शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

सिग्नल बंदमुळे वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:28 IST

चंद्रपूर : शहरातील मिलन चौक तसेच इतर काही चौकांतील वाहतूक दिवे बंद असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. याकडे ...

चंद्रपूर : शहरातील मिलन चौक तसेच इतर काही चौकांतील वाहतूक दिवे बंद असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. याकडे वाहतूक शाखेने लक्ष देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, गांधी चौकाकडे येणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने येथे नेहमी वाहतूक कोंडी होत आहे. पोलीस प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी सिग्नल सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

जिल्ह्यातील पाएंदरस्ते झाले निमुळते

चंद्रपूर : येथून जवळच असलेल्या छोटा नागपूर, दाताळा, कोसारा, शिवनी, मार्डा परिसरातील पाणंद रस्ते अगदीच निमुळते झाले आहेत. विशेष म्हणजे, काही शेतकऱ्यांनी शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावरच कुंपण केल्यामुळे अन्य शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाणे कठीण झाले आहे. संबंधितांनी लक्ष देवून शेताकडे जाणारे रस्ते मोकळे करावे, अशी मागणी होत आहे.

बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग ठेवणे गरजेचे आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना केल्या जात आहेत. असे असतानाही काही किराणा दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स न पाळता जीवनावश्यक साहित्याची खरेदी केली जात आहे. त्यामुळे वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, गोल बाजारातील बहुतांश दुकानदार याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

शिक्षकांच्या मेसेजमुळे पालकांत संताप

चंद्रपूर : अनेक शाळांत ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू झाला आहे. मात्र, नियमित येणाऱ्या अभ्यासक्रमाच्या मेसेजमुळे पालक वैतागले आहेत. शिक्षक मोबाईलवर मेसेज पाठवून मोकळे होत आहेत. शिक्षकांच्या मेसेजमुळे आता पालक वैतागले आहेत. मोबाईलचे काम असतानाच पाल्यांना मोबाईल द्यावा लागत आहे. विशेष म्हणजे, मोबाईल मुलाजवळ राहत असल्याने मुलांनाही आता कंटाळा आला आहे.

विरंगुळा केंद्र सुरू करण्याची मागणी

चंद्रपूर : येथील तुळशीनगर परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. मात्र, या जागेवर नामफलकाशिवाय काहीच नसल्यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे या केंदात सुविधा पुरवून केंद्र अद्ययावत करावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

पडोली परिसरातील रस्ता दुभाजकाची दुरवस्था

चंद्रपूर : इरई नदी ते पडोली परिसरात असलेल्या रस्ता दुभाजकाची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी झुडपे वाढले असून कडेला रेतीही साचली आहे. त्यामुळे या परिसरात अपघाताची शक्यता आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देवून दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.

नियमित लाईनमन नसल्याने त्रास

चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश गावांत लाईमनकडे अनेक गावांचा पदभार आहे. ग्रामीण भागामध्ये वीज जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लाईनमन द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

मास्क विक्रीतून रोजगार

चंद्रपूर : लॉकडाऊननंतर प्रशासनाने व्यवहार करण्यावर सूट दिल्यानंतर बाजारपेठ खुली झाली आहे. यामध्ये काही छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी मास्क विक्रीचा नवा व्यवसाय सुरू करून यातून रोजगार मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.