शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभर जिल्ह्याला वादळाची भीती

By admin | Updated: May 9, 2016 00:49 IST

हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूरसह जिल्ह्याला गेल्या आठवडाभरापासून वादळाचा फटका बसत आहे.

मोठे नुकसान : बाष्पयुक्त समुद्रीवाऱ्याने वातावरणात बदल, तापमानात वाढ होण्याचा परिणामचंद्रपूर: हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूरसह जिल्ह्याला गेल्या आठवडाभरापासून वादळाचा फटका बसत आहे. विदर्भात तापमान वाढल्याने बाष्पयुक्त वारे आकर्षित होऊन वादळी स्थिती निर्माण होत असल्याची माहिती येथील खगोल अभ्यासक तथा ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुरेश चोपणे यांनी ‘लोकमत’ला दिली. आणखी आठवडाभर असेच वातावरण राहील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वातावरण आहे. सायंकाळ झाली की, अचानक वातावरणात बदल होेतो. आकाशात ढग दाटून सुसाट वादळाला सुरूवात होते. काही ठिकाणी पाऊस पडतो. कुठे गारपीट होते, तर कुठे केवळ वादळाचे तांडव असते. सातत्याने सुरू असलेल्या या वातावरण बदलाने नागरिकांच्या मनात भय निर्माण झाले आहे. सायंकाळी वादळ येण्याच्या भीतीने लोक घराबाहेरदेखील पडायला घाबरत आहेत. गेल्या अनेक वर्षानंतर जिल्ह्यात मे महिन्यामध्ये अशी स्थिती निर्माण झाली आहे. मध्यंतरी आलेले भीषण वादळ गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच पाहिल्याचे जाणकार सांगतात. गेल्या आठ दिवसांमध्ये झालेल्या वादळामुळे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीला याचा सर्वाधिक फटका बसला. वीज वितरण कंपनीचे २० लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. गावागावांमध्ये घरांची पडझड होऊन अनेक संसार रस्त्यावर आलेत. काहींच्या घरावरील छपरे उडून गेलीत. जिल्ह्यात आणखी आठवडाभर अशी स्थिती राहणार असल्याचा अंदाज प्रा.चोपणे यांनी व्यक्त केला.सूर्य सध्या डोक्यावर आहे. त्याची किरणे मध्य् ाप्रदेशाकडे वळल्यानंतर तापमान कमी होऊन वादळी वातावरण शमेल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)विदर्भातील तापमान वाढल्यामुळे या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे समुद्राकडील बाष्पियुक्त वारे वाहू लागले आहेत. परिणामी वादळी स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती आठवडाभर राहण्याची शक्यता आहे. यापूर्वीसुद्धा उन्हाळभर ढगाळ वातावरण होते. अशी स्थिती कायम राहणे हे चांगल्या पावसासाठी व शेतीसाठी धोकादायक आहे.-प्रा.सुरेश चोपण, संस्थापक अध्यक्ष ग्रीन प्लॅनेट सोसायटी, चंद्रपूर