शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

प्रभाग रचना आक्षेपांवर तीन तास सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2017 00:39 IST

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहर प्रभाग रचना गेल्या महिन्यात करण्यात आली.

१२ जणांकडून १४ आक्षेप : विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत पार पडली सुनावणीचंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहर प्रभाग रचना गेल्या महिन्यात करण्यात आली. ही प्रभाग रचना नियमाला डावलून करण्यात आल्याचा आरोप करीत प्रभाग रचनेवर शहरातील १२ जणांनी १४ आक्षेप नोंदविले होते. या आक्षेपांवर सोमवारी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली. ही सुनावणी तब्बल तीन तास चालली. मनपा कार्यालयाच्या कॉन्फरेन्स सभागृहात झालेल्या सुनावणीला विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्यासह आरोग्य विभागाचे आयुक्त व्यास, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मनपा आयुक्त संजय काकडे व उपायुक्त विजय देवळीकर यांची उपस्थिती होती. सर्व आक्षेपकर्त्यांना एक-एक बोलावून त्यांचे म्हणणे ऐकण्यात आले. यावेळी आक्षेपकर्त्यांनी नियमाला डावलून प्रभाग रचना केल्याचे आयुक्तांना सांगितले. त्यांचे आक्षेप ऐकून घेत विभागीय आयुक्तांनी प्रभाग रचनेत योग्य ते बदल करण्याचे आश्वासन आक्षेपकर्त्यांना दिले. प्रभाग रचना झाल्याच्या घोषणेनंतर आक्षेप स्वीकारने सुरू होते. यात संदीप आवारी, राजकुमार जवादे, संजय वैद्य, दीपक मुळे, राहुुल पावडे, देवानंद वाढई, राजेंद्र आखरे, राजेश मोर्य, जितेद्र क्षीरसागर, हरविंदरसिंह धुन्ना व राजू विट्टूरवार या १२ जणांनी आक्षेप नोंदविले होते. संदीप आवारी, संजय वैद्य व राहुल पावड़े यांनी प्रत्येकी दोन-दोन आाक्षेप नोंदविले होते. या आक्षेपांवर मनपा कार्यालयाच्या कॉन्फरेन्स सभागृहात सोमवारी सकाळी १० वाजता सुनावणी सुरू झाली. विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी स्वत: सर्वांचे आक्षेप ऐकून घेत आवश्यक ठिकाणी बदल करण्याचे आश्वासन दिले. संदीप आवारी यांनी सीमांकन योय रितीने करण्यात आले नाही, असा आक्षेप नोंदविला होता. मोठे रस्ते व नाला किंवा नदीला सीमा ठरविणे आवश्यक होते. मात्र त्यांच्या प्रभागात असे झाले नाही. लहान रस्ते, गल्लीतून वॉर्डाची सीमा ठरविण्यात आली. हे नियमात नाही, असे त्यांनी आक्षेप नोंदविताना सांगितले. भिवापुर वार्ड बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही सुनावणीत अधिकाऱ्यांना आक्षेप ऐकवून रचनेत सुधारणा करण्याची मागणी केली. (स्थानिक प्रतिनिधी)कुठे १५ हजार तर कुठे २० हजार मतदारनगरसेवक संजय वैद्य यांनी सीमांकन योग्य रितीने करण्यात आले नसून मतदार संख्याही लक्षात घेण्यात आली नाही, असा आरोप केला. त्यांनी सांगितले की, शहरातील ५ प्रभागात २० हजार ५०० मतदार आहेत. तर ४ प्रभागामध्ये १९ हजार ५०० ते ७०० मतदार आहेत. ३ प्रभागात १७ हजार ५०० ते ७०० तर दोन प्रभागात १४ हजार ते १५ हजार मतदार आहेत. यामुळे ‘१५ हजारहून अधिक व २१ हजार पेक्षा कमी’ मतदार नियमात सुसंगता दिसून येते, असे सांगितले. प्रमाणपत्रासाठी येणार अडचणी नगरसेवक राजेंद्र आखरे यांनी आक्षेप नोंदविताना प्रभाग रचनेत पठाणपुरा प्रभाग तयार करण्यात आले. या प्रभागात २० टक्के क्षेत्र पठाणपुरा व ८० टक्के क्षेत्र भिवापुर वार्डातील क्षेत्राला जोडण्यात आला आहे. मात्र या प्रभागाचे नाव पठाणपुरा ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भिवापुर वार्डातील कोणताही नागरिक आपला रहिवासी प्रमाणपत्र बनविण्यासाठी नगरसेवकाजवळ गेल्यास त्याला पठाणपुरा प्रभागाचा प्रमाणपत्र मिळेल. त्यामुळे भविष्यात भिवापुर वार्डातील नागरिकांना प्रमाणपत्रासाठी अडचणी येऊ शकतात, असे विभागीय आयुक्तांसमोर सांगितले. याचप्रकारे किल्ला व नदीचा विचार न करता प्रभाग रचना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.