शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

आठवडाभर जिल्ह्याला वादळाची भीती

By admin | Updated: May 9, 2016 00:49 IST

हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूरसह जिल्ह्याला गेल्या आठवडाभरापासून वादळाचा फटका बसत आहे.

मोठे नुकसान : बाष्पयुक्त समुद्रीवाऱ्याने वातावरणात बदल, तापमानात वाढ होण्याचा परिणामचंद्रपूर: हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूरसह जिल्ह्याला गेल्या आठवडाभरापासून वादळाचा फटका बसत आहे. विदर्भात तापमान वाढल्याने बाष्पयुक्त वारे आकर्षित होऊन वादळी स्थिती निर्माण होत असल्याची माहिती येथील खगोल अभ्यासक तथा ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुरेश चोपणे यांनी ‘लोकमत’ला दिली. आणखी आठवडाभर असेच वातावरण राहील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वातावरण आहे. सायंकाळ झाली की, अचानक वातावरणात बदल होेतो. आकाशात ढग दाटून सुसाट वादळाला सुरूवात होते. काही ठिकाणी पाऊस पडतो. कुठे गारपीट होते, तर कुठे केवळ वादळाचे तांडव असते. सातत्याने सुरू असलेल्या या वातावरण बदलाने नागरिकांच्या मनात भय निर्माण झाले आहे. सायंकाळी वादळ येण्याच्या भीतीने लोक घराबाहेरदेखील पडायला घाबरत आहेत. गेल्या अनेक वर्षानंतर जिल्ह्यात मे महिन्यामध्ये अशी स्थिती निर्माण झाली आहे. मध्यंतरी आलेले भीषण वादळ गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच पाहिल्याचे जाणकार सांगतात. गेल्या आठ दिवसांमध्ये झालेल्या वादळामुळे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीला याचा सर्वाधिक फटका बसला. वीज वितरण कंपनीचे २० लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. गावागावांमध्ये घरांची पडझड होऊन अनेक संसार रस्त्यावर आलेत. काहींच्या घरावरील छपरे उडून गेलीत. जिल्ह्यात आणखी आठवडाभर अशी स्थिती राहणार असल्याचा अंदाज प्रा.चोपणे यांनी व्यक्त केला.सूर्य सध्या डोक्यावर आहे. त्याची किरणे मध्य् ाप्रदेशाकडे वळल्यानंतर तापमान कमी होऊन वादळी वातावरण शमेल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)विदर्भातील तापमान वाढल्यामुळे या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे समुद्राकडील बाष्पियुक्त वारे वाहू लागले आहेत. परिणामी वादळी स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती आठवडाभर राहण्याची शक्यता आहे. यापूर्वीसुद्धा उन्हाळभर ढगाळ वातावरण होते. अशी स्थिती कायम राहणे हे चांगल्या पावसासाठी व शेतीसाठी धोकादायक आहे.-प्रा.सुरेश चोपण, संस्थापक अध्यक्ष ग्रीन प्लॅनेट सोसायटी, चंद्रपूर