शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

२३ केंद्रातून अडीच हजार शिवभोजन थाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:29 IST

चंद्रपूर : मागीलवर्षी कोरोना संकट काळात गोरगरीब तसेच सर्वसामान्य नागरिकांना पाच रुपयांत शिवभोजन थाळी योजना राज्य सरकारने सुरु केली. ...

चंद्रपूर : मागीलवर्षी कोरोना संकट काळात गोरगरीब तसेच सर्वसामान्य नागरिकांना पाच रुपयांत शिवभोजन थाळी योजना राज्य सरकारने सुरु केली. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला. ही योजना यापुढे ही सुरुच राहणार असून नागरिकांना पाच रुपयांत भोजन मिळणार आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत २३ केंद्रातून अडीच हजार थाळींचे वितरण केले जात आहे. त्यामुळे पुन्हा सुरु झालेल्या मिनी लाॅकडाऊनमध्ये गरजूंना लाभ मिळणार आहे.

मागील वर्षी कोरोेनामुळे शिवभोजन थाळीचे दर दहा रुपयांवरून पाच रुपये करण्यात आले होते. एप्रिलपासून पुन्हा दहा रुपये दर केले जाणार होते. मात्र आता पुन्हा राज्य सरकारने शिवभोजन था‌ळी पाच रुपयांमध्येच वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या कोरोना संकटाने पुन्हा तोंड वर काढले आहे. अशावेळी गरीब नागरिकांचे हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिवभोजनाच्या माध्यमातून त्यांना जेवण करता यावे यासाठी पूर्वीप्रमाणे पाच रुपयांत थाळी देण्यात येणार आहे.

या थाळीमध्ये पोळी, भाजी, वरण, भात दिला जातो. मोलमजुरी करणारे मजूर, ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना या शिवभोजन थाळीचा लाभ मिळत आहे. आता मिनी लाॅकडाऊन करण्यात आले आहे. अशावेळी गरजूंना या थाळीचा लाभ होणार आहे.

बाॅक्स

चंद्रपूर शहरात ६ केंद्र

जिल्ह्यात शिवभोजनचे २३ केंद्र असून चंद्रपूर शहरामध्ये सहा केंद्राच्या माध्यमातून शिवभोजन थाळी वितरित केली जात आहे. दरम्यान, बल्लारपूर, घुग्घुसमध्ये प्रत्येकी एक शिवभोजन केंद्र आहे.

बाॅक्स

अधिकाऱ्यांच्या धाडीमुळे दणाणले धाबे

जिल्ह्यात २३ केंद्रातून शिवभोजन थाळी वितरित केली जात आहे. दरम्यान, चंद्रपूर शहरातील एका केंद्रातून शिवभोजन थाळी ऐवजी मसाला भात वितरित केला जात होता. या केंद्रावर अधिकाऱ्यांनी धाड टाकून कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यामुळे अन्य केंद्र संचालकांचे धाबे दणाणले.