शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

बनावट खत विक्रीप्रकरणी आणखी तिघांना अटक

By admin | Updated: April 30, 2016 00:49 IST

तालुक्यात सन २०१३ ला अमरावतीच्या एका कंपनीने शेकडो शेतकऱ्यांना बनावट खत विकण्याचा गोरखधंदा सुरू केला होता.

दोन दिवसांची पोलीस कोठडी : यापूर्वी दोघांना झाली होती अटकब्रह्मपुरी : तालुक्यात सन २०१३ ला अमरावतीच्या एका कंपनीने शेकडो शेतकऱ्यांना बनावट खत विकण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रकरण दाबल्या गेले. परंतु काही सामाजिक कार्यकर्ते व विधानसभेत प्रश्न उपस्थित झाल्याने हे प्रकरण पुन्हा उजेडात आले असून अशोक पंजाबराव दहिकर, शशीकांत प्रभाकर लकडे, माधव प्रभाकर निमकर रा. अमरावती या तिघांना गुरुवारी अटक करण्यात आली. तिघांनाही न्यायालयातून पोलीस कोठडी मिळाली आहे.सन २०१३ मध्ये अमरावतीच्या कंपनीने काही गट तयार केले व या परीक्षेत्रातील काही शेतकऱ्यांना पकडून रासायनिक खते असल्याची बतावणी करुन खताची विक्री केली. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाली. शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी कंपनीविरुद्ध कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तत्कालिन कृषी अधिकारी इनायत शेख यांनी १३ डिसेंबर २०१३ रोजी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. ब्रह्मपुरीे पोलीस ठाण्याचे तत्कालिन ठाणेदार यांनी कुठलीही चौकशी न करता प्रकरणाचा गाशा गुंडाळला होता. त्यानंतर काही सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी सदर प्रकरण उचलून धरला होता व विधानसभेत तारांकित प्रश्नावली करण्यास भाग पाडले. त्यानुसार हे प्रकरण २०१५ मध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा चंद्रपूर यांच्याकडे वर्ग करण्यात आले. या शाखेने चार महिन्यापूर्वी गिरीश चालखुरे आणि महेश हरडे या दोन आरोपींना अटक करुन पोलीस कोठडीत घेतले होते. अटकेत असलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीच्या अधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा चंद्रपूरने अमरावती येथे जावून अशोक पंजाबराव दहिकर, कंपनीचे मालक शशीकांत प्रभाकर लकडे, संचालक माधव प्रभाकर निमकर रा. तिवसा यांना गुरुवारी अटक केली व रात्री ९ वाजता ब्रह्मपुरीच्या न्यायालयात हजर केले. न्यायाधीश के.के. चाफले यांनी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकूण तिघांनाही ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. (तालुका प्रतिनिधी)