शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

गोवर्धन पूजेची परंपरा आजही कायम

By admin | Updated: November 11, 2015 00:42 IST

येथून जवळच असलेल्या निंबाळा, घोट, हेटी व चालबर्डी या चार गावांच्या सीमेवर बलिप्रतिपदेला गोवर्धन पूजा करण्यात येते.

गोवारी समाजाची प्रथा : चार गावांच्या सीमेवर होते आयोजनवतण लोणेघोडपेठयेथून जवळच असलेल्या निंबाळा, घोट, हेटी व चालबर्डी या चार गावांच्या सीमेवर बलिप्रतिपदेला गोवर्धन पूजा करण्यात येते. ऐतिहासिक वारसा लाभलेली ही गोवर्धन पूजा येथील आदिवासी गोवारी समाजातर्फे आजही तितक्याच श्रध्देने व पारंपारिक पध्दतीने साजरी केली जाते.परिसरातील चपराडा, चालबर्डी, घोट, निंबाळा, हेटी, लोणारा (गोंड), लोणारा (पारखी), कचराळा, मानोरा, मोहबाळा व इतर अशा जवळपास १० ते १२ गावांमधील ‘गो’ पाल आपल्या गायी गोवर्धन पूजेसाठी याठिकाणी घेवून येतात. अंदाजे चारशे वर्षांपेक्षाही जुनी असलेली परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने सुरू आहे, असे जाणकार सांगतात.भद्रावती तालुक्यातील निंबाळा, घोट, हेटी व चालबर्डी ही गावे घोडपेठ पासून उत्तरेस चार किमी अंतरावर आहेत. या गावांमध्ये बहुतांश आदिवासी गोवारी समाजाचे लोक राहतात. गायी राखणे हा गोवारी समाजाच्या लोकांचा पारंपरिक व्यवसाय आहे. भगवान श्रीकृष्णाला आपले आराध्य दैवत मानणारे हे लोक गायींची तितक्याच भक्तिभावाने पूजा करून तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.दीपावलीच्या चौथ्या दिवशी बलिप्रतिपदेला गोवर्धन पूजेचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी सकाळी घरी गाईंची पूजा केली जाते. त्यानंतर सार्वजनिक पुजेसाठी गायींना गोवर्धन पूजा पटांगणावर आणले जाते. या पटांगणावर साधारणत: पंचवीस ते तीस टोपले शेणापासून एक मोठी भुरसी बनविण्यात येते. गोवर्धन पुजेमध्ये या भुरसीला अनन्यसाधारण महत्व आहे. या भुरसीमध्ये एक अंडे व कोंबडीचे लहान जिवंत पिल्लू ठेवण्यात येते. पिलाचे धड शेणामध्ये दाबलेले असते व मानेचा भाग खुला ठेवण्यात येतो. तसेच अंदाजे एक फुटाच्या अकरा काड्यांचे अंडे व पिल्लाच्या सभोवती कुंपण करण्यात येते. या काड्या पाच प्रकारच्या झाडांच्या असतात.यावर गुलाबी रंगाची रिबीन गुंडाळून एखाद्या सुवासिनीची ओटी भरतात, त्याप्रमाणे खणा नारळाने भुरसीची ओटी भरण्यात येते. यावेळी गोवारी समाजातील लोक आपापल्या ढालीचे पूजन करतात. २० ते २५ फूट लांबीच्या काठीवर लाकडी पाटा बसवून ढाल तयार केली जाते. ही ढाल गोवारी समाजाच्या ध्वजाचे प्रतीक असते. यानंतर गोवर्धन पूजेला सुरूवात होते.आदिवासी गोवारी समाजाच्या प्रथेनुसार आधी चारही गावांच्या शिवारांची (सीमेची) व शिवारामध्ये असलेल्या देवांची पूजा करण्यात येते. या पूजेला ‘शिव बांधणे’ असे म्हणतात. त्यानंतर पटांगणाशेजारी असलेल्या वाघोबाच्या मूतीर्ची व नंतर आराध्य दैवत श्रीकृष्णाची पूजा करण्यात येते. पवित्र मंत्र म्हणून व नारळ फोडून भुरसीची पूजा करण्यात येते. यानंतर अंडे व जिवंत पिल्लू असणाऱ्या भुरसीवरून कळपाने गायींना सोडण्यात येते. नंतर पिल्लू व अंडे भुरसीबाहेर काढण्यात येते. पण अंडे व पिल्लू यांना इजा झालेली नसते. अंडे व पिल्लू यांना इजा होऊच शकत नाही असा येथील लोकांचा दावा आहे. त्यामुळे ही परंपरा येथील लोकांनी आजही कायम ठेवली आहे.