शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मतदारांच्या निरुत्साहाने टक्केवारीला फटका

By admin | Updated: October 15, 2014 23:32 IST

चिमूर विधानसभा मतदार संघामध्ये मतदारांचा मतदानासाठी अतिशय निरुत्साह दिसून आला. या मतदार संघातून सर्वाधिक २९ उमेदवारांनी आपले भाग्य अजमाविले. या क्रांतीभूमी म्हणून

७४-चिमूर विधानसभा मतदार संघामध्ये मतदारांचा मतदानासाठी अतिशय निरुत्साह दिसून आला. या मतदार संघातून सर्वाधिक २९ उमेदवारांनी आपले भाग्य अजमाविले. या क्रांतीभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिमूर शहरातील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांसह नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र सकाळपासून मतदारांमध्ये निरूत्साह दिसून आला. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना मतदानासाठी घराबाहेर निघण्याचे आवाहन केले जात होते. मात्र त्यालाही फार प्रतिसाद मिळाला नाही. संवेदनशिल अशी ओळख असलेल्या या मतदार संघात मतदान प्रक्रीयेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही. या मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४.२९ टक्के मतदान झाले. दुपारनंतर गर्दी ओसरलीजिल्ह्याची मागणी असलेल्या चिमूरमध्ये यावेळी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत निरूत्साह दाखविला. काहींनी जोपर्यंत जिल्हा होणार नाही, तोपर्यंत मतदानच न करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा ऐकीवात आली. त्याचा परिणाम म्हणून दुपारनंतर मतदान केंद्रावरील गर्दी ओसरली. विधानसभेत घटली टक्केवारीचिमूर विधानसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीची टक्केवारी घटली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता. त्यामुळे विधानसभेतही तो उत्साह कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. ती अपेक्षा मात्र फोल ठरली. ५ वाजेपर्यंत केवळ ४५.२९ टक्के मतदानसध्या शेतातील कामे जोमात सुरू आहे. त्यामुळे मजूर वर्गासह शेतकरीही शेतातील कामांमध्ये व्यस्त आहेत. त्यातच दिवाळीचा सण अगदी तोंडावर आला आहे. त्यामुळे दिवाळी साजरी करण्यासाठी शेतपीक काढण्याचे काम सुरू आहे. परिणामी चिमूर विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागात मतदानावर फरक पडला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत केवळ ४५.२९ टक्के मतदान झाले. अशीही जागृतीइंटरनेट आणि मोबाईलच्या युगातही मतदारांना जागृत करण्यासाठी तरूणांनी आपल्या डोक्यात कल्पना मोबाईलमध्ये उतरविल्या. आज दिवसभर अनेकांच्या मोबाईलवर व्हॉटस् अ‍ॅपद्वारे जनजागृतीचे संदेश सातत्याने पोहचविले जात होते. त्यामध्ये ‘माझे मत माझा अधिकार’, ‘माझ्या एका मताने नक्कीत फरक पडेल’, ‘आता हे राज्य तुमच्या हातात’, ‘परिक्षेत एका गुणाला, क्रीकेटमध्ये एका धावेला अन् लोकशाहीमध्ये एका मताला फार किंमत असते’, ‘मतदार ओळखपत्राचा उपयोग फक्त सीमकार्ड घेण्यासाठी नव्हे तर मतदानासाठी करा’, ‘मतदान करा देश घडवा’, एवढेच नव्हे तर ‘मतदान मेरा अधिकार-मतदान मेरी जिम्मेदारी’ अशा प्रकारचे संदेश मोबाईलद्वारे देण्यात येत होते.