शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

वटवृक्ष म्हणजे शाश्वत मिळणारा प्राणवायू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:24 IST

वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. भारतीय समाजजीवनात वटवृक्षाला कुटुंबप्रमुखासारखे मानाचे स्थान आहे, आज सिमेंटची जंगले सातत्याने वाढत असताना जगण्यापुरता आॅक्सिजन आपणास मिळणे आवश्यक असल्याने एक तरी झाड प्रत्येकाने लावावे हा संकल्प सर्वांनी घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महापौर अंजली घोटेकर यांनी केले.

ठळक मुद्देअंजली घोटेकर : महानगरपालिकेचा १००० वटवृक्ष लागवडीचा सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. भारतीय समाजजीवनात वटवृक्षाला कुटुंबप्रमुखासारखे मानाचे स्थान आहे, आज सिमेंटची जंगले सातत्याने वाढत असताना जगण्यापुरता आॅक्सिजन आपणास मिळणे आवश्यक असल्याने एक तरी झाड प्रत्येकाने लावावे हा संकल्प सर्वांनी घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महापौर अंजली घोटेकर यांनी केले.राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड अंतर्गत शिक्षण प्रसारक मंडळ, मूल व चंद्रपूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने एक हजार वटवृक्ष लागवडीचा सोहळा १९ आॅगस्ट रोजी कर्मवीर कन्नमवार प्राथमिक शाळा येथे सकाळी १० वाजता पार पडला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.वटवृक्षांची लागवड करण्याची चांगली कल्पना अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडली असता त्यांनी ती तात्काळ मान्य केली. वृक्षसंवर्धनासोबतच कागद व कापड वाचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. अनेकांना वृक्षलागवड करणे शक्य नसते, अशा व्यक्तींनी किमान परिसरातील आहेत त्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.यावेळी अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे म्हणाले, यावर्षी जिल्ह्यामध्ये ११ हजार वटवृक्ष लावण्याची संकल्पना आहे. याला जिल्हाधिकारी, वनविभाग, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांची साथ लाभते आहे, असेही ते म्हणाले.९० टक्के उद्दिष्ट पूर्णजिल्हाधिकारी कुणाल खेमणार म्हणाले, ३३ कोटी वृक्ष लागवडीत आपल्या जिल्ह्याचा मोठा वाट आहे. एक कोटी ६७ लक्ष वृक्ष आपण लावतोय. ते वृक्ष लावण्याचे काम आता ९० टक्यांवर पोहचले आहे. वृक्षलागवडीसाठी तीन महिन्यांचा कालावधी असला तरी दीड महिन्यातच आपण ९० टक्के उद्दिष्ट गाठले आहे. या व्यतिरिक्त वटवृक्ष लावण्याचे काम आपण हाती घेतले आहे. वटवृक्षाचे माहात्म्य वेगळे आहे, त्याचे आयुष्य व इतरांना आयुष्य देण्याची क्षमता अमर्याद आहे, असे यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीnagaradhyakshaनगराध्यक्ष