शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

झाडीपट्टी नाटकांमधील ५० कोटीची उलाढाल थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:27 IST

गूड बाय २०२० फोटो रवी जवळे/ घनश्याम नवघडे चंद्रपूर : झाडीपट्टी रंगभूमीवर अनेक कुटुंब निर्भर आहे. हिवाळ्यातील सतत चार-पाच ...

गूड बाय २०२०

फोटो

रवी जवळे/ घनश्याम नवघडे

चंद्रपूर : झाडीपट्टी रंगभूमीवर अनेक कुटुंब निर्भर आहे. हिवाळ्यातील सतत चार-पाच महिने ही रंगभूमी लोकांचे करमणूक करीत असते. कलागुणांची मुक्त उधळण करणाºया या रंगभूमी आणि त्यातील कलावंतांसाठी २०२० हे वर्ष ‘काळे वर्ष’ ठरले. कोरोना संसर्गामुळे या रंगभूमी व त्यातील नाटकांच्या सादरीकरणावर अनेक मर्यादा आल्या. त्यामुळे नाटके सादर होऊ शकली नाही. या माध्यमातून होणारी ५० कोटींची उलाढाल यंदा थांबली.

कोरोनामुळे नाटकांच्या प्रयोगांवर अनेक मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाटकांवर एकप्रकारे बंदीच आहे. यामुळे कलावंत आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यासमोरही रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाटक हा कलाप्रकार झाटीपट्टीचा अविभाज्य घटक झाला आहे.''''ज्या गावात नाटक नाही, असा गाव झाडीत नाही'''' ही म्हण गेल्या काही वर्षात झाडीपट्टीत चांगलीच रूढ झाली आहे. नाटकाचा हा सिझन दिवाळीपासून सुरू होतो आणि होळीपर्यंत चालतो. या कालावधीत झाडीपट्टीत समावेश असलेल्या चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यातील प्रत्येक गावात नाटकांचे आयोजन होत असते. काही काही गावात तर दोन दोन नाटकांचे आयोजन होत असते. आता तर नागपूर व वर्धा जिल्ह्यातही नाटकांचे आयोजन सुरू झाले असल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर झाडीपट्टी रंगभूमीने आंध्र प्रदेश व छत्तीसगड राज्यातही आपले अस्तित्व दाखवण्यास सुरूवात केली आहे.

दिवसेंदिवस झाडीपट्टी रंगभूमी आणखी प्रभावी ठरत आहे. चित्रपटगृहांना मिळणार नाही, एवढे प्रेक्षक झाडीपट्टीतील नाटकांना गर्दी करतात. दरवर्षी जवळपास ५० कोटींची उलाढाल या नाटकांमधून होते. मात्र २०२० हे वर्ष या रंगभूमीसाठी एक दु:खद स्वप्न ठरले. कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे शासनाने नाटकांच्या सादरीकरणावर अनेक नियम घालून दिले आहेत. नियमांची पूर्तता करून नाटक सादर करणे शक्य नाही आणि आयोजनकर्त्यांना परवडण्यासारखे नाही. म्हणूनच संपूर्ण झाडीपट्टी रंगभूमी ओस पडली.

बॉक्स

झाडीपट्टीवर हे घटक अवलंबून

झाडीपट्टी रंगभूमीवर विविध भूमिका निभावणाºया निर्माते, कलावंत, वेशभुषाकार, ध्वनी व प्रकाश संयोजक, हार्मोनियम, तबला, क्लाट वादक व इतर संबंधित अनेकांना अर्थप्राप्ती होते, हे सर्वश्रूत आहे. या व्यतिरिक्त अनेक घटक या नाटकांवर अवलंबून आहेत. या घटकांमध्ये नाटक पहायला येणाºया प्रेक्षकांना चणे, फुटाणे, मुरमुरे, शेंगदाणे, चहा, पान विकून आपली उपजिविका चालविणाºया अनेक छोट्या व्यावसायिकांचाही समावेश आहे. आता तर नाटक सुरू होण्यापूर्वी नृत्याच्या आयोजनाचे कार्यक्रम होऊ लागले आहेत. या नृत्य संचामध्येही १० ते १२ कलाकारांचा समावेश असतो. २०२० या वर्षात नाटकांचे आयोजच झाले नसल्याने या कलाकारांसमोरही बिकट परिस्थिती उदभवली आहे.

बॉक्स

५५ नाटय कंपन्या आणि २,५०० प्रयोग

चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात जवळजवळ ५५ नाटक कंपनी आहेत. एक कंपनी एका नाटय प्रयोगासाठी ५५ ते ६० हजार रुपये शुल्क आकारत असते. भाऊबिजेपासून नाटकांचा हा सिझन सुरू होतो आणि तो होळीपर्यंत चालतो. या कालावधीत जवळजवळ २ हजार ५०० प्रयोग होत असल्याची माहिती आहे.

कोट

नाटकांच्या प्रयोगावर घालण्यात आलेल्या मर्यादा कमी करण्यात याव्या, यासाठी आमच्या शिष्टमंडळाने चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली व गोंदिया या चारही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाºयांशी चर्चा केली व निवेदन दिले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. नाटकांवर एकप्रकारे बंदीच असल्यामुळे अनेक कलाकारांवर उपासमारीसारखी परिस्थिती आहे.

- हिरालाल पेंटर, निर्माता, कलाकार

कोट

बहुतेक सर्वच उपक्रम सुरू झाले आहेत. आठवडी बाजार, लग्न समारंभ, मोर्चे, सभा, बस यात तर भरगच्च गर्दी असते. मग नाटकांवरच बंधने का? नाटक तर मोकळ्या जागेत होत असते आणि कोणी कोठेही बसू शकतात. तरीही नाटकांवर मर्यादा घालण्यात आल्या. नाटकांवर मर्यादा घालण्यात आल्याने चार महिन्यात कमावून १२ महिने प्रपंच चालविणाºया नाट्यकलेशी जुळलेल्या प्रत्येकाची आर्थिक कोंडी झाली आहे.

- ज्ञानेश्वरी कापगते, नाटय कलावंत.

कोट

एका नाटक कंपनीत ३० ते ३५ लोक काम करतात. यात सर्वच प्रकारातील लोक आले. अनेक कलाकार व व्यक्ती नाटकांवरच अवलंबून आहेत. नाटक बंद असल्यामुळे पोटाची खडगी भरण्यासाठी त्यांनी इतर धंदे करण्याचा प्रयत्न केला. पण अनेकांना जमले नाही. अनेकांना प्रतिसाद मिळाला नाही.अशांची अवस्था अतिशय हलाखीची आहे. शासनाने नाटकांवरील मर्यादा हटविण्याची गरज आहे.

- के. आत्माराम, विनोदी कलावंत, झाडीपट्टी रंगभूमी.