केले. चंदू पाटील मारकवार म्हणाले, राष्ट्रसंतांनी गावालाच तिर्थ समजले आहे. पण हे सारे तिर्थ आज घाणीने माखली गेली आहे. गावात जसे विद्यालय तसे घरोघरी शौचालय असावे. ग्रामाच्या उत्थानासाठी प्रत्येकांनी राष्ट्रसंतांच्या प्रचार कार्यात झोकून द्यावे लागेल.माजी आमदार चटप म्हणाले, माणसे मोठी होतात. कर्मांनी, कुटुंबाचा, समाजाचा, राष्ट्राचा आधार माणूस आहे. चांगली माणसं घडली तर राष्ट्र चांगले होईल. एकंदरीत राष्ट्र सर्व आघाड्यावर यशस्वी व्हावे, याचे स्वप्न राष्ट्रसंतांनी पाहिले होते, त्या दृष्टीने सर्वांची कृती आवश्यक असल्याचे ते म्हणाले. माजी आमदार एकनाथ साळवे म्हणाले, राष्ट्रसंतांचे विचार हा नवा शक्ती स्त्रोत असून यातून विचारक्रांतीच्या ज्योती निर्माण व्हाव्यात, असे ते म्हणाले. या कार्यक्रमात राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेतर्फे डॉ. गिरीधर काळे (बीबी) यांना समर्पित जीवन पुरस्कार तर कवी संजय येरणे (नागभीड) यांना दिवं. राजेश्वर बोढेकर स्मृती साहित्य साधना पुरस्कार प्रदान करण्यात आला. संचालन अ‍ॅड. राजेंद्र जेनेकर यांनी केले. (प्रतिनिधी)