शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

तीन हजार कुटुंबीयांच्या वनजमिनीची सातबाऱ्यात नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 23:13 IST

राजेश मडावी। लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर: वनहक्क कायद्यानुसार जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेल्या तीन हजार कुटुंबीयांच्या वन जमिनीची भूूमी अभिलेख ...

ठळक मुद्देवनहक्क कायदा : कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येणार

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: वनहक्क कायद्यानुसार जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेल्या तीन हजार कुटुंबीयांच्या वन जमिनीची भूूमी अभिलेख कार्यालयाने सातबारात नोंद करून वाटपाची प्रक्रिया पूर्ण केली. यामुळे जमिनीची मालकी हक्क मिळाली असून विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे. सातबारा अभिलेखात भोगवटदार या रकान्यामध्ये महाराष्ट्र शासन (वने) अशी नोंद झाली आहे.अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियम २००६ नियम २००८ व सुधारणा नियम २०१२ अन्वये जिल्हास्तरीय वनहक्क समितीने जिल्ह्यातील तीन हजार ९ कुटुंबीयांचे वनहक्क दावे मंजूर केले होते. या जमिनीची मोजणी करण्याकरिता उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडे तहसीलदारांमार्फत संबंधित कागदपत्र पाठविण्यात आली. यामध्ये वनहक्क समितीने मंजुरी प्रदान केलेल्या वनजमिनी पट्ट्याची झेरॉक्स प्रत, वनविभागाचा नमूना अ आणि ब तसेच कच्चा नकाशा, जीपीएस मोजणीची प्रत, समितीने मंजुरी दिलेल्या सर्व्हे क्रमांकाचा सातबारा व नकाशाची प्रत आदी दस्ताऐवजांचा समावेश होता. वनहक्क जिल्हा समितीद्वारे पात्र प्रकरणामध्ये महसूल अभिलेखामध्ये नोंद घेताना राज्यातील अनेक जिल्ह्यांनी वेगवेगळ्या पद्धती अवलंबिल्या. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत सुसूत्रता राहावी व पात्र वनहक्काच्या नोंदी महसूल अभिलेखात घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या २ जानेवारी २०१२ व २ डिसेंबर २०१८ रोजी केलेल्या परिपत्रकाचा आधार घेतला. यानुसार तीन हजार ९ मंजूर प्रकरणांचा निपटारा केला. पात्र कुटुंबांच्या नावाने वन हक्क जमिनीची नोंद करून प्रशासनाकडून वाटप करण्यात आले आहे.७५ वर्षांची अट गैरआदिवासींना मारकराजुरा उपविभागातील राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यात ८०४ कुटुंबियांंना सर्वाधिक सातबारा वाटप करण्यात आले. विवाहित कुंटुंबाबत पती-पत्नीच्या नावाने संयुक्त नोंदणी करण्यात आली. अनुसूचित जमातीची प्रकरणे नियमात बसल्याने न्याय मिळाला. परंतु गैरआदिवासींसाठी लागू केलेली ७५ वर्षांची अट मारक ठरली. अनेक आंदोलने करूनही दावेदारांच्या वाट्याला निराशा आली आहे.अतिक्रमण काढण्याच्या आदेशाला स्थगितीवनहक्क दावे फेटाळलेल्या नागरिकांचे वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने १३ फेब्रुवारीला दिला होता. दरम्यान, न्यायालयानेच स्वत:हून आदेशाला स्थगिती दिली. जिल्ह्यात १४ हजार ८४८ दावे जिल्हा समितीने फेटाळले होते. न्यायालयाच्या निर्णयाने मोठा दिला मिळाला आहे.पट्टे मिळाले पण सातबारा नाहीवनहक्क कायद्यानुसार जमीन मिळालेल्या कुटुंबांना पट्टे देण्यात आले. परंतु, सातबारा मिळाला नाही, असेही कुटुंब जिल्ह्यात आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया गतिमान करण्याची मागणी सरपंच व ग्राम वनहक्क समित्यांनी केली आहे.