शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी गावातील तरुणांना देणार प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 05:00 IST

मानव- वन्यजीव संघर्ष उपाययोजना व इको टुरिझमबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या तीन दिवसांत बैठक घेण्यात येणार आहे. ब्रह्मपुरी-सिंदेवाही परिसरात जंगल सफारी, पर्यटनक्षेत्र व रोजगार संधी उपलब्ध करून देणे आणि संवेदनशील १२५ गावांना दरवर्षी २५ लाखांचा निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत वाघांची संख्या ताडोबापेक्षा जास्त असून, सुमारे १५० गावे अतिसंवेदनशील आहेत. वाघ व बिबट्याचा या गावांमध्ये नित्य संचार असतो. या क्षेत्रात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचल्याने वनविभागाने ठोस उपाययोजना करण्यासोबतच याबाबत तरुणांना प्रशिक्षण देण्याच्या सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी ब्रह्मपुरी येथील आढावा बैठकीत केल्या.यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, बी. एच. हुडा, उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे, तहसीलदार विजय पवार, जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, वनसंरक्षक दलाचे प्रमुख बंडू धोत्रे, राजेश कांबळे  उपस्थित होते.  पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, संवदेनशील १५० गावांतील तरुणांची निवड करावी. वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी किंवा मृत होत आहेत. वाघ जनावरावर हल्ला करतो. आपल्या जनावराला वाचविण्याच्या प्रयत्नात गुराखी वाघाचा प्रतिकार करतो. या संघर्षातून गुराखी वाघाचा शिकार ठरत आहे. मात्र अशावेळी गुराख्यांनी जनावराला सोडून आपला जीव वाचवावा. वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या जनावरांचा मोबदला वनविभागाकडून मिळतो. पण, मानवी जीव जाणार नाही, याचीही खबरदारी घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांकडे बैठकमानव- वन्यजीव संघर्ष उपाययोजना व इको टुरिझमबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या तीन दिवसांत बैठक घेण्यात येणार आहे. ब्रह्मपुरी-सिंदेवाही परिसरात जंगल सफारी, पर्यटनक्षेत्र व रोजगार संधी उपलब्ध करून देणे आणि संवेदनशील १२५ गावांना दरवर्षी २५ लाखांचा निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

मुखर्जी योजना आता १५० गावांत - ब्रह्मपुरी वन क्षेत्रात ११४ वाघ, ११० बिबट्यांचा वावर आहे. वाघांचे स्थानांतरण करण्याबाबत धोरण निश्चित करावे. जनवन विकास योजनेतंर्गत शेतीला सोलर व चॅनलिंग कुंपण करावे, जंगलाला लागून असलेल्या शेतावर जाऊ नये म्हणून त्यासाठी दहा हजारांची मदत, श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेची व्याप्ती वाढवून अतिरिक्त १५० गावांत ही योजना राबविण्यात येईल. वाघाला पळविण्यासाठी विशेष काठी खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारforest departmentवनविभाग