शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

बदलत्या परिस्थितीनुसार व्यवसाय निवडणे आवश्यक

By admin | Updated: August 27, 2016 00:36 IST

परिस्थिती बदलत आहे. बदलत्या काळानुसार जे बाजारपेठेत विकल्या जाऊ शकते, ते निर्माण करणे आवश्यक आहे.

सुधीर मुनगंटीवार : कृषी व वन आधारित पर्यटन कार्यशाळाचंद्रपूर : परिस्थिती बदलत आहे. बदलत्या काळानुसार जे बाजारपेठेत विकल्या जाऊ शकते, ते निर्माण करणे आवश्यक आहे. अलिकडे रोजगार, व्यवसायाचे प्राधान्यक्रम बदलले आहे. त्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार कृषी, वनांवर आधारित पर्यटनासारखे व्यवसाय निवडणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले.येथील वनराजिक प्रबोधनीच्या सभागृहात वन व कृषी विभाग तसेच आत्माच्या संयुक्त विद्यमाने कृषी व वनावर आधारित पर्यटनाबाबत आयोजित कार्यशाळेच्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, सभापती देवराव भोंगळे, भाजपा जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा, कृषी पर्यटन संकल्पनेचे जनक पांडुरंग तावरे, वन प्रबोधनीचे संचालक अशोक खडसे, उपवनसंरक्षक गजेंद्र नरवने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.अण्णासाहेब हसनाबादे, प्रकल्प संचालक (आत्मा) विद्या मानकर, मार्गदर्शक अविनाश जोगदंड, रवी पाटील आदी उपस्थित होते.जिल्ह्याचे जंगल ही शक्ती आहे, या शक्तीचा उपयोग करुन रोजगार व्यवसाय कसे निर्माण होऊ शकतात. याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. जिल्हयाच्या विकासासाठी ज्या ज्या योजना आणता येते, त्यासाठी प्रयत्न सुरु आहे. कृषी व वन आधारित पर्यटनाला जिल्हयात संधी असल्याने बदलत्या परिस्थितीनुसार रोजगाराचे हे क्षेत्र आत्मसात करणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले.जिल्हयाच्या विकासासाठी अनेक उपक्रम सुरु केले जात आहे. ६०० कोटी रुपये खर्च करुन अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालय, २०० कोटी रुपये खर्चाची देशातील २६ वी सैनिकी शाळा, वन अकादमी, वनऔषधी रिसर्च सेंटर, चिचपल्ली येथे बांबू प्रशिक्षण केंद्र आपण करतो आहे. मानव विकासाच्या माध्यमातून रोजगारात पुढे जाण्यासाठी विविध क्लस्टर करत असल्याचेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. जिल्हयात २७ गावे आदर्श गावे म्हणून विकसित करणार असल्याचे ते म्हणाले.यावेळी कृषी पर्यटन संकल्पनेचे जनक पांडुरंग तावरे यांनी कृषी, पर्यटन व त्यातील संधी यावर प्रकाश टाकला. दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत वन विभाग, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध ग्रामपंचायतीचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक वनसंरक्षक रामराव कुळकर्णी यांनी केले. तर आभार वनपरिक्षेत्र अधिकारी हिवरे यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)