शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

हजारो हेक्टरमधील धान पऱ्हे धोक्यात

By admin | Updated: July 10, 2015 01:34 IST

तालुक्यामध्ये धान पिकाचे पऱ्हे टाकण्याची कामे आटोपली आहेत. तसेच कपाशी व सोयाबीनची पेरणीसुद्धा करण्यात आली.

पोंभूर्णा : तालुक्यामध्ये धान पिकाचे पऱ्हे टाकण्याची कामे आटोपली आहेत. तसेच कपाशी व सोयाबीनची पेरणीसुद्धा करण्यात आली. परंतु तब्बल एक महिना लोटूनसुद्धा पावसाने दडी मारल्याने धानपिकाचे पऱ्हे व सोयाबीन पाण्याअभावी करपू लागले असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. मागील एक महिन्यांपासून पावसाचा पत्ता नाही, तर दुसरीकडे गावातील लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीसाठी व्यूहरचना आखताना दिसत आहेत. तालुक्यात सिंचनाची पाहिजे तशी सुविधा नसल्याने दरवर्षीच अशा संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.जून महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने दमदार सुरूवात केली आणि तब्बल तीन ते चार दिवस सतत पाऊस पडल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी धान पिकाचे पऱ्हे टाकणीला सुरूवात केली. अनेकांनी कपाशी व सोयाबीनची पेरणीसुद्धा आटोपून घेतली. पावसाची दमदार सुरूवात बघून अनेकांनी रासायनिक खतासोबतच पेरणी केल्याचे समजते. जमीन ओलसर असल्याने व खताची मात्रा दिल्याने धानपिकाचे पऱ्हे व सोयाबीन जोमात आले. परंतु त्यानंतर एक महिना लोटूनसुद्धा पाऊस न पडल्याने आणि उन्हाचा उकाडा वाढल्याने जोमात आलेले धान पिकाचे पऱ्हे व सोयाबीन आता सुकायला लागली आहे. तर अनेकांच्या शेतातील धान पिकांचे पऱ्हे सुकून त्याचे तणसात रूपांतर झाले आहे. कृषी केंद्रातील महागडी बिजाई खरेदी करून शेतकऱ्यांनी शेतामध्ये टाकली. त्याची उगवण शक्तीसुद्धा चांगल्या प्रकारे झाली. शेतकरी आनंदात होता. परंतु निसर्गाच्या दृष्टचक्राने पुन्हा शेतकऱ्यावर घात केला असुन पाण्याअभावी धान पऱ्हे नाहीसे झाल्याने शेतात रोवणी कशी करायची, बिजाई कुठून आणायची असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे. ज्यांच्या शेतामध्ये विंधन विहीरी आहेत त्यांनी आपल्या धान पऱ्हयाला मोटार व इंधन द्वारे पाणी देऊन वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु अशा पद्धतीने पिक वाचवायचे तरी किती दिवस असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.मागील वर्षीसुद्धा या तालुक्यामध्ये धानपीक अगदी शेवटच्या टोकावर असताना पावसाने अचानक दडी मारली. परिणामी शेतकऱ्यांचे हातचे पिक नाहीसे झाले. त्याची धग अजुनही कायम असताना यावर्षी मात्र रोवणीच्या पूर्वीच पऱ्हे करपून नाहीसे होत असल्याने पुढे करायचे काय? असा बिकट प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला असुन लोकप्रतिनिधी आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या व्यूहरचनेत तल्लीने झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)