शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
5
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
6
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
7
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
8
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
10
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
11
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
12
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
13
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
18
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
19
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
20
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?

राजुरा शहरातील वाहतूक असुरक्षित

By admin | Updated: February 22, 2016 01:14 IST

महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व तेलंगाना या तीन राज्याच्या सीमेवरील राजुरा शहरातून या तिनही राज्याला जोडल्या जाणारे आंतरराज्यीय मार्ग जातात.

गतिरोधकाविना सुसाट धावताहेत वाहने : बांधकाम विभाग व पोलिसांचेही दुर्लक्षसास्ती : महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व तेलंगाना या तीन राज्याच्या सीमेवरील राजुरा शहरातून या तिनही राज्याला जोडल्या जाणारे आंतरराज्यीय मार्ग जातात. मात्र शहरातून जाणाऱ्या या आंतरराज्य मार्गावर किंवा शहरातील विविध चौकात एकही गतिरोधक नसल्याने मोठ्या अपघाताची शक्यता असून नुकत्याच वणी येथे शाळकरी मुलांच्या बसला झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागच नव्हे तर पोलीस प्रशासनही दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.राजुरा शहरातून महाराष्ट्र-आंध्रप्रदेश व महाराष्ट्र- तेलंगाना असे दोन आंतरराज्य मार्ग जातात. या आंतरराज्य मार्गावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. राजुरा परिसरात मोठ्या प्रमाणात वेकोलिच्या कोळसा खाणी आहेत. सोबतच कोल वॉशरीज लगतच्या कोरपना तालुक्यात सिमेंट उद्योग व लगतच्या बल्लारपूर तालुक्यात पेपर मिल आहे. अशा औद्योगिक क्षेत्रामुळे व आंतरराज्य मार्ग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात राजुरा येथून वाहतूक सुरू असते. त्यात जास्तीत जास्त प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक होत असते. मोठमोठे ट्रक, टेलर, सिमेंट व फ्लॉय अ‍ॅश वाहून नेणारे कॅप्सूल, कोळसा वाहतूक करणारे दुरवस्थेत असलेले ट्रक, क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात भरलेल्या लाकडी काड्यांची वाहतूक करणारे ट्रक, प्रवाशी वाहतूक, दुचाकी वाहने अशा विविध प्रकारची वाहतूक शहरातील मुख्य मार्गाने होत असते. त्यामुळे सामान्य नागरिकाला रस्त्यावरुन चालताना जीव मुठीतच घेवून चालावे लागते. परंतु, अशी सगळी परिस्थिती असतानाही शहरातील मुख्य मार्गावर कोणत्याच ठिकाणी गतिरोधक नाहीत, ही एक आश्चर्याचीच बाब आहे. भरधाव वाहतुकीमुळे शहरातील मुख्य चौकात सामान्यांचे नाहक बळी सुद्धा गेलेले आहेत. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासन याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहेत. राजुरा शहरात विविध शाळा व महाविद्यालये आहेत. विद्यार्थ्यांसाठी वेकोलिच्या स्कूल बस, खासगी स्कूल बस, व्हॅन, आॅटो अशा प्रकारचे विविध वाहने धावतात. शाळेच्या वेळात तर यांची रस्त्यावर लगबग असते. त्यातच ही मोठी वाहतूक सुद्धा सुरू असते. शहरातील मुख्य मार्गावर किंवा विविध चौकात गतिरोधक नसल्यामुळे या शाळकरीत विद्यार्थ्यांच्या वाहनांना अपघात झाल्यास वणी येथे शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनास झालेल्या अपघातापेक्षाही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)