शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
3
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
4
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
5
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
6
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
7
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
8
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
9
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
10
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
11
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
12
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
13
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
14
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
15
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
16
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
17
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
18
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
19
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
20
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला

प्रभाग रचना आक्षेपांवर तीन तास सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2017 00:39 IST

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहर प्रभाग रचना गेल्या महिन्यात करण्यात आली.

१२ जणांकडून १४ आक्षेप : विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत पार पडली सुनावणीचंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहर प्रभाग रचना गेल्या महिन्यात करण्यात आली. ही प्रभाग रचना नियमाला डावलून करण्यात आल्याचा आरोप करीत प्रभाग रचनेवर शहरातील १२ जणांनी १४ आक्षेप नोंदविले होते. या आक्षेपांवर सोमवारी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली. ही सुनावणी तब्बल तीन तास चालली. मनपा कार्यालयाच्या कॉन्फरेन्स सभागृहात झालेल्या सुनावणीला विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्यासह आरोग्य विभागाचे आयुक्त व्यास, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मनपा आयुक्त संजय काकडे व उपायुक्त विजय देवळीकर यांची उपस्थिती होती. सर्व आक्षेपकर्त्यांना एक-एक बोलावून त्यांचे म्हणणे ऐकण्यात आले. यावेळी आक्षेपकर्त्यांनी नियमाला डावलून प्रभाग रचना केल्याचे आयुक्तांना सांगितले. त्यांचे आक्षेप ऐकून घेत विभागीय आयुक्तांनी प्रभाग रचनेत योग्य ते बदल करण्याचे आश्वासन आक्षेपकर्त्यांना दिले. प्रभाग रचना झाल्याच्या घोषणेनंतर आक्षेप स्वीकारने सुरू होते. यात संदीप आवारी, राजकुमार जवादे, संजय वैद्य, दीपक मुळे, राहुुल पावडे, देवानंद वाढई, राजेंद्र आखरे, राजेश मोर्य, जितेद्र क्षीरसागर, हरविंदरसिंह धुन्ना व राजू विट्टूरवार या १२ जणांनी आक्षेप नोंदविले होते. संदीप आवारी, संजय वैद्य व राहुल पावड़े यांनी प्रत्येकी दोन-दोन आाक्षेप नोंदविले होते. या आक्षेपांवर मनपा कार्यालयाच्या कॉन्फरेन्स सभागृहात सोमवारी सकाळी १० वाजता सुनावणी सुरू झाली. विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी स्वत: सर्वांचे आक्षेप ऐकून घेत आवश्यक ठिकाणी बदल करण्याचे आश्वासन दिले. संदीप आवारी यांनी सीमांकन योय रितीने करण्यात आले नाही, असा आक्षेप नोंदविला होता. मोठे रस्ते व नाला किंवा नदीला सीमा ठरविणे आवश्यक होते. मात्र त्यांच्या प्रभागात असे झाले नाही. लहान रस्ते, गल्लीतून वॉर्डाची सीमा ठरविण्यात आली. हे नियमात नाही, असे त्यांनी आक्षेप नोंदविताना सांगितले. भिवापुर वार्ड बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही सुनावणीत अधिकाऱ्यांना आक्षेप ऐकवून रचनेत सुधारणा करण्याची मागणी केली. (स्थानिक प्रतिनिधी)कुठे १५ हजार तर कुठे २० हजार मतदारनगरसेवक संजय वैद्य यांनी सीमांकन योग्य रितीने करण्यात आले नसून मतदार संख्याही लक्षात घेण्यात आली नाही, असा आरोप केला. त्यांनी सांगितले की, शहरातील ५ प्रभागात २० हजार ५०० मतदार आहेत. तर ४ प्रभागामध्ये १९ हजार ५०० ते ७०० मतदार आहेत. ३ प्रभागात १७ हजार ५०० ते ७०० तर दोन प्रभागात १४ हजार ते १५ हजार मतदार आहेत. यामुळे ‘१५ हजारहून अधिक व २१ हजार पेक्षा कमी’ मतदार नियमात सुसंगता दिसून येते, असे सांगितले. प्रमाणपत्रासाठी येणार अडचणी नगरसेवक राजेंद्र आखरे यांनी आक्षेप नोंदविताना प्रभाग रचनेत पठाणपुरा प्रभाग तयार करण्यात आले. या प्रभागात २० टक्के क्षेत्र पठाणपुरा व ८० टक्के क्षेत्र भिवापुर वार्डातील क्षेत्राला जोडण्यात आला आहे. मात्र या प्रभागाचे नाव पठाणपुरा ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भिवापुर वार्डातील कोणताही नागरिक आपला रहिवासी प्रमाणपत्र बनविण्यासाठी नगरसेवकाजवळ गेल्यास त्याला पठाणपुरा प्रभागाचा प्रमाणपत्र मिळेल. त्यामुळे भविष्यात भिवापुर वार्डातील नागरिकांना प्रमाणपत्रासाठी अडचणी येऊ शकतात, असे विभागीय आयुक्तांसमोर सांगितले. याचप्रकारे किल्ला व नदीचा विचार न करता प्रभाग रचना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.