शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

मिनी मंत्रालयात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न

By admin | Updated: July 12, 2014 23:34 IST

उपविभागीय अधिकारी म्हणून काम करताना क्षेत्र मर्यादित होते. आता जिल्हा परिषदेत अनेक विभाग आहेत. ग्रामीण भागातील नाळ या संस्थेशी जुळून आहे. त्यामुळे या मिनी मंत्रालयाच्या

मीट द प्रेस : सीईओ सलील यांची माहितीचंद्रपूर : उपविभागीय अधिकारी म्हणून काम करताना क्षेत्र मर्यादित होते. आता जिल्हा परिषदेत अनेक विभाग आहेत. ग्रामीण भागातील नाळ या संस्थेशी जुळून आहे. त्यामुळे या मिनी मंत्रालयाच्या कारभारात पारदर्शकता आणण्याचा आपला प्रयत्न आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलील यांनी स्पष्ट केले.चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आज शनिवारी पत्रकार संघाच्या सभागृहात सीईओ आशुतोष सलील यांची मीट द प्रेस आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर, सचिव मंगेश खाटिक उपस्थित होते.यावेळी आशुतोष सलील पुढे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातच उपविभागीय अधिकारी म्हणून काम करीत असताना आपण आपल्या कामात पारदर्शकता ठेवली होती. आता सीईओ म्हणून जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. जिल्हा परिषदेत येणाऱ्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली जात आहे. एखाद्याची आपणाकडे तक्रारी आली की ती मी नोंद करून घेतो. त्यानंतर संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांशी त्या तक्रारीसंदर्भात चर्चा करतो. याशिवाय आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी प्रत्येक विभाग प्रमुखांची बैठक घेऊन त्यांच्या विभागाचा आढावा घेतला जातो. जिल्हा परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. येथे प्रत्येक गोष्टीत पदाधिकाऱ्यांची भूमिका व त्यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरते. आपल्याला ज्या गतीने विकासकामे करायची आहेत, त्या गतीने जिल्हा परिषदेच्या यंत्रणेला धावायला वेळ लागेल. तरीही आपल्याकडून यासाठी जोरदार प्रयत्न केला जात आहे. मात्र यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.जिल्हा परिषदेमध्ये रुजू झाल्यापासून आपण काही विभागाकडे प्राधान्याने लक्ष केंद्रीय केले आहे. त्यातील एक विभाग आरोग्य विभाग आहे. या विभागात अनेक समस्या आहेत.ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांबाबत अनेक तक्रारी आहेत. त्या सोडविण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न केला जात आहे.यावेळी आशुतोष सलील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचीही समर्पक उत्तरे दिली. काम करताना स्वच्छ प्रतिमेचा फायदा होतो की तोटा, या प्रश्नावर त्यांनी फायदाच होत असल्याचे सांगितले. मात्र काम करताना प्रशंसा होते, तशी काही वेळा खरडपट्टीही काढली जाते, हेही आवर्जुन सांगितले. (शहर प्रतिनिधी)