शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्त न्यायालयाचे दार ठोठावणार

By admin | Updated: April 30, 2016 00:53 IST

चारगाव धरणातील गाळपेर जमिनीचे नियमानुसार शपथपत्र आणि भूभाडे भरुनही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सन २०१५-१६ या सत्रात ...

चारगाव धरण: शपथपत्र व भूभाडे भरूनही गाळपेर जमिनीचे वाटप नाहीवरोरा : चारगाव धरणातील गाळपेर जमिनीचे नियमानुसार शपथपत्र आणि भूभाडे भरुनही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सन २०१५-१६ या सत्रात रब्बी हंगामाकरिता गाळपेर जमीनचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पिके न घेता आल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई देण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना आतापर्यंत दोनदा निवेदने देण्यात आलीत. मात्र त्यालाही अधिकाऱ्यांनी केराचीच टोपली दाखविली. त्यामुळे त्रस्त झालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच थेट आर्थिक नुकसान भरपाई संदर्भात आता साकडे घातले आहे. १० मे रोजीपर्यंत नुकसानभरपाई न मिळाल्यास नाईलाजाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल, असा इशारा आकोला नं. एक येथील भूभाडे भरणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.आकोला क्रमांक एक येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित शेतजमीन चारगाव धरणाच्या बुडीत क्षेत्राकरिता संपादीत करण्यात आली होती. धरणातील गाळपेर जमीन रब्बी हंगामाकरिता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना भूभाडे भरुन वहिवाटीसाठी देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज केले. तत्कालिन तहसीलदार प्रमोद कदम यांनी पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्येकी दोन एकर याप्रमाणे जमिनीचे पट्टे वाटप केले. त्यानंतर ५१ शेतकऱ्यांनी नियमानुसार शपथपत्र आणि १००० भुभाडे असा एकूण ५१ हजार रुपये रकमेचा भरणा केला. परंतु काही लोकांनी चारगाव धरणातील ९६.२३ हेक्टर गाळपेर जमिनीवर अतिक्रमण करुन शासनाला न जुमानता विविध पिकांची पेरणी केली. त्यामुळे जमीन वाटपाची प्रक्रीया रखडली. अतिक्रमित जागेवरील पिके शासन जमा करुन त्या पिकांचा लिलाव करण्यात येईल, असा निर्णय उपविभागीय अधिकारी लोंढे, कार्यकारी अभियंता सोनाने, तहसीलदार कदम, सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता एल. व्ही. घागी यांनी घेतला होता.दरम्यान, अतिक्रमण करणाऱ्या लोकांनी आपली पिके वाचविण्यासाठी न्यायालयाचा आधार घेतला. परंतु पुराव्याअभावी त्यांचे प्रकरणच खारीज केले. त्यानंतर न्यायालयीन आदेशानुसार वरोरा पाटबंधारे उपविभागाने अतिक्रमित पिकांच्या लिलावाची प्रक्रिया राबविली. परंतु यांना त्या कारणामुळे तीनदा लिलावाची प्रक्रीया पुढे ढकलल्यामुळे लिलाव घेणारे शेतकरी त्रस्त झाले होते. लिलाव न झाल्यामुळे शासन जमा असलेल्या ९६.२३ हेक्टर जमीनीवरील पिके अतिक्रमधारक शेतकऱ्यांनी आपल्या घरी नेली. त्यामुळे लिलावाच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत अंदाजे ३० लाख रुपये महसूल गोळा होणार होता. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे त्या महसूलापासून मुकावे लागले आहे.याउलट प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागातून मिळणाऱ्या दोन एकर जमिनीतून ६० हजार रुपये उत्पन्न होण्याची अपेक्षा होती. आम्हाला जमीन न मिळाल्यामुळे उत्पन्नापासून वंचित राहावे लागले आहे. नुकसान भरपाई देण्यासंदर्भात आतापर्यंत अधिकारी वर्गाला दोनदा निवेदन ेदिलीत. परंतु त्यानी ही आमच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.अखेरच्या पर्याय म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनाच आता साकडे घातले आहे. आजच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भूभाडे भरणाऱ्या प्रत्येक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याला १० मेपर्यंत ६० हजार रुपये आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, त्या तारखेपर्यंत नुकसान भरपाई न मिळाल्या आम्हाला न्यायालयात जावे लागेल, असेही निवेदनात म्हटले आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, आ. बाळू धानोरकर, जिल्हाधिकारी चंद्रपूर, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, एसडीओ वरोरा, तहसीलदार सहाय्यक कार्यकारी अभियंता, वरोरा यांनाही भुभाडे भरणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी निवेदन पाठविले आहे. (तालुका प्रतिनिधी)