शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

दोन हजार शाळा टीव्ही संचाविना

By admin | Updated: September 4, 2014 23:41 IST

शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकता यावे, अशी व्यवस्था करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले. या आदेशाने शिक्षण विभागाची धावपळ सुरु झाली आहे. शिक्षण विभाग शाळांमध्ये

पंतप्रधानांचे भाषण : रेडिओ, मोबाईलचा आधारचंद्रपूर : शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकता यावे, अशी व्यवस्था करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले. या आदेशाने शिक्षण विभागाची धावपळ सुरु झाली आहे. शिक्षण विभाग शाळांमध्ये व्यवस्था करण्याच्या तयारीला लागला असून शिक्षक दिनाच्या मुहूर्तावर आदेश धडकल्याने अनेक शिक्षकांनी नाकमुरडत तयारीला लागले आहेत. शिक्षण विभागातून याबाबत माहिती घेतली असता, तब्बल दोन हजार शाळांमध्ये टीव्ही संच नसल्याची माहिती आहे. मात्र, शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यवस्था पूर्ण झाल्याचे सांगितले. सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकता यावे, अशी व्यवस्था करण्याच्या सुचना आहेत. शिक्षण विभागाने मुख्याध्यापक व शालेय शिक्षण समितीला तसे आदेश दिले आहेत. मात्र, अनेक शाळांत टीव्ही संच नाही. ज्या शाळांत आहेत, ते टीव्ही संच धुळखात पडले आहेत. नव्या आदेशाने आता ‘त्या’ टीव्ही संचावरील धुळ साफ होणार आहे. मात्र, ज्या शाळांमध्ये वीज नाही, अशा शाळांच्या शिक्षकांची पंचाईत झाली आहे. त्यांनी शाळा समितीच्या पदाधिकाऱ्यांची दारे ठोठावून व्यवस्था करून देण्याची मागणी केली आहे.चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा एक हजार ९५५ तर माध्यमिक ५५६ शाळा आहेत. यापैकी केवळ ४७९ शाळांमध्ये टीव्हीसंच आहे. उर्वरित शाळांमध्ये टीव्ही संचाची व्यवस्था नसल्याने रेडीओ, मोबाईलच्या माध्यमातून तसेच गावात कुणाच्या घरची टीव्ही आणून किंवा ग्रामपंचायतीच्या टीव्हीवर भाषण ऐकण्याची व्यवस्था केल्याचे शिक्षणाधिकारी देशपांडे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक २ हजार ५११ शाळा आहेत. यामध्ये प्राथमिक शाळांत एक लाख ६८ हजार ७९९ तर माध्यमिक शाळांत ५१ हजार ८४३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्याची संधी मिळणार आहे. विभाग विद्यार्थ्यांना कितपत सुविधा उपलब्ध करून देते, याकडे लक्ष आहे.(स्थानिक प्रतिनिधी)