शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

आदिवासी साहित्य हे त्यांच्या व्यथा व वेदनांचे गोंदण

By admin | Updated: December 29, 2014 23:39 IST

आदिवासी साहित्य हे त्यांच्या व्यथा, वेदनांचे गोंदण आहे. नक्षलवाद ही त्या गोंदणावरील चुकलेली रेषा आहे. पोलीस व नक्षलवादी यांच्या चकमकीत मरणारा आदिवासीच असतो.

चंद्रपूर : आदिवासी साहित्य हे त्यांच्या व्यथा, वेदनांचे गोंदण आहे. नक्षलवाद ही त्या गोंदणावरील चुकलेली रेषा आहे. पोलीस व नक्षलवादी यांच्या चकमकीत मरणारा आदिवासीच असतो. ही सामाजिक आत्मभान देणारी बाब सर्व आदिवासी लेखक कवींनी विसरता कामा नये, असे प्रतिपादन डॉ. राजन जयस्वाल यांनी केले. स्थानिक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय सभागृहात शनिवारी अशोक तुमराम यांच्या ‘मी, गिरिकन्या आणि रानपाखरं..’ या कविता संग्रहाचे प्रकाशन डॉ. राजन जयस्वाल यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी प्रसेनजीत गायकवाड होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्रा.श्रीकांत पाटील, प्रा. डॉ. शाम मोहरकर उपस्थितीत होते.कविता संग्रहाचे मूल्यमापन करताना प्रा. श्रीकांत पाटील म्हणाले, तुमराम यांच्या कविता लयबद्ध व साकार शब्दरूप घेऊन अवतीर्ण झाल्या आहेत. हे त्यांच्या कवितेचे पुढील पाऊल आहे, असे सांगितले. डॉ. शाम मोहरकर यांनी आदिवासी साहित्य हे आजचे नाही तर शतकांपासून बोलीभाषेतील गाणी किंवा सांस्कृतिक लेणे झिरपत आजपर्यंत आले आहे. ती संस्कृती, आजच्या वास्तवातील व्यथा व वेदना नवशिक्षित तरुण व तरुणी आपल्या साहित्यातून मांडू लागलेत. या सर्व साहित्याला मराठी वाङमयाचे निकष लावावे लागतील. अलीकडील आदिवासी साहित्य मराठी भाषेचाच वापर करून लिहिले जात आहे, असे सांगितले.प्रसेनजीत गायकवाड यांनी, आधुनिक काव्यात आंबेडकरी विचारांचे प्रतिबिंब पहावयास मिळते. आंबेडकरी विचारांमुळेच अलीकडील लेखक व कवी लिहू लागले आहेत. त्यांची अंत:प्रेरणा आंबेडकरी विचारधारेने संपृक्त आहे. यासाठी नामदेव ढसाळांपासून ते तुमराम यांच्यापर्यंत दाखले देत, साहित्य चळवळ कशी फोफावत गेली हे उलगडून सांगितले.यावेळी तुमराम यांच्या काही कवितांवर संगीतमय कार्यक्रम कासलीकर व संच यांनी सादर केला. अशोक तुमराम यांनी कवितासंग्रहाची पार्श्वभूमी विशद केली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. रोहिणी निले यांनी केले. तर जमुना तुमराम यांनी आभार प्रदर्शन केले. (स्थानिक प्रतिनिधी)