शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

हजारो हेक्टरमधील धान पऱ्हे धोक्यात

By admin | Updated: July 10, 2015 01:34 IST

तालुक्यामध्ये धान पिकाचे पऱ्हे टाकण्याची कामे आटोपली आहेत. तसेच कपाशी व सोयाबीनची पेरणीसुद्धा करण्यात आली.

पोंभूर्णा : तालुक्यामध्ये धान पिकाचे पऱ्हे टाकण्याची कामे आटोपली आहेत. तसेच कपाशी व सोयाबीनची पेरणीसुद्धा करण्यात आली. परंतु तब्बल एक महिना लोटूनसुद्धा पावसाने दडी मारल्याने धानपिकाचे पऱ्हे व सोयाबीन पाण्याअभावी करपू लागले असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. मागील एक महिन्यांपासून पावसाचा पत्ता नाही, तर दुसरीकडे गावातील लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीसाठी व्यूहरचना आखताना दिसत आहेत. तालुक्यात सिंचनाची पाहिजे तशी सुविधा नसल्याने दरवर्षीच अशा संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.जून महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने दमदार सुरूवात केली आणि तब्बल तीन ते चार दिवस सतत पाऊस पडल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी धान पिकाचे पऱ्हे टाकणीला सुरूवात केली. अनेकांनी कपाशी व सोयाबीनची पेरणीसुद्धा आटोपून घेतली. पावसाची दमदार सुरूवात बघून अनेकांनी रासायनिक खतासोबतच पेरणी केल्याचे समजते. जमीन ओलसर असल्याने व खताची मात्रा दिल्याने धानपिकाचे पऱ्हे व सोयाबीन जोमात आले. परंतु त्यानंतर एक महिना लोटूनसुद्धा पाऊस न पडल्याने आणि उन्हाचा उकाडा वाढल्याने जोमात आलेले धान पिकाचे पऱ्हे व सोयाबीन आता सुकायला लागली आहे. तर अनेकांच्या शेतातील धान पिकांचे पऱ्हे सुकून त्याचे तणसात रूपांतर झाले आहे. कृषी केंद्रातील महागडी बिजाई खरेदी करून शेतकऱ्यांनी शेतामध्ये टाकली. त्याची उगवण शक्तीसुद्धा चांगल्या प्रकारे झाली. शेतकरी आनंदात होता. परंतु निसर्गाच्या दृष्टचक्राने पुन्हा शेतकऱ्यावर घात केला असुन पाण्याअभावी धान पऱ्हे नाहीसे झाल्याने शेतात रोवणी कशी करायची, बिजाई कुठून आणायची असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे. ज्यांच्या शेतामध्ये विंधन विहीरी आहेत त्यांनी आपल्या धान पऱ्हयाला मोटार व इंधन द्वारे पाणी देऊन वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु अशा पद्धतीने पिक वाचवायचे तरी किती दिवस असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.मागील वर्षीसुद्धा या तालुक्यामध्ये धानपीक अगदी शेवटच्या टोकावर असताना पावसाने अचानक दडी मारली. परिणामी शेतकऱ्यांचे हातचे पिक नाहीसे झाले. त्याची धग अजुनही कायम असताना यावर्षी मात्र रोवणीच्या पूर्वीच पऱ्हे करपून नाहीसे होत असल्याने पुढे करायचे काय? असा बिकट प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला असुन लोकप्रतिनिधी आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या व्यूहरचनेत तल्लीने झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)