शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

३९८ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:28 IST

शासनाचा आदेश धडकल्यानंतर रविवार (दि. २५) पासून जिल्हा परिषद मधील ११ विभागांमध्ये वर्ग ३ कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सुरू करण्यात ...

शासनाचा आदेश धडकल्यानंतर रविवार (दि. २५) पासून जिल्हा परिषद मधील ११ विभागांमध्ये वर्ग ३ कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पहिल्या दिवशी पंचायत, वित्त, कृषी, शिक्षण विभागातील पात्र कर्मचारी बदली प्रक्रियेला सामोरे गेले. सोमवारी बांधकाम, ग्रामीण पाणी पुरवठा, महिला व महिला कल्याण तसेच सामान्य प्रशासन विभाग आणि मंगळवारी आरोग्य, सिंचन व पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रक्रिया पूर्ण झाली. बदलीसाठी पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक प्रमाणपत्रासह जि. प. च्या कन्नमवार सभागृहात दाखल झाले होते.

बॉक्स

असा आहे बदलीचा संवर्ग

जि. प. सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २१४ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, १०१ जणांच्या विनंती, ६६ बिगर नक्षलग्रस्त भागातून नक्षलग्रस्त भागात आणि सहा पंचायत समित्यांमध्ये बिगर नक्षलग्रस्त क्षेत्रात समतोल साधण्यासाठी १५ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय अशा एकूण ३९८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बॉक्स

शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचा तिढा सुटला

गतवर्षीच बदली झालेल्या चार शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी (प्राथमिक) भारमुक्त केले नव्हते. तेव्हापासून हे अधिकारी तेथेच कार्यरत होते. सेवा ज्येष्ठता शून्य दाखविल्याने नवीन बदली प्रक्रिया दरम्यान त्यांची नाराजी होती. अखेर प्रशासनाने यावर नियमानुसार मार्ग काढून चारही शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची बदली केली आहे.

कोट

जि. प. संवर्ग ३ मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया नियमानुसार घेण्यात आली. ही प्रक्रिया पूर्णतः पारदर्शी होती. बदली संदर्भात कुणाच्याही तक्रारी नाहीत. समुपदेशनाद्वारे पात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

-श्याम वाखर्डे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर