शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

वरोरा तालुक्यात शिवभोजन थाळीचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:29 IST

वरोरा : शहरात शिवभोजन थाळीचा तुटवडा कोरोनाच्या अस्मानी संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले, तर हातावर पोट असणाऱ्या मजुरांची दैना झाली. ...

वरोरा : शहरात शिवभोजन थाळीचा तुटवडा

कोरोनाच्या अस्मानी संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले, तर हातावर पोट असणाऱ्या मजुरांची दैना झाली. राज्यात १५ एप्रिलपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. गरिबांना मिळणारी दहा रुपयांची शिवभोजन थाळी एक महिन्याकरिता मोफत देण्यात येणार असल्याची घोषणाही झाली. मात्र, वरोऱ्यात या योजनेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे.

रोजी मंदावली तरी रोटी थांबणार नाही अशी घोषणा शासनाकडून करण्यात आली. नोंदणीकृत सात कोटी लोकांना तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मिळणार असल्याचीही ग्वाही देण्यात आली. शासनाच्यावतीने तसे निर्देश प्रशासनाला देण्यातसुद्धा आले; मात्र दहा दिवस लोटूनही या सर्व घोषणा कागदावरच राहिल्या. अजूनपर्यंत गरिबांच्या दारापर्यंत ना गहू-तांदूळ पोहोचले नाही, शिवथाळी पुरेशा प्रमाणात मिळत आहे. गरिबांच्या पोटाची अवस्था बिकट झाली आहे.

देशात पहिल्या लाॅकडाऊनच्या काळात अनेक सामाजिक संस्थांनी, गरीब आणि कष्टकऱ्यांची भोजनाची व्यवस्था नि:शुल्क केली होती. त्यामुळे पोटाचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटला होता. यावेळी मात्र सामाजिक आणि राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पुढे येताना दिसत नाही. वरोरा शहरामध्ये दोन शिवभोजन केंद्रे आहेत. त्यांची एकूण क्षमता ३०० थाळींची असून, गरजू व्यक्ती त्या ठिकाणी सकाळपासूनच रांगा लावतात. सामाजिक दुरतेचा अभाव आणि बिना मास्क या गरिबांचे संपूर्ण कुटुंब रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अवघ्या पंधरा-वीस मिनिटांतच या थाळ्या संपत असून, बाकीच्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहेत. कोरोनाची ही स्थिती किती काळ राहील हे अनिश्चित असून, आता पोट कसे भरावे या विवंचनेत हे कष्टकरी सापडले आहेत.

क्षमता वाढविण्याची मागणी करणार : तहसीलदार

या संदर्भात तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांना विचारले असता शहरात दोनच केंद्रे असून, त्यांची क्षमता ठरलेली आहे असे ते म्हणाले. त्यांची वाढीव क्षमता जिल्हाधिकारी मंजूर करतात, त्यामुळे यांच्याकडे मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच गरिबांना मिळणारा गहू व तांदूळ अद्याप रेशन दुकानात पोहोचला नसल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासनाकडे मागणी करणार : शिवसेना

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते म्हणाले की, प्रशासन कमी पडत असेल तर शिवसेना आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गरिबांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येईल, तसेच प्रशासनाकडे अतिरिक्त शिवभोजन थाळीची मागणी करण्यात येईल.