शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हजारो एकर जमीन सिंचनाखाली येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 23:07 IST

लोंढोली, हरंभा, साखरी, सिर्सी, डोणाळा, काढोळी परिसरामध्ये शेतीच्या सिंचनाचा फार मोठा प्रश्न आहे. परिणामी, धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. ही समस्या सोडविण्यासाठी गोसेखुर्दचे पाणी देण्याची मागणी १३ वर्षांपासून सुरू आहे.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : लोंढोली येथील बैठकीत नागरिकांना दिले आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : लोंढोली, हरंभा, साखरी, सिर्सी, डोणाळा, काढोळी परिसरामध्ये शेतीच्या सिंचनाचा फार मोठा प्रश्न आहे. परिणामी, धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. ही समस्या सोडविण्यासाठी गोसेखुर्दचे पाणी देण्याची मागणी १३ वर्षांपासून सुरू आहे. प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यासाठी १०० कोटींची निविदा काढण्यात आली. यातून कामे पूर्ण होतील आणि हजारो एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी लोंढोली येथील बैठकीत दिली. यावेळी वन व सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.परिसरातील गावांना पाणी मिळणार की नाही असा प्रश्न नागरिकांकडून सतत विचारला जात होता. त्यामुळे ४०० ते ५०० शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. यावेळी आ. वडेट्टीवार यांनी प्रकल्प आणि शेतीचा नकाशा दाखवून शेतकºयांना आश्वास्त केले. १०० टक्के पाणी मिळेल. कामाची सुरुवात केलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत पुढच्या वर्षी हजारो एकर सिंचनाखाली, अशी ग्वाही दिली. दरम्यान, सिंचन विभागातील अधिकाºयांनीही गोसेखुर्द प्रकल्पाची शेतकºयांनी माहिती दिली. वाघोली बुटी सिंचन प्रकल्पामुळे अनेक शेतकºयांना पाणी मिळत नाही. शेकडो शेतकºयांना वंचित राहावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेती वाचविण्याकरीता पुढील वर्षी कोणत्याही परिस्थितीत हे गाव वाघोली बुटी सिंचन प्रकल्पापासून बाजुला केल्या जाईल. वाघोली बुटी लिफ्ट इरिगेशन योजना सुरू न करता थेट त्याच कालव्यात गोसेखुर्दचे पाणी टाकून शेतकºयांची सिंचनाखाली आणू, अशी माहिती विधानसभा विरोधी पक्षनेते आ. वडेट्टीवार यांनी दिली. यावेळी उपस्थित शेतकºयांनी परिसरातील विविध समस्यांकडे लक्ष वेधले. सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यशवंत बोरकुटे जि. प. चे माजी बांधकाम सभापती, दिनेश चिटनूरवार, माजी प. स. सभापती, राकेश गड्डमवार, लोंढोलीच्या सरपंच लता कोमलवार, उपसरपंच दिलीप लटारे, मनोज खोबे, शंकर बोदलकर, मदन दुर्गे, भाऊजी बोदलकर, दिलीप गोवर्धन, पुंडलीक कुकडे, देवेन्द्र खोबे, गणेश भांडेकर, अर्चना भोयर, संगीता खोबे, शिला म्हशाखेत्री, आशिष मनबततुलवार, मुन्ना भांडेकर, मोहन कुनघाडकर, प्रवीण संतोषवार, आदींसह नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.समस्यांकडे वेधले लक्षसावली तालुक्यातील प्रलंबित समस्यांचा निपटारा करण्याची मागणी नागरिकांनी विरोधी पक्षनेते आ. वडेट्टीवार यांच्याकडे केली. सिंचनाअभावी शेतीचे कसे नुकसान होत आहे, याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. पाणी नसल्याने धानाचे उत्पादन घटले. त्यामुळे पुढील हंगामात हा प्रश्न सोडविण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी यावेळी केली.