शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

झाडीपट्टी नाटकांमधील ५० कोटीची उलाढाल थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:27 IST

गूड बाय २०२० फोटो रवी जवळे/ घनश्याम नवघडे चंद्रपूर : झाडीपट्टी रंगभूमीवर अनेक कुटुंब निर्भर आहे. हिवाळ्यातील सतत चार-पाच ...

गूड बाय २०२०

फोटो

रवी जवळे/ घनश्याम नवघडे

चंद्रपूर : झाडीपट्टी रंगभूमीवर अनेक कुटुंब निर्भर आहे. हिवाळ्यातील सतत चार-पाच महिने ही रंगभूमी लोकांचे करमणूक करीत असते. कलागुणांची मुक्त उधळण करणाºया या रंगभूमी आणि त्यातील कलावंतांसाठी २०२० हे वर्ष ‘काळे वर्ष’ ठरले. कोरोना संसर्गामुळे या रंगभूमी व त्यातील नाटकांच्या सादरीकरणावर अनेक मर्यादा आल्या. त्यामुळे नाटके सादर होऊ शकली नाही. या माध्यमातून होणारी ५० कोटींची उलाढाल यंदा थांबली.

कोरोनामुळे नाटकांच्या प्रयोगांवर अनेक मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाटकांवर एकप्रकारे बंदीच आहे. यामुळे कलावंत आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यासमोरही रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाटक हा कलाप्रकार झाटीपट्टीचा अविभाज्य घटक झाला आहे.''''ज्या गावात नाटक नाही, असा गाव झाडीत नाही'''' ही म्हण गेल्या काही वर्षात झाडीपट्टीत चांगलीच रूढ झाली आहे. नाटकाचा हा सिझन दिवाळीपासून सुरू होतो आणि होळीपर्यंत चालतो. या कालावधीत झाडीपट्टीत समावेश असलेल्या चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यातील प्रत्येक गावात नाटकांचे आयोजन होत असते. काही काही गावात तर दोन दोन नाटकांचे आयोजन होत असते. आता तर नागपूर व वर्धा जिल्ह्यातही नाटकांचे आयोजन सुरू झाले असल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर झाडीपट्टी रंगभूमीने आंध्र प्रदेश व छत्तीसगड राज्यातही आपले अस्तित्व दाखवण्यास सुरूवात केली आहे.

दिवसेंदिवस झाडीपट्टी रंगभूमी आणखी प्रभावी ठरत आहे. चित्रपटगृहांना मिळणार नाही, एवढे प्रेक्षक झाडीपट्टीतील नाटकांना गर्दी करतात. दरवर्षी जवळपास ५० कोटींची उलाढाल या नाटकांमधून होते. मात्र २०२० हे वर्ष या रंगभूमीसाठी एक दु:खद स्वप्न ठरले. कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे शासनाने नाटकांच्या सादरीकरणावर अनेक नियम घालून दिले आहेत. नियमांची पूर्तता करून नाटक सादर करणे शक्य नाही आणि आयोजनकर्त्यांना परवडण्यासारखे नाही. म्हणूनच संपूर्ण झाडीपट्टी रंगभूमी ओस पडली.

बॉक्स

झाडीपट्टीवर हे घटक अवलंबून

झाडीपट्टी रंगभूमीवर विविध भूमिका निभावणाºया निर्माते, कलावंत, वेशभुषाकार, ध्वनी व प्रकाश संयोजक, हार्मोनियम, तबला, क्लाट वादक व इतर संबंधित अनेकांना अर्थप्राप्ती होते, हे सर्वश्रूत आहे. या व्यतिरिक्त अनेक घटक या नाटकांवर अवलंबून आहेत. या घटकांमध्ये नाटक पहायला येणाºया प्रेक्षकांना चणे, फुटाणे, मुरमुरे, शेंगदाणे, चहा, पान विकून आपली उपजिविका चालविणाºया अनेक छोट्या व्यावसायिकांचाही समावेश आहे. आता तर नाटक सुरू होण्यापूर्वी नृत्याच्या आयोजनाचे कार्यक्रम होऊ लागले आहेत. या नृत्य संचामध्येही १० ते १२ कलाकारांचा समावेश असतो. २०२० या वर्षात नाटकांचे आयोजच झाले नसल्याने या कलाकारांसमोरही बिकट परिस्थिती उदभवली आहे.

बॉक्स

५५ नाटय कंपन्या आणि २,५०० प्रयोग

चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात जवळजवळ ५५ नाटक कंपनी आहेत. एक कंपनी एका नाटय प्रयोगासाठी ५५ ते ६० हजार रुपये शुल्क आकारत असते. भाऊबिजेपासून नाटकांचा हा सिझन सुरू होतो आणि तो होळीपर्यंत चालतो. या कालावधीत जवळजवळ २ हजार ५०० प्रयोग होत असल्याची माहिती आहे.

कोट

नाटकांच्या प्रयोगावर घालण्यात आलेल्या मर्यादा कमी करण्यात याव्या, यासाठी आमच्या शिष्टमंडळाने चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली व गोंदिया या चारही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाºयांशी चर्चा केली व निवेदन दिले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. नाटकांवर एकप्रकारे बंदीच असल्यामुळे अनेक कलाकारांवर उपासमारीसारखी परिस्थिती आहे.

- हिरालाल पेंटर, निर्माता, कलाकार

कोट

बहुतेक सर्वच उपक्रम सुरू झाले आहेत. आठवडी बाजार, लग्न समारंभ, मोर्चे, सभा, बस यात तर भरगच्च गर्दी असते. मग नाटकांवरच बंधने का? नाटक तर मोकळ्या जागेत होत असते आणि कोणी कोठेही बसू शकतात. तरीही नाटकांवर मर्यादा घालण्यात आल्या. नाटकांवर मर्यादा घालण्यात आल्याने चार महिन्यात कमावून १२ महिने प्रपंच चालविणाºया नाट्यकलेशी जुळलेल्या प्रत्येकाची आर्थिक कोंडी झाली आहे.

- ज्ञानेश्वरी कापगते, नाटय कलावंत.

कोट

एका नाटक कंपनीत ३० ते ३५ लोक काम करतात. यात सर्वच प्रकारातील लोक आले. अनेक कलाकार व व्यक्ती नाटकांवरच अवलंबून आहेत. नाटक बंद असल्यामुळे पोटाची खडगी भरण्यासाठी त्यांनी इतर धंदे करण्याचा प्रयत्न केला. पण अनेकांना जमले नाही. अनेकांना प्रतिसाद मिळाला नाही.अशांची अवस्था अतिशय हलाखीची आहे. शासनाने नाटकांवरील मर्यादा हटविण्याची गरज आहे.

- के. आत्माराम, विनोदी कलावंत, झाडीपट्टी रंगभूमी.