शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या परिस्थितीनुसार व्यवसाय निवडणे आवश्यक

By admin | Updated: August 27, 2016 00:36 IST

परिस्थिती बदलत आहे. बदलत्या काळानुसार जे बाजारपेठेत विकल्या जाऊ शकते, ते निर्माण करणे आवश्यक आहे.

सुधीर मुनगंटीवार : कृषी व वन आधारित पर्यटन कार्यशाळाचंद्रपूर : परिस्थिती बदलत आहे. बदलत्या काळानुसार जे बाजारपेठेत विकल्या जाऊ शकते, ते निर्माण करणे आवश्यक आहे. अलिकडे रोजगार, व्यवसायाचे प्राधान्यक्रम बदलले आहे. त्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार कृषी, वनांवर आधारित पर्यटनासारखे व्यवसाय निवडणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले.येथील वनराजिक प्रबोधनीच्या सभागृहात वन व कृषी विभाग तसेच आत्माच्या संयुक्त विद्यमाने कृषी व वनावर आधारित पर्यटनाबाबत आयोजित कार्यशाळेच्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, सभापती देवराव भोंगळे, भाजपा जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा, कृषी पर्यटन संकल्पनेचे जनक पांडुरंग तावरे, वन प्रबोधनीचे संचालक अशोक खडसे, उपवनसंरक्षक गजेंद्र नरवने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.अण्णासाहेब हसनाबादे, प्रकल्प संचालक (आत्मा) विद्या मानकर, मार्गदर्शक अविनाश जोगदंड, रवी पाटील आदी उपस्थित होते.जिल्ह्याचे जंगल ही शक्ती आहे, या शक्तीचा उपयोग करुन रोजगार व्यवसाय कसे निर्माण होऊ शकतात. याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. जिल्हयाच्या विकासासाठी ज्या ज्या योजना आणता येते, त्यासाठी प्रयत्न सुरु आहे. कृषी व वन आधारित पर्यटनाला जिल्हयात संधी असल्याने बदलत्या परिस्थितीनुसार रोजगाराचे हे क्षेत्र आत्मसात करणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले.जिल्हयाच्या विकासासाठी अनेक उपक्रम सुरु केले जात आहे. ६०० कोटी रुपये खर्च करुन अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालय, २०० कोटी रुपये खर्चाची देशातील २६ वी सैनिकी शाळा, वन अकादमी, वनऔषधी रिसर्च सेंटर, चिचपल्ली येथे बांबू प्रशिक्षण केंद्र आपण करतो आहे. मानव विकासाच्या माध्यमातून रोजगारात पुढे जाण्यासाठी विविध क्लस्टर करत असल्याचेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. जिल्हयात २७ गावे आदर्श गावे म्हणून विकसित करणार असल्याचे ते म्हणाले.यावेळी कृषी पर्यटन संकल्पनेचे जनक पांडुरंग तावरे यांनी कृषी, पर्यटन व त्यातील संधी यावर प्रकाश टाकला. दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत वन विभाग, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध ग्रामपंचायतीचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक वनसंरक्षक रामराव कुळकर्णी यांनी केले. तर आभार वनपरिक्षेत्र अधिकारी हिवरे यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)