शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी मुलाचे वसतिगृह समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 22:54 IST

तेलंगणा राज्य व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील शेवटचे तालुका मुख्यालय असलेल्या कोरपना येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील मुलाच्या वसतिगृहात अनेक सुविधांची उणीव आहे. विविध समस्यांचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतो आहे. याकडे मात्र संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देमुलभूत सुविधांचा अभाव : देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष

जयंत जेनेकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : तेलंगणा राज्य व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील शेवटचे तालुका मुख्यालय असलेल्या कोरपना येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील मुलाच्या वसतिगृहात अनेक सुविधांची उणीव आहे. विविध समस्यांचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतो आहे. याकडे मात्र संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.या वसतिगृहातील बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असून ते वसतिगृहात राहून विद्यार्जन करतात. मात्र या वसतिगृहातील अनेक विद्युत दिवे बंद अवस्थेत, पंखे नादुरस्त असल्याने वास्तव्य करताना अडचणी येत आहे. तसेच येथील कुपनलिकेला पाणी कमी आहे. शिवाय अस्वच्छ पाणी येत आहे. तेच पाणी विद्यार्थ्यांना प्यावे लागत आहे. येथील वॉटर कुलर बंद असल्याने गरम पाणी प्यावे लागत आहे. पुढे उन्हाळ्याचे दिवस असल्याने येथील पाण्याची समस्या लक्षात घेता एका नवीन कूपनलिकेची गरज आहे. मात्र ही सुविधा करण्याकडे कुणाचेच लक्ष नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची अडचण कायम आहे. अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय असलेले गिझरही बंद पडले आहे. वसतिगृहातील इमारतीचे दरवाजे, खिडक्या, खाटा तुटल्या आहे. शौचालय, बाथरूममधील शिटस व दरवाजे मोडकळीस आले असून मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येत आहे. हीच परिस्थिती लगतच्या परिसराची आहे. त्यामुळे हिंस्र प्राण्यांचाहीं वावर वाढला आहे. त्यामुळे परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था होणे गरजेचे आहे. वसतिगृह इमारतीवरील पाण्याची टाकी अनेक दिवसांपासून स्वच्छ करण्यात आली नसल्याने त्यात गाळ साचला आहे. तेच पाणी विद्यार्थ्यांना वापरावे लागत आहे.याबाबत अनेकदा वसतिगृह व्यवस्थापनाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र या समस्या आजगायत सूटू न शकल्याने विद्यार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.उदरनिर्वाह भत्ता केवळ ६०० रुपये.राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून महिन्याकाठी केवळ सहाशे रुपये उदरनिर्वाह भत्ता दिला जात असल्याने महागाईच्या काळात विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहणे कठीण होऊन बसले आहे. या सहाशे रुपयात महिनाभराचा मेसचा व इतर खर्च करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांना अनेकदा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यांचा हा उदरनिर्वाह भत्ता वाढत्या महागाईनुसार वाढवण्याची मागणी विद्यार्थ्याकडून होत आहे.