शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

९ जूनपूर्वी बियाणे घेणाऱ्या शेतकऱ्यांना हजारोंचा फटका

By admin | Updated: July 15, 2015 01:11 IST

या हंगामात मॉन्सून वेळेवर पोहचण्याचे भाकीत हंगामाच्या दोन ते तीन महिन्यांपूर्वीच करण्यात आल्याने पेरणीच्यावेळी बियाणाची टंचाई भासू नये,

अध्यादेशाला उशीर : कापूस बियाणाच्या पॉकेटवर १०० रुपयांची सूटवरोरा : या हंगामात मॉन्सून वेळेवर पोहचण्याचे भाकीत हंगामाच्या दोन ते तीन महिन्यांपूर्वीच करण्यात आल्याने पेरणीच्यावेळी बियाणाची टंचाई भासू नये, यासाठी शेतकऱ्यांनी कापूस बियाणांची खरेदी केली. त्यानंतर शासनाने ९ जूनपासून ज्या शेतकऱ्यांनी कापूस बियाणे घेतले, त्यांना प्रती पॉकेट १०० रुपयांची सुट दिली. ९ जूनपूर्वी जवळपास ४० टक्के शेतकऱ्यांनी कापूस बियाणांची खरेदी केली. त्यांना या लाभापासून आता वंचित रहावे लागणार आहे. तुर्तास शंभर रुपयांची सुट मिळणार नसल्याने शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा फटका बसला आहे.दरवर्षीच हंगामात कापसासह अन्य बियाणांचा काळाबाजार होत असतो. त्यामुळे पेरणीच्यावेळी पाहिजे असलेले वाण घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. प्रसंगी अधिक दराने बियाणे घ्यावे लागते. असा अनुभव शेतकऱ्यांना असल्यामुळे ४० टक्के शेतकरी हंगामाच्या एक महिन्यापूर्वीच कापूस, सोयाबीन बियाणांची खरेदी करीत असतात. यावषीसुद्धा शेतकऱ्यांनी एक ते दीड महिन्यांपूर्वीच कापूस बियाणांची खरेदी करून घेतली. हंगामापूर्वी कापूस बियाणांची खरेदी केल्यामुळे आवश्यक असलेले बियाणे मुबलक प्रमाणात शेतकऱ्यांना मिळाल्याने शेतकरी आनंदी झाला. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने कापूस बियाणांच्या प्रत्येक पॉकेटमागे १०० रुपये सुट जाहीर केली. १०० रुपये सुट ही प्रत्येक कापूस बियाणे कंपनीने देणे बंधनकारक केले. त्याचा अध्यादेश ९ जून रोजी पोहचला. ९ जूनपासून कापूस बियाणे घेणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी केंद्रातून प्रत्येक पॉकेट मागे सुट दिली जात आहे. ८ जूनपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कापूस बियाणे घेतले, त्या शेतकऱ्यांना सुट नाकारली. त्यामुळे या हंगामात ज्या शेतकऱ्यांनी ९ जूनपूर्वी कापूस बियाणे घेतले. ज्यांच्याकडे बियाणे घेतल्याची पावती आहे. अशा शेतकऱ्यांना शंभर रुपयांची सुट देण्याची मागणी सध्या शेतकऱ्यांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)