शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

‘त्या’ वाघामुळे शेतीची कामे झाली होती प्रभावित

By admin | Updated: June 24, 2017 00:39 IST

वाघाच्या दहशतीने शेतकऱ्यांनी अद्याप शेतात पऱ्हे टाकले नाही. गुरुवारी पद्मापूर येथे गावालगत शौचास गेलेल्या इसमावर वाघाने अचानक हल्ला चढवून

चंद्रपूर : वाघाच्या दहशतीने शेतकऱ्यांनी अद्याप शेतात पऱ्हे टाकले नाही. गुरुवारी पद्मापूर येथे गावालगत शौचास गेलेल्या इसमावर वाघाने अचानक हल्ला चढवून त्याला सुमारे एक कि.मी. अंतरापर्यंत फरफटत नेले आणि ठार केले. हा वाघ आता थेट गावात व शेतात जावून हल्ला चढवत आहे. तो जंगलात शिकारी करीत नाही. त्याच्या तोंडाला मनुष्याचे रक्त लागल्याने तो नरभक्षी झाला आहे. या वाघाची शेतकरी, गावकऱ्यांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे. ही दशहत संपुष्टात आणण्यासाठी ब्रह्मपुरी तालुक्यातील नागरिकांसह आ. विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर येथील विश्राम गृह येथून मुख्य वन संरक्षक कार्यालयावर वाघ मारा वाघ मारा...अशा गगनभेदी घोषणा देत मोर्चा काढला. मोर्चा कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच पोहचताच ठिय्या आंदोलन सुरू केले. यानंतर ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ हे भजन गाऊ लागले. आंदोलन मागे घेण्यासाठी मुख्य वनसरंक्षक शेळके यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र यात यश आले नाही. अखेर त्यांनी नॅशनल टायगर कन्झर्वेेशन अ‍ॅथॉरिटीच्या सदस्यांना कार्यालयात बोलावून सदर नरभक्षक वाघाला ठार मारण्याचा निर्णय घेतला. तसा प्रस्ताव प्रधान मुख्यवनसंरक्षक वन्यजीव यांना पाठविला. यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांच्या वाघाला ठार मारण्याच्या आदेशाची वाट पहात आंदोलक रात्री उशिरापर्यंत तिथेच ठिय्या मांडून होते. या आंदोलनात आ. विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अश्वीनी खोब्रागडे, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, काँग्रेसचे चंद्रपूर विधानसभा क्षेत्र प्रमुख महेश मेंढे, बल्लारपूचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, नंदा नल्लूरवार, अमजद अली, शिवाराव याच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.