शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

जिल्ह्यात विविध अपघातात दोन ठार

By admin | Updated: September 19, 2015 01:13 IST

जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार झाले तर दोनजण जखमी झालेत.

ब्रह्मपुरी/विरूर (स्टे) : जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार झाले तर दोनजण जखमी झालेत. तेलंगणा प्रदेश सिमेलगत असलेल्या वाकडी येथे झालेल्या दुचाकी अपघातात नंदीप्पा मंडल आसिफाबाद येथील भिमराव गोतरे (३५) हा जागीच ठार झाला तर राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथील राकेश बंडू खोब्रागडे (२६) याचा उपचारादरम्यान नागपूर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.विरूर येथील राकेश बंडू खोब्रागडे हा तेलंगणा येथील झेंडीगुडा येथे सासरवाडीला गेला होता. परत येताना तेलंगणातील वाकडी गावालगत राज्यमार्ग असलेल्या पेट्रोल पंपजवळ पेट्रोल भरण्याकरिता आलेल्या भीमराव गोतरे यांची दुचाकी व विरूद्ध दिशेने येणाऱ्या राकेश खोब्रागडे याची दुचाकी या दोन वाहनात टक्कर झाली. त्यात भिमराव गोतरे (३५) याचा जागीच मृत्यू झाला, तर राकेश बंडू खोब्रागडे याला गंभीर दुखापत झाल्याने नागपूर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. ब्रह्मपुरी तालुक्यातील नागभीड - ब्रह्मपुरी राज्य मार्गावर सायगाटा फाटा ते अली राईस मिलपर्यंत जागोजागी खड्डे पडल्याने दुचाकीस्वारासह दोन जण जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. विनायक हरी कोरे (४२) रा. मेंढा हा किरकोळ जखमी असून पाहुणा म्हणून आलेला दीपक दुधराम शिवणकर (३५) रा. ब्राह्मणटोला (ता. अर्जुनी) हा गंभीर जखमी झालेला आहे.मेंढा (किरमिटी) या राहत्या गावावरून हे दोघे दुचाकीने ब्रह्मपुरीला येत असताना दुचाकीवरचे नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या सुचना फलकावर जाऊन आदळल्याने विनायक हरी कोरे व दीपक दुधराम शिवणकर हे दोघे जखमी झाले. दीपक शिवणकर याला उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले आहे. रस्त्याच्या दुर्दशेमुळे अनेक अपघात घडत असूनही संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी/ वार्ताहर)