शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ ३१ वर्षांनी भेटले आणि म्हणाले, ‘आम्ही ए.एन.सी.ची मुलं !’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:28 IST

३१ वर्षांनी भेटले आनंदनिकेतच्या १९९१ चे बॅचमेट्स ! वरोरा : वरोरातील आनंद निकेतन महाविद्यालयात शिकणारे १९९१ चे कला शाखेचे ...

३१ वर्षांनी भेटले आनंदनिकेतच्या १९९१ चे बॅचमेट्स !

वरोरा : वरोरातील आनंद निकेतन महाविद्यालयात शिकणारे १९९१ चे कला शाखेचे बॅचमेट्स तब्बल ३१ वर्षांनी गेट टु गेदरच्या निमित्ताने भेटले. ताडोबातील एका रिसॉर्टमध्ये निसर्गसानिध्यात झालेल्या या स्नेहभेटीत जुन्या आठवणींनी उजाळा देणाऱ्या आणि हरवलेल्या मैत्रीचा पुन्हा आनंद फुलवणाऱ्या ठरल्या.

महाविद्यालय सुटल्यावर आपआपल्या कार्यात वेगवेगळ्या शहरात रमलेल्या या सर्व वर्गमित्रांना आणि मैत्रिणींना आनंद खिरटकर आणि विद्या झापर्डे-उमाटे यांनी एक व्हाटॅस गृपची स्थापना करून एकत्र आणले. यातून ही स्नेहमिलनाची संकल्पना पुढे आली. मागील रविवारी तब्बल २७ जणांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. वर्गाचे सीआर असलेले विलास मत्ते, विठ्ठल उपरे तसेच आनंद खिरटकर, धर्मदास गेडाम, संगिता एकरे-घुगल, विद्या म्हशाखेत्री-गलांडे आणि दिपकांता लभाणे-ठावरे हे पाहुणे होते. दिवंगत प्राध्यापक आणि वर्गमित्रांना श्रद्धांजली वाहून या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. दीपप्रज्वलनाने आणि फलकावरील रेषा जोडून ‘आम्ही एएनसीची मुलं !’ अशी अक्षरे प्रगटवणाऱ्या अभिवन संकल्पनेतून उद्घाटन झाले. सर्वांच्या मनोगतामधून या उपक्रमाप्रति कृतज्ञता व्यक्त झाली. विद्या झापर्डे यांनी ऑनलाईन संपर्क साधून या सत्राला हजेली लावली. जुन्या आठवणी जाग्या करत गोपालकृष्ण मांडवकर यांनी संचालन केले. प्रास्ताविक गुणवंत वाभीटकर यांनी तर सत्राचे आभार मधुकर बुरीले यांनी मानले.

‘आठवणींच्या हिंदोळ्यावर’ या दुसऱ्या सत्राचे संचालन दामोदर दोहतरे यांनी केले. महाविद्यालयाच्या इमारतीमधून आयुष्याला मिळालेले वळण, महाविद्यालयातील आठवणी, अनुभवलेले क्षण, एकमेकांच्या गमजीजमती अशा निखळ आनंदाला जणू उधाणच आले होते. सर्वांनीच मनमोकळेपणाने अनुभवकथन केले. याच सत्रात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आलेले गुणवंत वाभीटकर यांच्यासह मोतीराम पोतराजे, चंदू ढवळे या वर्गमित्रांचे वाढदिवस केक कापून साजरे करण्यात आले. या सत्राचे आभार कल्पना जेनेकर-बोढे यांनी मानले.

दुसऱ्या दिसशी सकाळी ताडोबा जंगल सफारीचा आनंद सर्वांनी लुटला. दुपारचे अंतिम सत्र निरोपाचे होते. बाबा जांगडे यांनी संचालन केले. पुढील स्नेहमिलनाची जबाबदारी भद्रावतीकर वर्गमित्रांवर सोपवून दामोदर दोहतरे यांच्याकडे आयोजनाची सूत्रे सोपविण्यात आली. राजू आगलावे, प्रदीप चट्टे, मोरेश्वर डुकरे, अरविंद साळवे, माया एकरे-बुट्टे, ज्योती रासेकर-तायडे, आशा तराळे, सुरेखा सूर-आसुटकर यांचा यात सहभाग होता. निरोपाच्या क्षणी सर्वांचीच मने हळवी आणि जड झाली होती. एकमेकांचा निरोप घेताना अनेकांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या.