शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

क्वासी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 22:58 IST

बल्लारपूर रेल्वे स्टेशन येथील रेल्वे कॅन्टीन बंद केल्यामुळे कॅन्टीन चालविणारे क्वासी कर्मचारी व कॅन्टीनमध्ये काम करणारे सेल्समॅन, व कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्देदोन वर्षांपासून कॅन्टीन बंद : बल्लारपूर रेल्वेस्थाकावरील कँन्टीन सुरू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बल्लारपूर रेल्वे स्टेशन येथील रेल्वे कॅन्टीन बंद केल्यामुळे कॅन्टीन चालविणारे क्वासी कर्मचारी व कॅन्टीनमध्ये काम करणारे सेल्समॅन, व कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कॅन्टीन सुरु करावी, अन्यथा सोमवारपासून बल्लारपूर रेल्वे स्थानकासमोर उपोषण करण्याचा इशारा चंद्रपूर प्रेस क्लबध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पीडित क्वासी कर्मचारी अनतप्पा तमन्ना वाकटी व आदर्श मीडिया असोसिएशनच्या प्रदेश अध्यक्ष प्रिया झांबरे यांनी दिला.सन १९९९ मध्ये अनतप्पा वाकटी यांची बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर क्वासी कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. सन २००० मध्ये त्यांना सर्व सोई सुविधा पुरविण्यात आल्या. सन २००५ मध्ये त्यांना स्थायी करण्याचे पत्र प्रशासनाने पाठविले. दरम्यान त्यांच्या कागदपत्राची तपासणी करण्यात आली. परंतु, त्यांना स्थायी करण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी रेल्वे स्टेशनवर कॅन्टीन सुरु करुन आपला उदरनिर्वाह सुरु केला. दरम्यान रेल्वे स्टेशनवर वीआयपी प्रतीक्षालयाची स्थापना करण्याचे पत्र आल्यानंतर ती कॅन्टीन बंद करण्यात आली. त्याठिकाणी प्रतीक्षालयाच्या बांधकाम करण्यास सुरुवात केली. यावेळी कॅन्टीनसाठी दुसरी जागा देणे अनिवार्य असताना त्यांनी कोणतीही जागा उपलब्ध करुन दिली नाही. दरम्यान सदर जागा प्रतिक्षालयासाठी कमी पडत असल्याने दुसऱ्या ठिकाणी प्रतीक्षाल बांधावे, अशा सुचना वरिष्ठ अधिकाऱ्यानी रेल्वे विभागाला दिल्या. तेव्हा कँटिंगच्या जागेवर पूर्ववत कँटिंग सुरु करायला हवे होते. मात्र रेल्वे विभागाने तसे केले नाही. परिणामी सन २०१७ पासून कॅन्टीन बंद आहे. तेव्हापासून क्वॉसी कर्मचारी व कॅटिंगमध्ये काम करणारे सेल्समेन बेकार आहेत.क्वॉसी कर्मचारी वाकटी पत्रकार परिषदेत म्हणाले, अनेक विभागाना निवेदनातून समस्या सोडविण्याची मागणी केली. परंतु, कोणीही दखल घेतली नाही. एकीकडे सरकार बेरोजगारांना रोजगार देण्याची घोषणा करते. तर दुसरीकडे बेरोजगार करीत आहे. त्यामुळे आपण चंद्रशेखर तुरकर यांच्यासमेवत उपोषणाला बसणार असल्याची माहिती दिली.कॅन्टीन नसणारे जंक्शनरेल्वे प्रवासी व कर्मचाऱ्यांना सोईचे व्हावे यासाठी रेल्वेस्टेशनवर कँटिंगवर छोटी-मोठी कँटिंग असते. मात्र बल्लारपूर जक्शन याला अपवाद आहे. बल्लारपूर जक्शनवर सुपरफास्ट एक्सप्रेस, एक्सप्रेस अशा अनेक रेल्वेगाड्या थांबतात. त्यामुळे याठिकाणावरुन मोठ्या प्रमाणात प्रवासी बसत व उतरत असतात. त्यामुळे कँटिंगची गरज आहे.