शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
2
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
4
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
5
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
6
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
7
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
8
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
9
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
10
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
11
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
12
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
13
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
14
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
15
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
16
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
17
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
18
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
19
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
20
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश

दोन महिन्यांपासून घंटागाड्या पडल्या बेवारस

By admin | Updated: September 2, 2016 00:53 IST

दीड ते दोन महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेतून पंचायत समिती जिवती येथे गावातील कचरा जमा करण्यासाठी १५ घंटागाड्या आल्या.

गाड्यांची दैनावस्था : म्हणे विषम संख्येमुळे निर्माण झाला पेचसंघरक्षित तावाडे जिवतीदीड ते दोन महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेतून पंचायत समिती जिवती येथे गावातील कचरा जमा करण्यासाठी १५ घंटागाड्या आल्या. वास्तविक या कचरागाड्या ग्रामपंचायतीला केव्हाच वाटप व्हायला हव्या होत्या. परंतु वाटप न झाल्याने आणि संबंधित विभागाच्या हलगर्जीपणाने सदर घंटागाड्यांचीच ऐसीतैशी झाल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्हा परिषद क्षेत्र दोन आहेत आणि गाड्या विषम संख्येत आल्या आहेत. त्यामुळे पेच निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे, हे विशेष.गेल्या कित्येक दिवसांपासून या गाड्या पटांगणात बेवारस स्थितीत आहेत. कुलूप अस्ताव्यस्त पडलेले असून घंटागाड्याही जंगलेल्या दिसत आहेत. वार्षिक दोन लाखाच्या वर उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतीला गावातील कचरा उचलून गावाच्या बाहेर नेऊन टाकण्यासाठी या घंटागाडया मिळतात. त्याप्रमाणे पंचायत समिती विभागाकडून २५ गाड्या मिळाव्यात, असा प्रस्ताव जानेवारी २०१६ ला पाठविण्यात आला. त्यानुसार जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडून २५ ऐवजी १५ घंटागाड्या जिवती पंचायत समितीसाठी पाठविण्यात आल्या. पण या १५ गाड्या नेमक्या कोणत्या ग्रामपंचायतींना द्यायच्या, त्याची यादी जिल्हा परिषदेतून आम्हाला प्राप्त न झाल्याने आम्ही सदर घंटागाड्या वाटप केल्या नाही, असे विस्तार अधिकारी एन. बी. कुळमेथे यांनी सांगितले. एवढेच नाही तर जिवती तालुक्यात जिल्हा परिषदेचे दोन क्षेत्र असून त्या जिल्हा परिषद सदस्यांना उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विश्वासात घेऊन त्या-त्या क्षेत्रातील ग्रामपंचायतीची यादी पहायला हवी होती. जेनेकरुन घंटागाड्या वाटप करण्यास सोईस्कर झाले असते. गावातील कचरा उचलण्यास ही घंटागाडी गावात फिरते, तेव्हा त्या गाडीला असलेल्या घंटीच्या आवाजाने गाडी आल्याचे लोकांना कळते. मात्र वाटप होण्यापूर्वीच गाड्यांच्या घंट्या गायब झाल्याने आता घटींचा नाद येणार की नाही, हे सांगणे कठीण आहे. घंटागाडीची संख्या विषम असून दोन जिल्हा परिषद क्षेत्र आहेत. त्यामुळे कोणत्या क्षेत्राला कमीअधिक वाटप करावे, हा माझ्यासमोर पेच निर्माण झाला असून जिल्हा परिषदेतून यादी आली असती तर वाटप करणे सोईचे झाले असते.- एम. बी. कुळमेथे, विस्तार अधिकारी, समाजकल्याण विभाग, जिवती