शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मेंहदी लावण्याच्या हातावर सॅनिटायझर चोळण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:29 IST

साधारणत: दिवाळीपासूनच लग्नकार्याला सुरुवात होते. मार्च ते मे या महिन्यांत मोठ्या प्रमाणात लग्नसोहळे पार पडत असतात. मागील वर्षी कोरोनाचा ...

साधारणत: दिवाळीपासूनच लग्नकार्याला सुरुवात होते. मार्च ते मे या महिन्यांत मोठ्या प्रमाणात लग्नसोहळे पार पडत असतात. मागील वर्षी कोरोनाचा शिरकाव झाला होता. परंतु, ५० लोकांची परवानगी असल्याने काही प्रमाणात लग्नसोहळे पार पडले. परंतु, सप्टेंबरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली होती. सर्व सुरळीत सुरू झाले. त्यामुळे सहा महिन्यांपासून वधू-वर पित्यांनी विवाहाची तारीख निश्चित करून मंगल कार्यालय बुक केले होते. लग्नसराईची लगबग व धावपळही बऱ्याच प्रमाणात सुरू होती. मात्र, मार्च महिन्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढीस लागली. त्यामुळे शासनाने लॉकडाऊन व कडक निर्बंध लागू करण्यात आले. त्यामुळे वधू-वर पित्यांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.

बॉक्स

आनंदावर विरजण

कोरोनामुळे घराच्या बाहेर निघण्यास बंदी आहे. त्यामुळे विवाहाच्या निमित्ताने अनेकांनी पत्रिका, कपड्याचे बस्ते व विविध प्रकारची तयारी केली होती. वधू-वरही आपापल्या परीने तयारीला लागले होते. अशातच लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे विवाहयोग्य युवक-युवतींच्या आनंदावर विरजण पडले आहे.

बॉक्स

व्यावसायिकांचे नुकसान

विवाह सोहळे रद्द झाल्याने कपडा, सोने, सौंदर्यप्रसाधने, मंगल कार्यालय, बँड, कैटरिंग, आचारी, बांगड्या, भांडी, फर्निचर यांच्यासह, आदी दुकानावर परिणाम पडला. त्यामुळे ऐन कमाईच्या सिझनमध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.