शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

हजारो हेक्टरमधील धान पऱ्हे धोक्यात

By admin | Updated: July 10, 2015 01:34 IST

तालुक्यामध्ये धान पिकाचे पऱ्हे टाकण्याची कामे आटोपली आहेत. तसेच कपाशी व सोयाबीनची पेरणीसुद्धा करण्यात आली.

पोंभूर्णा : तालुक्यामध्ये धान पिकाचे पऱ्हे टाकण्याची कामे आटोपली आहेत. तसेच कपाशी व सोयाबीनची पेरणीसुद्धा करण्यात आली. परंतु तब्बल एक महिना लोटूनसुद्धा पावसाने दडी मारल्याने धानपिकाचे पऱ्हे व सोयाबीन पाण्याअभावी करपू लागले असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. मागील एक महिन्यांपासून पावसाचा पत्ता नाही, तर दुसरीकडे गावातील लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीसाठी व्यूहरचना आखताना दिसत आहेत. तालुक्यात सिंचनाची पाहिजे तशी सुविधा नसल्याने दरवर्षीच अशा संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.जून महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने दमदार सुरूवात केली आणि तब्बल तीन ते चार दिवस सतत पाऊस पडल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी धान पिकाचे पऱ्हे टाकणीला सुरूवात केली. अनेकांनी कपाशी व सोयाबीनची पेरणीसुद्धा आटोपून घेतली. पावसाची दमदार सुरूवात बघून अनेकांनी रासायनिक खतासोबतच पेरणी केल्याचे समजते. जमीन ओलसर असल्याने व खताची मात्रा दिल्याने धानपिकाचे पऱ्हे व सोयाबीन जोमात आले. परंतु त्यानंतर एक महिना लोटूनसुद्धा पाऊस न पडल्याने आणि उन्हाचा उकाडा वाढल्याने जोमात आलेले धान पिकाचे पऱ्हे व सोयाबीन आता सुकायला लागली आहे. तर अनेकांच्या शेतातील धान पिकांचे पऱ्हे सुकून त्याचे तणसात रूपांतर झाले आहे. कृषी केंद्रातील महागडी बिजाई खरेदी करून शेतकऱ्यांनी शेतामध्ये टाकली. त्याची उगवण शक्तीसुद्धा चांगल्या प्रकारे झाली. शेतकरी आनंदात होता. परंतु निसर्गाच्या दृष्टचक्राने पुन्हा शेतकऱ्यावर घात केला असुन पाण्याअभावी धान पऱ्हे नाहीसे झाल्याने शेतात रोवणी कशी करायची, बिजाई कुठून आणायची असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे. ज्यांच्या शेतामध्ये विंधन विहीरी आहेत त्यांनी आपल्या धान पऱ्हयाला मोटार व इंधन द्वारे पाणी देऊन वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु अशा पद्धतीने पिक वाचवायचे तरी किती दिवस असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.मागील वर्षीसुद्धा या तालुक्यामध्ये धानपीक अगदी शेवटच्या टोकावर असताना पावसाने अचानक दडी मारली. परिणामी शेतकऱ्यांचे हातचे पिक नाहीसे झाले. त्याची धग अजुनही कायम असताना यावर्षी मात्र रोवणीच्या पूर्वीच पऱ्हे करपून नाहीसे होत असल्याने पुढे करायचे काय? असा बिकट प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला असुन लोकप्रतिनिधी आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या व्यूहरचनेत तल्लीने झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)