शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

तीन ट्रक मालकांकडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:21 IST

तीन ट्रक मालकांकडून दंड वसूल चंद्रपूर : परिसरातून कोळसा व राख अवैध वाहतूक करणाºया तीन ट्रकवर पोलिसांनी ...

तीन ट्रक मालकांकडून

दंड वसूल चंद्रपूर : परिसरातून कोळसा व राख अवैध वाहतूक करणाºया तीन ट्रकवर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अकरा वाजता वाहनमालकांकडून चालकोंकडून १२ हजारांचा दंड वसूल केला. या मार्गावरून भरधाव वेगाने वाहन दामटण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी या मार्गावर गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

भानापेठ वार्डातील

नाल्यांची स्वच्छता करा

चंद्रपूर : भानापेठ वार्डातील विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक हैराणआहेत. वार्डातील नाल्या उपसा काम संथ गतीने सुरू आहे. घाणीमुळे रोगराई पसरू शकते. मनपाने स्वच्छता कर्मचाºयांना या वार्डात पाठवावे. शिवाय, रस्त्यावर कचरा टाकणाºया नागरिकांवर कारवाई करावी, अशी मागणी आहे.

अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू होणार

चिमूर : तालुक्यातील अनेक गावांतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मात्र,निधी न मिळाल्याने कामे रखळली आहेत. ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी पाठपुरावा केल्यामुळे निधी मंजूर झाला आहे. पंचायत समितीने यासंदर्भात आदेशाद्वारे कळविले. येत्या काही दिवसांपासून या कामांना सुरूवात होणार आहे.

हमीभावाने धानाची

खरेदी करावी

मूल : तालुक्यात धान पिकाशिवाय उपजिविकेचे अन्य साधन नसल्याने त्यांना याच शेती केल्याशिवाय पर्याय नाही. यंदा बºयापैकी उत्पादन झाले. शासनाने धानाला हमीभाव जाहीर केला. त्यामुळे हमीभावानुसारच धान खरेदी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

अतिवृष्टीच्या निधीसाठी

शेतकºयांच्या चकरा

नागभीड : शासनाने जाहीर केलेली अतिवृष्टीची मदत अद्यापही काही शेतकºयांना मिळाली नसल्याने शेतकºयांच्या तलाठी व तहसील कार्यालयात चकरा वाढल्या आहेत. काही दिवसात नुकसान भरपाई मिळेल, असे आश्वासन देवून अधिकारी मोकळे होत आहे. त्यामुळे शेतकºयांनानुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

घुग्घुस परिसरातील

रस्त्याची दुरुस्ती करावी

घुग्घुस : परिसरातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली. बांधकाम विभागाने ग्रामीण भागातील रस्त्यांचे सर्वेक्षण करून तातडीने दुरस्ती करणे गरजेचे आहे. औद्योगिक शहर म्हणून घुग्घूसची ओळख आहे. त्यामुळे येथे परिसरातून मोठ्या संख्येने वाहनधारक येतात. मात्र खड्ड्यांमुळे अपघात वाढत आहेत.

चंद्रपूर-वणी मार्गावर बंदोबस्त वाढवा

घुग्घुस : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मद्यपी विविध मार्गाने दारू तस्करी सुरू आहे. पोलीस कारवाई करत आहे. पण तस्करीच्या घटना वाढतच असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील काही मद्यपी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे जात आहेत. त्यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली.

नाल्याचे बांधकाम

पूर्ण करावे

चंद्रपूर : नेहरूनगर रय्यतवारी परिसरात नाली बांधकाम न झाल्याने विविध वार्डात घाण पसरली आहे. या परिसरातील लोकसंख्याही वाढत आहे. त्यामुळे नागरी सुविधांमध्येही वाढ करणे गरजेचे झाले आहे. मनपा प्रशासनाने निधीची तरतूद करून नाली बांधकाम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

प्रवाशी निवाºयाअभावी नागरिकांचे हाल

राजूरा : कोरपना व राजुरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या निमणी, हिरापूर येथे प्रवाशांसाठी निवारा शेड नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. निमणी, हिरापूर येथील नागरिकांनी परिवहन महामंडळाकडे निवेदन दिले. पण, हा प्रश्न अद्याप सुटला नाही.

खताच्या ढिगाºयांमुळे घाणीचे साम्राज्य

जिवती : तालुक्यातील बहुतांश रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात खत साठविल्या जात असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. गावागावांत स्वच्छता अभियान राबवत असतानाच स्वच्छतेची ऐसीतैशी होत आहे. मात्र संबंधित विभागाकडून कारवाई झाली नाही.

नागभीड-वडसा मार्गावर आॅटो चालकांची मनमानी

ब्रह्मपुरी : नागभीड ते वडसा मार्गावर दररोज शेकडो आॅटो चालतात. नियमांचे उल्लंघन करून प्रवाशांना कोेंबून नेण्याच्या घटना सतत वाढत आहेत. मात्र, पोलिसांचे याकडे दुर्लक्ष असल्याने आॅटो चालकांची मनमानी वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

पीक विम्यापासून

शेतकरी वंचित

वरोरा : चंद्रपूर-नागपूर रस्त्यावरील टेमुर्डा गावातील नागरिक मोठ्या संख्येने शेती व्यवसाय करतात. मात्र यावर्षी खरीपामध्ये अतिपावसाने तसेच रब्बीमध्ये अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. खरीपाच्या पीक विम्याची अद्यापही शेतकºयांना मदत मिळाली नाही.

रोजगाराअभावी बेरोजगारांमध्ये नैराश

भिसी : चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भिसीमध्ये उद्योगधंदे नसल्यामुळे येथे बेरोजगारांची फौज वाढली आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देवून येथे धानावर प्रक्रिया करणारा उद्योग उभारून रोजगार द्यावा, अशी मागणी बेरोजगारांकडून केली जात आहे.

रस्ता रुंदीकरणाची नागरिकांची मागणी

नवरगाव : परिसरातील नागरिकांसाठी बाजारपेठेचे ठिकाण असलेल्या नवरगावमध्ये रस्ते अरुंद असल्याने अनेकवेळा वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देवून गावातील अतिक्रमण हटवून रस्त्यांची रुंदी वाढवावी, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांनी केली आहे.