शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार कुटुंबीयांच्या वनजमिनीची सातबाऱ्यात नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 23:13 IST

राजेश मडावी। लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर: वनहक्क कायद्यानुसार जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेल्या तीन हजार कुटुंबीयांच्या वन जमिनीची भूूमी अभिलेख ...

ठळक मुद्देवनहक्क कायदा : कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येणार

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: वनहक्क कायद्यानुसार जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेल्या तीन हजार कुटुंबीयांच्या वन जमिनीची भूूमी अभिलेख कार्यालयाने सातबारात नोंद करून वाटपाची प्रक्रिया पूर्ण केली. यामुळे जमिनीची मालकी हक्क मिळाली असून विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे. सातबारा अभिलेखात भोगवटदार या रकान्यामध्ये महाराष्ट्र शासन (वने) अशी नोंद झाली आहे.अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियम २००६ नियम २००८ व सुधारणा नियम २०१२ अन्वये जिल्हास्तरीय वनहक्क समितीने जिल्ह्यातील तीन हजार ९ कुटुंबीयांचे वनहक्क दावे मंजूर केले होते. या जमिनीची मोजणी करण्याकरिता उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडे तहसीलदारांमार्फत संबंधित कागदपत्र पाठविण्यात आली. यामध्ये वनहक्क समितीने मंजुरी प्रदान केलेल्या वनजमिनी पट्ट्याची झेरॉक्स प्रत, वनविभागाचा नमूना अ आणि ब तसेच कच्चा नकाशा, जीपीएस मोजणीची प्रत, समितीने मंजुरी दिलेल्या सर्व्हे क्रमांकाचा सातबारा व नकाशाची प्रत आदी दस्ताऐवजांचा समावेश होता. वनहक्क जिल्हा समितीद्वारे पात्र प्रकरणामध्ये महसूल अभिलेखामध्ये नोंद घेताना राज्यातील अनेक जिल्ह्यांनी वेगवेगळ्या पद्धती अवलंबिल्या. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत सुसूत्रता राहावी व पात्र वनहक्काच्या नोंदी महसूल अभिलेखात घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या २ जानेवारी २०१२ व २ डिसेंबर २०१८ रोजी केलेल्या परिपत्रकाचा आधार घेतला. यानुसार तीन हजार ९ मंजूर प्रकरणांचा निपटारा केला. पात्र कुटुंबांच्या नावाने वन हक्क जमिनीची नोंद करून प्रशासनाकडून वाटप करण्यात आले आहे.७५ वर्षांची अट गैरआदिवासींना मारकराजुरा उपविभागातील राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यात ८०४ कुटुंबियांंना सर्वाधिक सातबारा वाटप करण्यात आले. विवाहित कुंटुंबाबत पती-पत्नीच्या नावाने संयुक्त नोंदणी करण्यात आली. अनुसूचित जमातीची प्रकरणे नियमात बसल्याने न्याय मिळाला. परंतु गैरआदिवासींसाठी लागू केलेली ७५ वर्षांची अट मारक ठरली. अनेक आंदोलने करूनही दावेदारांच्या वाट्याला निराशा आली आहे.अतिक्रमण काढण्याच्या आदेशाला स्थगितीवनहक्क दावे फेटाळलेल्या नागरिकांचे वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने १३ फेब्रुवारीला दिला होता. दरम्यान, न्यायालयानेच स्वत:हून आदेशाला स्थगिती दिली. जिल्ह्यात १४ हजार ८४८ दावे जिल्हा समितीने फेटाळले होते. न्यायालयाच्या निर्णयाने मोठा दिला मिळाला आहे.पट्टे मिळाले पण सातबारा नाहीवनहक्क कायद्यानुसार जमीन मिळालेल्या कुटुंबांना पट्टे देण्यात आले. परंतु, सातबारा मिळाला नाही, असेही कुटुंब जिल्ह्यात आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया गतिमान करण्याची मागणी सरपंच व ग्राम वनहक्क समित्यांनी केली आहे.