शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

आदिवासी साहित्य हे त्यांच्या व्यथा व वेदनांचे गोंदण

By admin | Updated: December 29, 2014 23:39 IST

आदिवासी साहित्य हे त्यांच्या व्यथा, वेदनांचे गोंदण आहे. नक्षलवाद ही त्या गोंदणावरील चुकलेली रेषा आहे. पोलीस व नक्षलवादी यांच्या चकमकीत मरणारा आदिवासीच असतो.

चंद्रपूर : आदिवासी साहित्य हे त्यांच्या व्यथा, वेदनांचे गोंदण आहे. नक्षलवाद ही त्या गोंदणावरील चुकलेली रेषा आहे. पोलीस व नक्षलवादी यांच्या चकमकीत मरणारा आदिवासीच असतो. ही सामाजिक आत्मभान देणारी बाब सर्व आदिवासी लेखक कवींनी विसरता कामा नये, असे प्रतिपादन डॉ. राजन जयस्वाल यांनी केले. स्थानिक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय सभागृहात शनिवारी अशोक तुमराम यांच्या ‘मी, गिरिकन्या आणि रानपाखरं..’ या कविता संग्रहाचे प्रकाशन डॉ. राजन जयस्वाल यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी प्रसेनजीत गायकवाड होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्रा.श्रीकांत पाटील, प्रा. डॉ. शाम मोहरकर उपस्थितीत होते.कविता संग्रहाचे मूल्यमापन करताना प्रा. श्रीकांत पाटील म्हणाले, तुमराम यांच्या कविता लयबद्ध व साकार शब्दरूप घेऊन अवतीर्ण झाल्या आहेत. हे त्यांच्या कवितेचे पुढील पाऊल आहे, असे सांगितले. डॉ. शाम मोहरकर यांनी आदिवासी साहित्य हे आजचे नाही तर शतकांपासून बोलीभाषेतील गाणी किंवा सांस्कृतिक लेणे झिरपत आजपर्यंत आले आहे. ती संस्कृती, आजच्या वास्तवातील व्यथा व वेदना नवशिक्षित तरुण व तरुणी आपल्या साहित्यातून मांडू लागलेत. या सर्व साहित्याला मराठी वाङमयाचे निकष लावावे लागतील. अलीकडील आदिवासी साहित्य मराठी भाषेचाच वापर करून लिहिले जात आहे, असे सांगितले.प्रसेनजीत गायकवाड यांनी, आधुनिक काव्यात आंबेडकरी विचारांचे प्रतिबिंब पहावयास मिळते. आंबेडकरी विचारांमुळेच अलीकडील लेखक व कवी लिहू लागले आहेत. त्यांची अंत:प्रेरणा आंबेडकरी विचारधारेने संपृक्त आहे. यासाठी नामदेव ढसाळांपासून ते तुमराम यांच्यापर्यंत दाखले देत, साहित्य चळवळ कशी फोफावत गेली हे उलगडून सांगितले.यावेळी तुमराम यांच्या काही कवितांवर संगीतमय कार्यक्रम कासलीकर व संच यांनी सादर केला. अशोक तुमराम यांनी कवितासंग्रहाची पार्श्वभूमी विशद केली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. रोहिणी निले यांनी केले. तर जमुना तुमराम यांनी आभार प्रदर्शन केले. (स्थानिक प्रतिनिधी)