शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
4
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
5
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
6
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
7
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
8
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
9
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
10
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
11
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
12
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
13
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
14
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
15
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
16
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
17
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
18
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
19
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
20
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

‘ते’ ३१ वर्षांनी भेटले आणि म्हणाले, ‘आम्ही ए.एन.सी.ची मुलं !’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:28 IST

३१ वर्षांनी भेटले आनंदनिकेतच्या १९९१ चे बॅचमेट्स ! वरोरा : वरोरातील आनंद निकेतन महाविद्यालयात शिकणारे १९९१ चे कला शाखेचे ...

३१ वर्षांनी भेटले आनंदनिकेतच्या १९९१ चे बॅचमेट्स !

वरोरा : वरोरातील आनंद निकेतन महाविद्यालयात शिकणारे १९९१ चे कला शाखेचे बॅचमेट्स तब्बल ३१ वर्षांनी गेट टु गेदरच्या निमित्ताने भेटले. ताडोबातील एका रिसॉर्टमध्ये निसर्गसानिध्यात झालेल्या या स्नेहभेटीत जुन्या आठवणींनी उजाळा देणाऱ्या आणि हरवलेल्या मैत्रीचा पुन्हा आनंद फुलवणाऱ्या ठरल्या.

महाविद्यालय सुटल्यावर आपआपल्या कार्यात वेगवेगळ्या शहरात रमलेल्या या सर्व वर्गमित्रांना आणि मैत्रिणींना आनंद खिरटकर आणि विद्या झापर्डे-उमाटे यांनी एक व्हाटॅस गृपची स्थापना करून एकत्र आणले. यातून ही स्नेहमिलनाची संकल्पना पुढे आली. मागील रविवारी तब्बल २७ जणांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. वर्गाचे सीआर असलेले विलास मत्ते, विठ्ठल उपरे तसेच आनंद खिरटकर, धर्मदास गेडाम, संगिता एकरे-घुगल, विद्या म्हशाखेत्री-गलांडे आणि दिपकांता लभाणे-ठावरे हे पाहुणे होते. दिवंगत प्राध्यापक आणि वर्गमित्रांना श्रद्धांजली वाहून या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. दीपप्रज्वलनाने आणि फलकावरील रेषा जोडून ‘आम्ही एएनसीची मुलं !’ अशी अक्षरे प्रगटवणाऱ्या अभिवन संकल्पनेतून उद्घाटन झाले. सर्वांच्या मनोगतामधून या उपक्रमाप्रति कृतज्ञता व्यक्त झाली. विद्या झापर्डे यांनी ऑनलाईन संपर्क साधून या सत्राला हजेली लावली. जुन्या आठवणी जाग्या करत गोपालकृष्ण मांडवकर यांनी संचालन केले. प्रास्ताविक गुणवंत वाभीटकर यांनी तर सत्राचे आभार मधुकर बुरीले यांनी मानले.

‘आठवणींच्या हिंदोळ्यावर’ या दुसऱ्या सत्राचे संचालन दामोदर दोहतरे यांनी केले. महाविद्यालयाच्या इमारतीमधून आयुष्याला मिळालेले वळण, महाविद्यालयातील आठवणी, अनुभवलेले क्षण, एकमेकांच्या गमजीजमती अशा निखळ आनंदाला जणू उधाणच आले होते. सर्वांनीच मनमोकळेपणाने अनुभवकथन केले. याच सत्रात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आलेले गुणवंत वाभीटकर यांच्यासह मोतीराम पोतराजे, चंदू ढवळे या वर्गमित्रांचे वाढदिवस केक कापून साजरे करण्यात आले. या सत्राचे आभार कल्पना जेनेकर-बोढे यांनी मानले.

दुसऱ्या दिसशी सकाळी ताडोबा जंगल सफारीचा आनंद सर्वांनी लुटला. दुपारचे अंतिम सत्र निरोपाचे होते. बाबा जांगडे यांनी संचालन केले. पुढील स्नेहमिलनाची जबाबदारी भद्रावतीकर वर्गमित्रांवर सोपवून दामोदर दोहतरे यांच्याकडे आयोजनाची सूत्रे सोपविण्यात आली. राजू आगलावे, प्रदीप चट्टे, मोरेश्वर डुकरे, अरविंद साळवे, माया एकरे-बुट्टे, ज्योती रासेकर-तायडे, आशा तराळे, सुरेखा सूर-आसुटकर यांचा यात सहभाग होता. निरोपाच्या क्षणी सर्वांचीच मने हळवी आणि जड झाली होती. एकमेकांचा निरोप घेताना अनेकांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या.