शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून काँग्रेस-राकॉची संयुक्त किसान संघर्ष यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2017 00:26 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे आश्वासन देवूनही प्रत्यक्षात मात्र त्याकडे पाठ फिरविणाऱ्या राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात विरोधक एकत्रित आले आहेत.

कर्जमुक्तीसाठी पाऊल : ९२ विरोधी आमदारांचा सहभाग चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे आश्वासन देवूनही प्रत्यक्षात मात्र त्याकडे पाठ फिरविणाऱ्या राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात विरोधक एकत्रित आले आहेत. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रसने संयुक्त किसान संघर्ष यात्रा काढण्याचे ठरविले असून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अर्थात २९ मार्चला सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव जाठ येथून ही यात्रा निघणार आहे.सहा दिवसांची ही संघर्ष यात्रा विदर्भात फिरून पनवेल येथे समाप्त होणार आहे. यात्रेचा हा पहिला टप्पा असून यात काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रस पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, रिपाई मिळून एकूण ९२ आमदार सहभागी होत असल्याची माहिती विधानसभेतील काँग्रसचे उप गटनेते तथा आमदार विजय वड़ेट्टीवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, या यात्रेत माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राकाँ नेते धनंजय मुंडे, अजित पवार, सुनील तटकरे आदी प्रामुख्याने सहभागी होणार आहेत. तीन टप्प्यात सहा-सहा दिवसांची ही संर्घष यात्रा राहणार असून राज्यातील १५० विधानसभा क्षेत्रात फिरून शेतकऱ्यांच्या भेटी घेणार आहे. या दरम्यान राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेवर ही मंडळी प्रकाश टाकणार आहेत. पहिल्या टप्प्यात चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, नागपूर, अमरावती आदी जिल्ह्यातून ही संघर्ष यात्रा जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात सिंधुदुर्ग येथून या यात्रेला प्रारंभ होणार आहे. सरकारवर टीका करताना आमदार वडेट्टीवार म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणणारे सरकार आता आपल्या भूमिकेपासून माघारले. त्याचा निषेध करणाऱ्या आमदारांना निलंबित करून आवाज दडपण्याचा प्रयत्न सरकारने केला. विरोधी बाकावर असताना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार विरोधी बाकावर असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन सरकारला पाठविले होते. आता ही मंडळी सरकारात असताना आपली भूमिका का विसरत आहेत, असा टोलाही त्यांनी मारला. पत्रकार परिषदेला माजी आमदार सुभाष धोटे, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, आसावरी देवतळे, रजनी हजारे आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)