शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

भूमिगत मलनिस्सारण योजना फसवी

By admin | Updated: February 19, 2015 00:47 IST

चंद्रपूर शहराला स्वच्छ व सुंदर करू शकणारी महत्त्वाकांक्षी भूमिगत मलनिस्सारण योजना पाच वर्र्षापूर्वी मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आली.

रवी जवळे चंद्रपूर चंद्रपूर शहराला स्वच्छ व सुंदर करू शकणारी महत्त्वाकांक्षी भूमिगत मलनिस्सारण योजना पाच वर्र्षापूर्वी मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आली. मात्र प्रारंभापासून या योजनेत नियोजनाची ऐसीतैसी करण्यात आल्याने ही योजना पाच वर्षातही पूर्णत्वास येऊ शकली नाही. ७० कोटींची ही योजना आता सुमारे सव्वाशे कोटींवर जाऊन पोहचली आहे. मात्र ही योजना कधी सुरू होईल का, याची खात्री खुद्द मनपाचे नगरसेवकही देऊ शकत नाही. या योजनेसाठी आतापर्यंत कोट्यवधींचा निधी खर्च झाला आहे, तोदेखील व्यर्थ जातो की काय, असे वाटायला लागले आहे. चंद्रपूर नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाल्यानंतर अनेक नवीन योजना चंद्रपूर शहरात येणे अपेक्षित होते. तशा अनेक योजना येत आहेत आणि काही प्रस्तावितही आहेत. मात्र आजवर एकही योजना पूर्णत्वास येऊ शकली नाही, हे चंद्रपूकरांचे दुर्भाग्य. चंद्रपूर शहरातील बहुतांश भागातील मोठे नाले वाहतात. अनेक ठिकाणी हे नाले उघडेच आहेत. त्यामुळे घाण आणि दुर्गंधीचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. अशातच चंद्रपूर शहराचा कायापालट करू शकणारी महत्त्वाकाक्षी भूमिगत मलनिस्सारण योजना अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. घाणीचे बरबटलेले हे शहर यामुळे तर सुंदर व स्वच्छ दिसेल, अशी आशा होती. २००७ मध्येच चंद्रपूर या योजनेबाबत नगरपालिका स्तरावर प्रस्ताव तयार करण्यात आला होता. तेव्हा या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरीही देण्यात आली होती. २००९ मध्ये भूमिगत मलनिस्सारण योजना हाती घेण्यात आली. या योजनेचे कंत्राट शिवास्वाती कन्स्ट्रक्शन कंपनी, हैदराबाद यांना देण्यात आले. २००९ मध्येच वर्क आॅर्डरही निघाले आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवातही करण्यात आली. दोन वर्षात म्हणजे २०११ पर्यंत ही योजना पूर्णत्वास येणे अपेक्षित होते. मात्र प्रारंभापासून या योजनेला समस्यांचे ग्रहण लागत आले. रस्ते, वीज केबल आदी अनेक बाबींमुळे २०११ पर्यंत ही योजना पूर्णत्वास आली नाही. त्यानंतर योजनेच्या कामाला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. मात्र २०१२ पर्यंतही संबंधित कंपनीने हे काम पूर्ण केले नाही. त्यानंतर २०१३ पर्यंत पुन्हा मुदत वाढ दिली. आता २०१५ उजाडले आहे. मात्र भूमिगत मलनिस्सारण योजनेचे काम अद्याप सुरूच आहे. या योजनेच्या कामात नियोजनाचा प्रचंड अभाव प्रारंभापासूनच दिसून येत राहिला. भूमिगत मलनिस्सारण योजनेची कामे करताना शहरातील सुमारे ७० ते ८० टक्के भागात खोदकाम केले जाणार, हे अपेक्षित होते. लवकरच या कामांना सुरूवात होणार आहे, हे माहीत असतानाही शहरात रस्त्यांची कामे करण्यात आली होती. त्यामुळे बांधलेले नवीन रस्ते भूमिगत मलनिस्सारण योजनेसाठी फोडण्यात आली. जे जुने रस्ते होते, तेदेखील फोडण्यात आले. मात्र हे फोडलेले रस्ते पुन्हा नव्याने बांधण्याचा कोणताही करार कंत्राट देताना महानगरपालिकेने केलेला नव्हता. त्यामुळे संबंधित कंत्राटी कंपनी रस्ते फोडत राहिली आणि थातूरमातूर बुजवित राहिली. उल्लेखनीय असे की यामुळे तब्बल तीन वर्ष नागरिकांना रस्त्यांची डोकेदुखी सहन करावी लागली होती. याशिवाय रहमतनगर परिसरात अगदी इरई नदीच्या पात्रातच या योजनेसाठी ट्रीटमेंट प्लॅन्ट उभारण्यात आला आहे. नियोजनशून्यता व बेजबाबदारपणाचा हा कळस होता. नदीपात्रात असल्यामुळे तो पावसाळ्यात पाण्याखाली येईल, हे कुणालाही कळले असते. या योजनेचे दुसरे ट्रीटमेंट प्लॅन्ट पठाणपुरा परिसरात आहे. मात्र त्याचेही बरेच काम शिल्लक आहे. याशिवाय ट्रीटमेंट प्लॅन्टपर्यंत पाईप लाईनही अद्याप टाकण्यात आलेली नाही. अनेक वॉर्डात पाईप लाईन टाकण्याचे काम शिल्लक आहे. काही महिन्यांपूर्वी भूमिगत मलनिस्सारणाचे काम शहरात काही ठिकाणी सुरू असल्याचे दिसून येत होते. आता मात्र योजनेचे काम कुठेही सुरू असल्याचे दिसत नाही. आता २०१५ उजाडले आहे. मात्र ही योजना सुरू झालेली नाही. आणखी या योजनेच्या कामात अनेक त्रुट्या असल्याचेही नागरिकांचे व काही नगरसेवकांचेही म्हणणे आहे. त्यामुळे ही योजना केव्हा सुरू होईल, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे.त्या प्लॅन्टचे काय ?भूमिगत मलनिस्सारण योजनेसाठी महानगरपालिकेने चक्क इरई नदीच्या पात्रातच ट्रीटमेन्ट प्लॅन्ट उभारले आहे. कोणतही दूरदृष्टी ठेवून कोट्यवधीचा खर्च करीत हे प्लॅन्ट उभारले ते अद्यापही नागरिकांना कळले नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चंद्रपूरच्या दौऱ्यावर आले असताना तेदेखील नदीपात्रात प्लॅन्ट पाहून थक्क झाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर अधिकाऱ्यांना यावरून चांगलेच धारेवर धरले होते. या प्लॅन्टचे आता महानगरपालिका काय करणार, असाही प्रश्न आहे.योजनेची वाढली किंमतभूमिगत मलनिस्सारण योजनेला प्रारंभ झाला तेव्हा योजनेसाठी ७० कोटींचा खर्च अपेक्षित होता. कामे वेळेत न झाल्याने योजना ९० कोटींवर गेली. मात्र २०१५ उजाडले तरी ही योजना पुर्णत्वास येऊ शकली नाही. त्यामुळे आता पुन्हा योजनेची किंमत वाढून ती सव्वाशे कोटींच्याही पार गेली आहे. योजनेचे काम लवकर पूर्ण झाले नाही तर आणखी अंदाजपत्रकीय किंमत वाढण्याची शक्यता आहे.