शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आरोपींना पोलिसांचे अभय

By admin | Updated: July 21, 2014 23:45 IST

स्मार्ट व्हॅल्यू प्रोडक्ट अ‍ॅन्ड सर्व्हिस लिमिटेड आणि एपीएलएल या दोन कंपन्यांच्या दलालांकडून चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास १५० ते २०० विद्यार्थ्यांची आर्थिक व शैक्षणिक फसवणूक झाली आहे.

एपीएलएलचे दलाल मोकाटच : गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळगडचांदूर : स्मार्ट व्हॅल्यू प्रोडक्ट अ‍ॅन्ड सर्व्हिस लिमिटेड आणि एपीएलएल या दोन कंपन्यांच्या दलालांकडून चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास १५० ते २०० विद्यार्थ्यांची आर्थिक व शैक्षणिक फसवणूक झाली आहे. याविरोधात विद्यार्थ्यांनी संघटन करून दलालांविरोधात चार महिन्यांपूर्वी तक्रार दाखल केली. मात्र पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. सदर दलालांनी शिक्षण देऊन आयटीची पदविका देण्याचे आश्वासन प्रवेश घेतेवेळी विद्यार्थ्यांना दिले होते. माात्र या कंपन्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण न देता विद्यार्थ्यांचे वर्ष वाया घालविले आहे. आर्थिक व मानसिक शोषण केल्याप्रकरणी विद्यार्थ्यांनी गडचांदूर पोलीस ठाण्यात चार महिन्यांपूर्वी तक्रार दाखल केली होती. आरोपींची नावे व फोटो पोलिसांना प्राप्त झाले असून आरोपींच्या ठिकाणांचा पत्ताही माहित असताना अजूनही पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला नसल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.स्मार्ट व्हॅल्यू प्रोडक्ट अ‍ॅन्ड सर्व्हिस लिमिटेड या नावाने आठ हजार ७९९ रुपयांचा डि.डी. काढून विद्यार्थ्यांना आय.टी. चा डिप्लोमा देण्यात येणार होता. म्हणून गडचांदूर, राजुरा, जिवती, कोरपना, नांदाफाटा, लखमापूर, पिंंपळगाव, हरदोना, मानोली, सोनुर्ली, नारंडा, लोणी, कळमना, चिंचोली, तळोधी, खिर्डी, कवठाळा व परिसरातील इतर गावातील विद्यार्थ्यांनी आय.टी. शिक्षणाचा डिप्लोमा मिळविण्यासाठी प्रवेश घेतला. मात्र प्रवेशाच्यावेळी दिलेले एकही आश्वासन पूर्ण न करता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षसुद्धा वाया घालविले.सदर कंपनीचे दलाल अतुल कोहपरे, संजय निमगडे, सचिन मडावी, हेमंत कुळसंगे, अर्जून आलाम, समय्या पनेट्टीवार यांनी विद्यार्थ्यांकडून डी.डी. काढून घेतल्यानंतर गडचांदूर येथील गौस सिद्दीकी यांच्या ब्लॉसम कॅम्प्यूटर इंन्स्टीट्यूटशी करार करून विद्यार्थ्यांना तिथे शिक्षण देण्याचे ठरविण्यात आले. सिद्दीकी यांना त्याचा मोबदला मिळणार होता. मात्र काही दिवस मोबदला देऊन कंपनीने सिद्दीकीला मोबदला देणे बंद केल्याने त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देणे बंद केले. त्यामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक व शैक्षणिक फसवणूक झाली आहे.कंपनीने विद्यार्थ्यांना आय.टी. पदविकेचे महत्त्व पटवून सांगितले. ७० टक्कपेक्षा जास्त गुण घेतल्यास मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कंपनीकडूनच रोजगार मिळवून देण्यात येणार असे सांगण्यात आले होते. शिक्षण देणे बंद केल्यानंतर विद्यार्थ्यांनी वारंवार कंपनीच्या एजेंट लोकांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते ‘तुमच्याने जे होते ते करून घ्या’ म्हणून उडवाउडवीची उत्तरे देत होते. दोन वर्ष गेल्यानंतरही विद्यार्थ्यांना कंपनीकडून साधा फोन सुद्धा आला नाही. तसेच काही मुलांकडून परस्पर पैसे घेऊन त्यांचा डी.डी. न काढता पैसे हडपण्यात आले. एवढेच नाही तर डीडी काढणाऱ्या अनेक मुलांचे एपीएलएलच्या यादीत नावही नसल्याचे समजते.कंपनीने विद्यार्थ्यांची झालेली शैक्षणिक व आर्थिक नुकसान भरपाई करून द्यावी व भविष्यात कोणत्याही विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळू नये म्हणून विद्यार्थ्यांकडे आलेल्या दलालांवर कारवाई व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी गडचांदूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. मात्र अजूूनपर्यंत पोलिसांनी कारवाई का केली नाही हा प्रश्न तक्रारकर्त्यां विद्यार्थ्यांना पडला आहे. (शहर प्रतिनिधी)