शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी गावातील तरुणांना देणार प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 05:00 IST

मानव- वन्यजीव संघर्ष उपाययोजना व इको टुरिझमबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या तीन दिवसांत बैठक घेण्यात येणार आहे. ब्रह्मपुरी-सिंदेवाही परिसरात जंगल सफारी, पर्यटनक्षेत्र व रोजगार संधी उपलब्ध करून देणे आणि संवेदनशील १२५ गावांना दरवर्षी २५ लाखांचा निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत वाघांची संख्या ताडोबापेक्षा जास्त असून, सुमारे १५० गावे अतिसंवेदनशील आहेत. वाघ व बिबट्याचा या गावांमध्ये नित्य संचार असतो. या क्षेत्रात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचल्याने वनविभागाने ठोस उपाययोजना करण्यासोबतच याबाबत तरुणांना प्रशिक्षण देण्याच्या सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी ब्रह्मपुरी येथील आढावा बैठकीत केल्या.यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, बी. एच. हुडा, उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे, तहसीलदार विजय पवार, जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, वनसंरक्षक दलाचे प्रमुख बंडू धोत्रे, राजेश कांबळे  उपस्थित होते.  पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, संवदेनशील १५० गावांतील तरुणांची निवड करावी. वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी किंवा मृत होत आहेत. वाघ जनावरावर हल्ला करतो. आपल्या जनावराला वाचविण्याच्या प्रयत्नात गुराखी वाघाचा प्रतिकार करतो. या संघर्षातून गुराखी वाघाचा शिकार ठरत आहे. मात्र अशावेळी गुराख्यांनी जनावराला सोडून आपला जीव वाचवावा. वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या जनावरांचा मोबदला वनविभागाकडून मिळतो. पण, मानवी जीव जाणार नाही, याचीही खबरदारी घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांकडे बैठकमानव- वन्यजीव संघर्ष उपाययोजना व इको टुरिझमबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या तीन दिवसांत बैठक घेण्यात येणार आहे. ब्रह्मपुरी-सिंदेवाही परिसरात जंगल सफारी, पर्यटनक्षेत्र व रोजगार संधी उपलब्ध करून देणे आणि संवेदनशील १२५ गावांना दरवर्षी २५ लाखांचा निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

मुखर्जी योजना आता १५० गावांत - ब्रह्मपुरी वन क्षेत्रात ११४ वाघ, ११० बिबट्यांचा वावर आहे. वाघांचे स्थानांतरण करण्याबाबत धोरण निश्चित करावे. जनवन विकास योजनेतंर्गत शेतीला सोलर व चॅनलिंग कुंपण करावे, जंगलाला लागून असलेल्या शेतावर जाऊ नये म्हणून त्यासाठी दहा हजारांची मदत, श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेची व्याप्ती वाढवून अतिरिक्त १५० गावांत ही योजना राबविण्यात येईल. वाघाला पळविण्यासाठी विशेष काठी खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारforest departmentवनविभाग