शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

चौफेर पाणी असताना ते बेटावर फुलवितात शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:06 IST

लोकमत विशेष दुथळी भरून वाहणाऱ्या नदीपात्रातून प्रवास : सर्जाराजाही नदी पात्रात घेतात उडी नीलेश झाडे गोंडपिपरी : समुद्रासारखे चौफेर ...

लोकमत विशेष

दुथळी भरून वाहणाऱ्या नदीपात्रातून प्रवास : सर्जाराजाही नदी पात्रात घेतात उडी

नीलेश झाडे

गोंडपिपरी : समुद्रासारखे चौफेर अथांग पसरलेले पाणी. त्यात मध्यभागी असलेल्या बेटावर शेती फुलविण्याचा विचारही कुणी करणार नाही. मात्र गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बेटावर शेती फुलविण्याचा दिव्य पराक्रम केला. ही शेती फुलविण्यासाठी दुथळी भरून वाहणाऱ्या नदीपात्रातून त्यांना रोजच जावे लागते. आपल्या आवडत्या बळीराजाच्या सोबतीला सर्जाराजाही नदी पात्रात उडी घेतात. निसर्गाच्या रौद्र रूपाला छातीवर झेलणारे हे जिगरबाज शेतकरी शिवनी गावातील आहेत.

गोंडपिपरी तालुक्याला वर्धा-वैनगंगा नदीने वेढले आहे. या दोन्ही नद्या शिवनी गावाजवळ एक होतात. पावसाळ्यात या संगमाला समुद्राचे रूप प्राप्त होते. या संगमाच्या मध्यभागी दोन मोठ्या टेकडी आहेत. एका टेकडीला मोठा कुर्ता, दुसऱ्याला लहान कुर्ता म्हणून ओळखले जाते. या दोन्ही टेकडीवर शिवनी गावातील शेतकऱ्यांची जवळपास तीनशे ते चारशे एकर शेती आहे. शेतात कपाशी, तूर, सोयाबीन ही पिके घेतली जातात.

पावसाळ्याचा सुरुवातीला नदी पात्रात पाणी कमी असते. नदी पात्रातून बैलबंडी सहज जाऊ शकते. त्यादरम्यान शेतीची मशागत येथील शेतकरी आटोपून टाकतात. पहिल्या पावसातच संगमात चौफेर पाणी दिसू लागते. या पाण्यातून नावेने मार्ग काढीत शेतकरी बेट गाठतात. शेतीची अवजारे, बि-बियाणे, मजूर साऱ्यांनाच दुथळी भरून वाहणाऱ्या नदी पात्रातून जावे लागते. आपल्या आवडत्या बळीराजाची सोबत कशी सोडणार? तेही नदी पात्रात उडी घेऊन बेट गाठतात. शिवनी येथील शेतकऱ्यांचा हा रोजचाच प्रवास. अथांग पाणी बघून काळजाचा जिथे ठोका चुकतो, तिथे मात्र शिवनीतील जिगरबाज शेतकऱ्यांनी शेती फुलविली आहे.

बॉक्स

प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वत:ची नाव

या दोन्ही कुर्तावर ज्यांची शेती आहे, त्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे स्वमालकीची नाव आहे. या नावेत तीन ते चार व्यक्ती प्रवास करू शकतात. मात्र शासनाने मोठी नाव दिल्यास बेटाकडे जाण्याचा प्रवास सुकर होईल, अशी प्रतिक्रिया शिवनी येथील शेतकरी सखाराम गद्दे यांनी दिली.

बॉक्स

संगमाकडे जाणारी वाट चिखलमय

शिवनी गावापासून संगम जवळपास एक कि.मी. अंतरावर आहे. मार्ग पक्का नाही. त्यामुळे पावसाळ्यात हा मार्ग चिखलमय होऊन जातो. ये-जा करणे कठीण होऊन जाते. या मार्गाचे पक्के बांधकाम करण्याची मागणी मारोती मंडरे या शेतकऱ्यांनी केली आहे.