शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

क्वासी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 22:58 IST

बल्लारपूर रेल्वे स्टेशन येथील रेल्वे कॅन्टीन बंद केल्यामुळे कॅन्टीन चालविणारे क्वासी कर्मचारी व कॅन्टीनमध्ये काम करणारे सेल्समॅन, व कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्देदोन वर्षांपासून कॅन्टीन बंद : बल्लारपूर रेल्वेस्थाकावरील कँन्टीन सुरू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बल्लारपूर रेल्वे स्टेशन येथील रेल्वे कॅन्टीन बंद केल्यामुळे कॅन्टीन चालविणारे क्वासी कर्मचारी व कॅन्टीनमध्ये काम करणारे सेल्समॅन, व कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कॅन्टीन सुरु करावी, अन्यथा सोमवारपासून बल्लारपूर रेल्वे स्थानकासमोर उपोषण करण्याचा इशारा चंद्रपूर प्रेस क्लबध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पीडित क्वासी कर्मचारी अनतप्पा तमन्ना वाकटी व आदर्श मीडिया असोसिएशनच्या प्रदेश अध्यक्ष प्रिया झांबरे यांनी दिला.सन १९९९ मध्ये अनतप्पा वाकटी यांची बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर क्वासी कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. सन २००० मध्ये त्यांना सर्व सोई सुविधा पुरविण्यात आल्या. सन २००५ मध्ये त्यांना स्थायी करण्याचे पत्र प्रशासनाने पाठविले. दरम्यान त्यांच्या कागदपत्राची तपासणी करण्यात आली. परंतु, त्यांना स्थायी करण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी रेल्वे स्टेशनवर कॅन्टीन सुरु करुन आपला उदरनिर्वाह सुरु केला. दरम्यान रेल्वे स्टेशनवर वीआयपी प्रतीक्षालयाची स्थापना करण्याचे पत्र आल्यानंतर ती कॅन्टीन बंद करण्यात आली. त्याठिकाणी प्रतीक्षालयाच्या बांधकाम करण्यास सुरुवात केली. यावेळी कॅन्टीनसाठी दुसरी जागा देणे अनिवार्य असताना त्यांनी कोणतीही जागा उपलब्ध करुन दिली नाही. दरम्यान सदर जागा प्रतिक्षालयासाठी कमी पडत असल्याने दुसऱ्या ठिकाणी प्रतीक्षाल बांधावे, अशा सुचना वरिष्ठ अधिकाऱ्यानी रेल्वे विभागाला दिल्या. तेव्हा कँटिंगच्या जागेवर पूर्ववत कँटिंग सुरु करायला हवे होते. मात्र रेल्वे विभागाने तसे केले नाही. परिणामी सन २०१७ पासून कॅन्टीन बंद आहे. तेव्हापासून क्वॉसी कर्मचारी व कॅटिंगमध्ये काम करणारे सेल्समेन बेकार आहेत.क्वॉसी कर्मचारी वाकटी पत्रकार परिषदेत म्हणाले, अनेक विभागाना निवेदनातून समस्या सोडविण्याची मागणी केली. परंतु, कोणीही दखल घेतली नाही. एकीकडे सरकार बेरोजगारांना रोजगार देण्याची घोषणा करते. तर दुसरीकडे बेरोजगार करीत आहे. त्यामुळे आपण चंद्रशेखर तुरकर यांच्यासमेवत उपोषणाला बसणार असल्याची माहिती दिली.कॅन्टीन नसणारे जंक्शनरेल्वे प्रवासी व कर्मचाऱ्यांना सोईचे व्हावे यासाठी रेल्वेस्टेशनवर कँटिंगवर छोटी-मोठी कँटिंग असते. मात्र बल्लारपूर जक्शन याला अपवाद आहे. बल्लारपूर जक्शनवर सुपरफास्ट एक्सप्रेस, एक्सप्रेस अशा अनेक रेल्वेगाड्या थांबतात. त्यामुळे याठिकाणावरुन मोठ्या प्रमाणात प्रवासी बसत व उतरत असतात. त्यामुळे कँटिंगची गरज आहे.