शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
3
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
6
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
7
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
8
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
9
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
10
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
11
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
12
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
13
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
14
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
15
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
16
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
17
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
18
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
19
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
20
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद

आमराई वाॅर्डातील त्या नागरिकांना स्थायी घरपट्टे द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:53 IST

फोटो घुग्घुस : येथील आमराईसह इतर वॉर्डात मागील ३५ वर्षांपासून नजूलच्या जागेवर राहणाऱ्या नागरिकांना तहसीलदारांनी नोटीस बजावून सुनावण्यासाठी ...

फोटो

घुग्घुस : येथील आमराईसह इतर वॉर्डात मागील ३५ वर्षांपासून नजूलच्या जागेवर राहणाऱ्या नागरिकांना तहसीलदारांनी नोटीस बजावून सुनावण्यासाठी कार्यालयात हजर राहण्याची तंबी दिल्याने अतिक्रमणधारकांत भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे या नागरिकांना स्थायी पट्टे देण्याची मागणी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

बुधवारी शहर काँग्रेसचे राजू रेड्डी, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष रोशन पचारे व अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना याबाबतचे निवेदन सादर केले. आमराई परिसरातील नजूलच्या जागेवर सुमारे ३०० नागरिक मागील ३५ वर्षांपासून घरे बांधून वास्तव्य करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी ११८ लोकांना तहसीलदारांनी नोटीस पाठवून १ मार्चला तहसील कार्यालयात हजर राहून आपले म्हणणे मांडण्याची मुभा दिल्याने आपल्यावर बेघर होण्याची वेळ तर येणार नाही, अशी भीती निर्माण झाली. सदर गंभीर बाबीची दखल घेऊन जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन स्थायी घरपट्टे देण्याची तथा दंडासाठी त्रास देऊ नये, अशी विनंती केली आहे.