शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

दारू व्यवसायात उतरली बेरोजगारांची फौज

By admin | Updated: September 10, 2015 00:48 IST

राज्य शासनाने १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची घोषणा करुन दारू तस्करांना रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आले.

चंद्रपूर जिल्हा दारूबंदी : सामाजिकदृष्ट्या अत्यंत चिंतेची बाबगोवरी : राज्य शासनाने १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची घोषणा करुन दारू तस्करांना रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आले. शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे जिल्हाभरात सर्वच स्तरातून स्वागत करण्यात आले. दारूमुळे विस्कटलेले संसार पुन्हा सावरेल, असे वाटत असतानाच दामदुप्पट नफा कमविण्याच्या उद्देशाने दारू तस्करी वाढली. आता तर या काळ्या व्यवसायात जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांची फौज उतरल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तरुणपिढीच या व्यवसायात आल्याने सामाजिक आरोग्यही बिघडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यापासून दारू तस्करांवर आळा घालण्यासाठी राज्य व जिल्ह्याच्या सीमेवर पोलीस तपासणी नाके उभारण्यात आले. मात्र दारू तस्कर नवनवीन शक्कल लढवून मोठ्या प्रमाणात दारू तस्करी करीत असल्याने पोलीस यंत्रणेवरचा ताण वाढला. यादरम्यान पोलिसांनी दारूतस्करांवर कारवाईचा बडगा उगारला. तर काहींनी चक्क पोलिसांशी सेटींग करुन आपले भले करुन घेतले. त्यामुळे दारू तस्करांची हिमंत वाढल्याने पोलीस आमचे काहीच बिघडवू शकत नाही असा धमकीवजा इशारा दारू तस्कर देऊ लागले आहे. हा प्रकार तस्करीचे पाळेमुळे अधीकच बळकट करणारा आहे. कुंपनच शेत खात असल्याने दाद मागायची कुणाकडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशाचे भावी आधारस्तंभ समजले जाणारे युवकच दारू व्यवसायाच्या काळ्या धंद्यात उतरल्याने चिंता वाढली आहे. झटपट पैसा कमविण्याच्या नादात आयुष्याचे मातेरे करायला निघालेल्या तरुण पिढीकडून काय अपेक्षा करायची, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. परप्रांतातून दारू तस्करी करताना आडमार्गाने किंवा राज्य मार्गावर असलेल्या पोलीस तपासणी नाक्यावरुन दारू सर्रास आणली जात असताना त्याठिकाणी असणारे पोलीस काय करतात? पैशाच्या लोभापायी दारू तस्करांकडून चिरीमिरी घेऊन त्यांना सोडून देणारे पोलीस कर्मचारी काय कामाचे? पोलीसच दारू तस्करांना अभय देत असेल तर गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढेल. मग यात दोष कुणाचा, असा प्रश्न निर्माण होत आहे. साऱ्या पोलीस प्रशासनाला दोष देऊन चालणार नाही तर कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारायला हवा. दारूबंदी झाल्यापासून जिल्ह्यातील परिस्थिती सुधारेल, अशी जनतेची अपेक्षा होती. मात्र यासंदर्भात असलेले चित्र अधिकच बिकट होत चालले आहे. दररोज वृत्तपत्रातून दारूतस्करी संबंधातील बातम्या प्रकाशित होतात. पोलीस कारवाई करतात. मात्र दारू तस्करी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. दारू तस्करीच्या या काळ्या व्यवसायात दुप्पट-तिप्पट नफा कमविण्याच्या हेतूने सुशिक्षित बेरोजगार युवकांची फौज अवैध दारूच्या धंद्यात उतरली असल्याने त्यांच्या भावी आयुष्याचे स्वप्न आता धूसर झाले आहे. (वार्ताहर)