शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
3
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
4
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
5
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
6
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
7
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
8
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
9
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
10
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
11
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
12
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
13
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
14
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
15
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
16
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
17
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
18
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
19
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
20
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक

चौफेर पाणी असताना ते बेटावर फुलवितात शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:06 IST

लोकमत विशेष दुथळी भरून वाहणाऱ्या नदीपात्रातून प्रवास : सर्जाराजाही नदी पात्रात घेतात उडी नीलेश झाडे गोंडपिपरी : समुद्रासारखे चौफेर ...

लोकमत विशेष

दुथळी भरून वाहणाऱ्या नदीपात्रातून प्रवास : सर्जाराजाही नदी पात्रात घेतात उडी

नीलेश झाडे

गोंडपिपरी : समुद्रासारखे चौफेर अथांग पसरलेले पाणी. त्यात मध्यभागी असलेल्या बेटावर शेती फुलविण्याचा विचारही कुणी करणार नाही. मात्र गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बेटावर शेती फुलविण्याचा दिव्य पराक्रम केला. ही शेती फुलविण्यासाठी दुथळी भरून वाहणाऱ्या नदीपात्रातून त्यांना रोजच जावे लागते. आपल्या आवडत्या बळीराजाच्या सोबतीला सर्जाराजाही नदी पात्रात उडी घेतात. निसर्गाच्या रौद्र रूपाला छातीवर झेलणारे हे जिगरबाज शेतकरी शिवनी गावातील आहेत.

गोंडपिपरी तालुक्याला वर्धा-वैनगंगा नदीने वेढले आहे. या दोन्ही नद्या शिवनी गावाजवळ एक होतात. पावसाळ्यात या संगमाला समुद्राचे रूप प्राप्त होते. या संगमाच्या मध्यभागी दोन मोठ्या टेकडी आहेत. एका टेकडीला मोठा कुर्ता, दुसऱ्याला लहान कुर्ता म्हणून ओळखले जाते. या दोन्ही टेकडीवर शिवनी गावातील शेतकऱ्यांची जवळपास तीनशे ते चारशे एकर शेती आहे. शेतात कपाशी, तूर, सोयाबीन ही पिके घेतली जातात.

पावसाळ्याचा सुरुवातीला नदी पात्रात पाणी कमी असते. नदी पात्रातून बैलबंडी सहज जाऊ शकते. त्यादरम्यान शेतीची मशागत येथील शेतकरी आटोपून टाकतात. पहिल्या पावसातच संगमात चौफेर पाणी दिसू लागते. या पाण्यातून नावेने मार्ग काढीत शेतकरी बेट गाठतात. शेतीची अवजारे, बि-बियाणे, मजूर साऱ्यांनाच दुथळी भरून वाहणाऱ्या नदी पात्रातून जावे लागते. आपल्या आवडत्या बळीराजाची सोबत कशी सोडणार? तेही नदी पात्रात उडी घेऊन बेट गाठतात. शिवनी येथील शेतकऱ्यांचा हा रोजचाच प्रवास. अथांग पाणी बघून काळजाचा जिथे ठोका चुकतो, तिथे मात्र शिवनीतील जिगरबाज शेतकऱ्यांनी शेती फुलविली आहे.

बॉक्स

प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वत:ची नाव

या दोन्ही कुर्तावर ज्यांची शेती आहे, त्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे स्वमालकीची नाव आहे. या नावेत तीन ते चार व्यक्ती प्रवास करू शकतात. मात्र शासनाने मोठी नाव दिल्यास बेटाकडे जाण्याचा प्रवास सुकर होईल, अशी प्रतिक्रिया शिवनी येथील शेतकरी सखाराम गद्दे यांनी दिली.

बॉक्स

संगमाकडे जाणारी वाट चिखलमय

शिवनी गावापासून संगम जवळपास एक कि.मी. अंतरावर आहे. मार्ग पक्का नाही. त्यामुळे पावसाळ्यात हा मार्ग चिखलमय होऊन जातो. ये-जा करणे कठीण होऊन जाते. या मार्गाचे पक्के बांधकाम करण्याची मागणी मारोती मंडरे या शेतकऱ्यांनी केली आहे.