शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

सिग्नल बंदमुळे वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:28 IST

चंद्रपूर : शहरातील मिलन चौक तसेच इतर काही चौकांतील वाहतूक दिवे बंद असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. याकडे ...

चंद्रपूर : शहरातील मिलन चौक तसेच इतर काही चौकांतील वाहतूक दिवे बंद असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. याकडे वाहतूक शाखेने लक्ष देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, गांधी चौकाकडे येणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने येथे नेहमी वाहतूक कोंडी होत आहे. पोलीस प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी सिग्नल सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

जिल्ह्यातील पाएंदरस्ते झाले निमुळते

चंद्रपूर : येथून जवळच असलेल्या छोटा नागपूर, दाताळा, कोसारा, शिवनी, मार्डा परिसरातील पाणंद रस्ते अगदीच निमुळते झाले आहेत. विशेष म्हणजे, काही शेतकऱ्यांनी शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावरच कुंपण केल्यामुळे अन्य शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाणे कठीण झाले आहे. संबंधितांनी लक्ष देवून शेताकडे जाणारे रस्ते मोकळे करावे, अशी मागणी होत आहे.

बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग ठेवणे गरजेचे आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना केल्या जात आहेत. असे असतानाही काही किराणा दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स न पाळता जीवनावश्यक साहित्याची खरेदी केली जात आहे. त्यामुळे वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, गोल बाजारातील बहुतांश दुकानदार याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

शिक्षकांच्या मेसेजमुळे पालकांत संताप

चंद्रपूर : अनेक शाळांत ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू झाला आहे. मात्र, नियमित येणाऱ्या अभ्यासक्रमाच्या मेसेजमुळे पालक वैतागले आहेत. शिक्षक मोबाईलवर मेसेज पाठवून मोकळे होत आहेत. शिक्षकांच्या मेसेजमुळे आता पालक वैतागले आहेत. मोबाईलचे काम असतानाच पाल्यांना मोबाईल द्यावा लागत आहे. विशेष म्हणजे, मोबाईल मुलाजवळ राहत असल्याने मुलांनाही आता कंटाळा आला आहे.

विरंगुळा केंद्र सुरू करण्याची मागणी

चंद्रपूर : येथील तुळशीनगर परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. मात्र, या जागेवर नामफलकाशिवाय काहीच नसल्यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे या केंदात सुविधा पुरवून केंद्र अद्ययावत करावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

पडोली परिसरातील रस्ता दुभाजकाची दुरवस्था

चंद्रपूर : इरई नदी ते पडोली परिसरात असलेल्या रस्ता दुभाजकाची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी झुडपे वाढले असून कडेला रेतीही साचली आहे. त्यामुळे या परिसरात अपघाताची शक्यता आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देवून दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.

नियमित लाईनमन नसल्याने त्रास

चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश गावांत लाईमनकडे अनेक गावांचा पदभार आहे. ग्रामीण भागामध्ये वीज जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लाईनमन द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

मास्क विक्रीतून रोजगार

चंद्रपूर : लॉकडाऊननंतर प्रशासनाने व्यवहार करण्यावर सूट दिल्यानंतर बाजारपेठ खुली झाली आहे. यामध्ये काही छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी मास्क विक्रीचा नवा व्यवसाय सुरू करून यातून रोजगार मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.