शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी साहित्य हे त्यांच्या व्यथा व वेदनांचे गोंदण

By admin | Updated: December 29, 2014 23:39 IST

आदिवासी साहित्य हे त्यांच्या व्यथा, वेदनांचे गोंदण आहे. नक्षलवाद ही त्या गोंदणावरील चुकलेली रेषा आहे. पोलीस व नक्षलवादी यांच्या चकमकीत मरणारा आदिवासीच असतो.

चंद्रपूर : आदिवासी साहित्य हे त्यांच्या व्यथा, वेदनांचे गोंदण आहे. नक्षलवाद ही त्या गोंदणावरील चुकलेली रेषा आहे. पोलीस व नक्षलवादी यांच्या चकमकीत मरणारा आदिवासीच असतो. ही सामाजिक आत्मभान देणारी बाब सर्व आदिवासी लेखक कवींनी विसरता कामा नये, असे प्रतिपादन डॉ. राजन जयस्वाल यांनी केले. स्थानिक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय सभागृहात शनिवारी अशोक तुमराम यांच्या ‘मी, गिरिकन्या आणि रानपाखरं..’ या कविता संग्रहाचे प्रकाशन डॉ. राजन जयस्वाल यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी प्रसेनजीत गायकवाड होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्रा.श्रीकांत पाटील, प्रा. डॉ. शाम मोहरकर उपस्थितीत होते.कविता संग्रहाचे मूल्यमापन करताना प्रा. श्रीकांत पाटील म्हणाले, तुमराम यांच्या कविता लयबद्ध व साकार शब्दरूप घेऊन अवतीर्ण झाल्या आहेत. हे त्यांच्या कवितेचे पुढील पाऊल आहे, असे सांगितले. डॉ. शाम मोहरकर यांनी आदिवासी साहित्य हे आजचे नाही तर शतकांपासून बोलीभाषेतील गाणी किंवा सांस्कृतिक लेणे झिरपत आजपर्यंत आले आहे. ती संस्कृती, आजच्या वास्तवातील व्यथा व वेदना नवशिक्षित तरुण व तरुणी आपल्या साहित्यातून मांडू लागलेत. या सर्व साहित्याला मराठी वाङमयाचे निकष लावावे लागतील. अलीकडील आदिवासी साहित्य मराठी भाषेचाच वापर करून लिहिले जात आहे, असे सांगितले.प्रसेनजीत गायकवाड यांनी, आधुनिक काव्यात आंबेडकरी विचारांचे प्रतिबिंब पहावयास मिळते. आंबेडकरी विचारांमुळेच अलीकडील लेखक व कवी लिहू लागले आहेत. त्यांची अंत:प्रेरणा आंबेडकरी विचारधारेने संपृक्त आहे. यासाठी नामदेव ढसाळांपासून ते तुमराम यांच्यापर्यंत दाखले देत, साहित्य चळवळ कशी फोफावत गेली हे उलगडून सांगितले.यावेळी तुमराम यांच्या काही कवितांवर संगीतमय कार्यक्रम कासलीकर व संच यांनी सादर केला. अशोक तुमराम यांनी कवितासंग्रहाची पार्श्वभूमी विशद केली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. रोहिणी निले यांनी केले. तर जमुना तुमराम यांनी आभार प्रदर्शन केले. (स्थानिक प्रतिनिधी)