शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

पाणीपुरवठा योजनेसाठी दोन कोटी

By admin | Updated: July 23, 2015 00:47 IST

नगर परिषदेच्या वतीने ३२ कोटी रुपये खर्चून नव्याने पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे.

बाळू धानोरकर यांची माहिती : जीएमआर व साई वर्धा पॉवर कंपनी घेणार पुढाकारवरोरा : नगर परिषदेच्या वतीने ३२ कोटी रुपये खर्चून नव्याने पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. या योजनेला पालिका फंडातून भरावे लागणारे दोन कोटी रुपये साई वर्धा व जीएमआर एम्को कंपनी देणार आहे. यासोबत दोन्ही कंपन्यांनी अनेक मागण्या मान्य केल्या असल्याचे पत्र दिल्याने कामबंद आंदोलन मागे घेत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत आमदार बाळू धानोरकर यांनी दिली.वरोरा शहरानजीकच्या मोहबाळा औद्योगिक वसाहतीमध्ये शेतकरी, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परंतु कंपन्या सर्वसामान्यांना कुठल्याही सोयी उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप आमदार बाळू धानोरकर यांनी करीत २१ जुलै रोजी कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली. कंपनीच्या प्रतिनिधींनी आमदार धानोरकर यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली व चर्चा केली. त्यात जीएमआर कंपनीने वरोरा शहरात नव्याने होऊ घातलेल्या ३२ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेला नगर परिषद फंडातून आवश्यकतेनुसार महाराष्ट्र शासनास भरावी लागणारी रक्कम निधीच्या उपलब्धतेनुसार एक कोटी रुपयांपर्यंत नगर परिषद फंडात जमा करण्यात येईल. कंपनीच्या परिसरात असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कंपनीच्या माध्यमातून नुकसान झाल्यास एक महिन्याच्या आत पाहणीे करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्यात येईल. वरोरा शहरात दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येईल, आमदार यांना विश्वासात घेऊन सीएमआर फंडातून होणाऱ्या विकास कामाचा आराखडा तयार करणार, कंपनी परिसरात २५ कि.मी. अंतरापर्यंतच्या तरुणांना आवश्यक ते तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या उपलब्धतेनुसार रोजगार देण्यात येईल, वरोरा नगर परिषदेला स्वर्गरथ उपलब्ध करून देण्यात येईल, ग्रामीण भागात स्कूलबस देण्यात येणार, सिंचनाकरीता बंधारे बांधताना कंपनीच्या वतीने जेसीबी मशीन व डिझेल उपलब्ध करून देण्यात येईल, स्मशानभूमीत विद्युत शवदाहिनी उभारण्यात येईल, उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे तीन महिन्यात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.साई वर्धा पॉवर कंपनीच्या वतीने नगर परिषद पाणीपुरवठा योजनेस एक कोटी रुपये निधीच्या उपलब्धतेनुसार देण्यात येणार आहेत. कंपनीकडून शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. आमदार धानोरकर यांना विश्वासात घेऊन सी.एस.आर फंडातून होणाऱ्या विकासकामाचा आराखडा तयार करणार आहे. कंपनी परिसरातील २५ कि.मी. अंतरापर्यंतच्या तरुणांना आवश्यक ते तांत्रिक व व्यावसायीक प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या उपलब्धतेनुसार रोजगार देण्यात येईल, शेतकऱ्यांना सिंचन व्यवस्था उपलब्ध करून देणार, परिसरातील जनावरांकरिता पशुुचिकित्सक उपलब्ध करून, उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे शीत शवपेटी, उपजिल्हा रुग्णालयात जन्मलेल्यांसाठी साहित्य पुरविण्यात येईल. तसेच वरोरा नगर परिषदेला एक पाणी टँकर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आदी मागण्या जी.एम.आर. एम्को कंपनी व साई वर्धा पॉवर कंपनीच्या प्रतिनिधींना मान्य केल्याची माहिती आमदार धानोरकर यांनी दिली. यावेळी नगराध्यक्ष जनाबाई पिंपळशेंंडे, नगरसेवक राजू महाजन, पुरुषोत्तम खिरटकर, सुरेश पचारे, किशोर उत्तरवार, खेमराज कुरेकार, नीलेश भालेराव, सुभाष दांदडे, बाळू चिंचोलकर, अशोक निगम आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)चार्ज थ्री-जीचा, सेवा मात्र टू-जीची !चंद्रपूर : बहुतांश खासगी मोबाईल कंपन्यांची जिल्ह्यात थ्री-जी सेवा उपलब्ध नसली तरी थ्री-जी सेवा असल्याचा दावा करीत आहेत. मात्र प्रत्यक्षात थ्री-जी सेवा नसल्याने टू-जी सेवा उपलब्ध करून देऊन ग्राहकांची लूट चालविली जात आहे. स्मार्ट फोन ही आता केवळ चैनीची वस्तू राहिली नसून ती आजच्या बदलत्या युगाची गरज बनली आहे. स्मार्ट फोनच्या माध्यमातून विविध कामे करण्यासाठी इंटरनेट कनेक्टिव्हीटी व इंटरनेट स्पीड असणे अत्यंत गरजेचे आहे. इंटरनेटस्पीड प्राप्त व्हावी यासाठी थ्री-जी सेवा असणे गरजेचे आहे. जिल्ह्यात अनेक खासगी कंपन्यांनी मोबाईल टॉवर उभारले आहेत. या टॉवरवर केवळ टू-जी सेवेची यंत्रणा लावण्यात आली आहे. मात्र थ्री-जी सेवा उपलब्ध असल्याचा दावा करीत आहेत. त्यामुळे ग्राहक थ्री-जीचा इंटरनेट रिचार्ज मारीत आहेत. प्रत्यक्षात मात्र थ्री-जी सेवेची यंत्रणा नसल्याने ग्राहकांना टू-जीची स्पीड उपलब्ध होते. पैसे मात्र थ्री-जी घेतले जातात. ही ग्राहकांची एक प्रकारची लूट सुरू आहे.