शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
2
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
3
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
4
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
5
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
6
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?
7
दसरा मेळाव्यानंतर ठाकरेंना धक्का देणार, २ आमदार वगळता इतर संपर्कात; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा
8
पत्नीचं परपुरुषासोबत सुरू होत अफेयर, पतीला लागली कुणकुण अन् कांड झाला!
9
Crime: 'तू माझ्या बायकोला फोन का करतो?' संतापलेल्या तरुणाने चुलत भावाला संपवलं!
10
Pitru Paksha 2025: संकष्टी किंवा उपसाच्या दिवशी श्राद्धतिथी आल्यास नैवेद्य ठेवावा की नाही? वाचा
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत ईव्हीएमचा वापर का केला जात नाही?
12
"ते मला मराठीत म्हणाले...", उपेंद्र लिमयेने सांगितला रजनीकांत यांच्यासोबतच्या भेटीचा किस्सा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
14
Nepal Currency Value: भारताच्या ५० रुपयांचं मूल्य नेपाळमध्ये किती असेल? आश्चर्यचकित करेल उत्तर!
15
"ते दोन पवित्र आत्मे पितृ पंधरवड्यात जमिनीवर आले तर काय प्रश्न विचारतील?’’ भाजपाचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला
16
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका! ८३ मिलियन डॉलर्सच्या नूकसान भरपाईचा निर्णय कायम
17
"मीही बोलू शकले असते, पण.."; धनश्री वर्माचं मोठं विधान, चहलबद्दल म्हणाली- "त्याची अब्रू..."
18
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
19
तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 'हे' ५ शेअर्स आहेत का? ब्रोकरेज फर्मने सांगितली बंपर कमाईची संधी
20
Shantanu Naidu: रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर

आमसभेत पाणी प्रश्नावर गदारोळ

By admin | Updated: March 7, 2016 00:36 IST

कोरपना पंचायत समितीची वार्षिक आमसभा शनिवारी स्थानिक तहसील कार्यालयात पार पडली.

कोरपना : कोरपना पंचायत समितीची वार्षिक आमसभा शनिवारी स्थानिक तहसील कार्यालयात पार पडली. या आमसभेसाठी गावागावांतून सरपंच आपल्या समस्या मांडण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येकांनी आपल्या गावातील पाणी टंचाईची भयावह स्थिती मांडत रोष व्यक्त केला. यामुळे चांगलाच गदारोळ झाला.या सभेत पाणीपुरवठा, कृषी विभाग या दोनच विषयावर सभा दिवसभर चालली होती. पाणी प्रश्न गाजला. गावा-गावातील महिला पाण्यासाठी भंटकती करीत आहे. तेव्हा आमदार संजय धोटे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. ही समस्या तात्काळ मार्गी लावण्याचे ठरले. या सभेच्या अध्यक्षस्थानी क्षेत्राचे आमदार संजय धोटे होते. जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती नीलकंठ कोरांगे, पंचायत सभापती रवी गोखरे, उपसभापती मनोहर नैताम, आबीद अली, अरुण निमजे, उत्तम पेचे, तहसीलदार पुष्पलता कुमरे, संवर्ग विकास अधिकारी संघमित्रा कोल्हे, रमेश मालेकर, नारायण दिवरकर, किशोर बावणे, पुरुषोत्तम गोंगले, अरुण मडावी, विशाल गज्जलवार, यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, पटवारी उपस्थित होते. सुरुवातीलाच पाणी प्रश्न सभेत पेटल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. उडवाउडवीची उत्तरे देण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न झाला. मात्र सरपंचांनी यावर संताप व्यक्त केला. सोनुर्ली गावात १८ वर्षांपासून पिण्यास पाणी मिळत नाही. पाण्याची टाकी शोभेची वास्तु ठरली आहे. मांगलहिरा गावकरी एक किलोमीटर अंतरावरुन पाणी आणतात. धानोली गावात २५ लाख रुपये खर्च होऊन पाणी गावात पोहचलेच नाही. कृषी विभागाचा विषयात शेतकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. मात्र कृषी अधिकारीकडे उत्तरच नाही. कृषी अधिकारी हा शेतकऱ्यांना तारक नाही तर मारक असल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला. किशोर बावने यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली. मिरचीच्या बी-बियाणात ज्या कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली, त्या कंपनीच्या विरोधात तक्रार केली. मात्र कृषी अधिकारी उलट कंपनीच्या हिताचे भाषा बोलतात, असा आरोप केला. शेतकऱ्यांना शांत करत आमदारांनी न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. (शहर प्रतिनिधी)इतर प्रश्नांवर चर्चाच नाहीमोठ्या आशेने आलेले नागरिक परत गेले. या ठिकाणी जनहिताचे प्रश्न मार्गी लागलेच नाही. आरोग्य, शिक्षण, पंचायत विभाग आदी विषय न घेता दोनच विषयात सभा गुंडाळली. पंचायत समितीची कार्यप्रणाली कुचकामीहागणदारीमुक्त असलेल्या गावातील सरपंचांचा सत्कार कोरपना पंचायत समितीने आयोजित केला. मात्र सरपंचांना निमंत्रणच मिळाले नाही. यावर या सभेत रोष व्यक्त करण्यात आला. कर्मचाऱ्यांची झोप कधी उघडणार?तालुक्यात अशा विविध समस्या असताना याकडे जातीने लक्ष देऊन येथील शेतकरी, शेतमजूर यांना न्याय द्यावा. येथील कर्मचारी सुस्तावलेला, झोपलेला आहे. त्याला झोपेतून उठवून सामान्यांना न्याय द्यावा, अशी मागणी नागरिकांनी आमदारांकडे केली..