शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

आदिवासी मुलाचे वसतिगृह समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 22:54 IST

तेलंगणा राज्य व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील शेवटचे तालुका मुख्यालय असलेल्या कोरपना येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील मुलाच्या वसतिगृहात अनेक सुविधांची उणीव आहे. विविध समस्यांचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतो आहे. याकडे मात्र संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देमुलभूत सुविधांचा अभाव : देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष

जयंत जेनेकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : तेलंगणा राज्य व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील शेवटचे तालुका मुख्यालय असलेल्या कोरपना येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील मुलाच्या वसतिगृहात अनेक सुविधांची उणीव आहे. विविध समस्यांचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतो आहे. याकडे मात्र संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.या वसतिगृहातील बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असून ते वसतिगृहात राहून विद्यार्जन करतात. मात्र या वसतिगृहातील अनेक विद्युत दिवे बंद अवस्थेत, पंखे नादुरस्त असल्याने वास्तव्य करताना अडचणी येत आहे. तसेच येथील कुपनलिकेला पाणी कमी आहे. शिवाय अस्वच्छ पाणी येत आहे. तेच पाणी विद्यार्थ्यांना प्यावे लागत आहे. येथील वॉटर कुलर बंद असल्याने गरम पाणी प्यावे लागत आहे. पुढे उन्हाळ्याचे दिवस असल्याने येथील पाण्याची समस्या लक्षात घेता एका नवीन कूपनलिकेची गरज आहे. मात्र ही सुविधा करण्याकडे कुणाचेच लक्ष नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची अडचण कायम आहे. अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय असलेले गिझरही बंद पडले आहे. वसतिगृहातील इमारतीचे दरवाजे, खिडक्या, खाटा तुटल्या आहे. शौचालय, बाथरूममधील शिटस व दरवाजे मोडकळीस आले असून मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येत आहे. हीच परिस्थिती लगतच्या परिसराची आहे. त्यामुळे हिंस्र प्राण्यांचाहीं वावर वाढला आहे. त्यामुळे परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था होणे गरजेचे आहे. वसतिगृह इमारतीवरील पाण्याची टाकी अनेक दिवसांपासून स्वच्छ करण्यात आली नसल्याने त्यात गाळ साचला आहे. तेच पाणी विद्यार्थ्यांना वापरावे लागत आहे.याबाबत अनेकदा वसतिगृह व्यवस्थापनाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र या समस्या आजगायत सूटू न शकल्याने विद्यार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.उदरनिर्वाह भत्ता केवळ ६०० रुपये.राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून महिन्याकाठी केवळ सहाशे रुपये उदरनिर्वाह भत्ता दिला जात असल्याने महागाईच्या काळात विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहणे कठीण होऊन बसले आहे. या सहाशे रुपयात महिनाभराचा मेसचा व इतर खर्च करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांना अनेकदा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यांचा हा उदरनिर्वाह भत्ता वाढत्या महागाईनुसार वाढवण्याची मागणी विद्यार्थ्याकडून होत आहे.