शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

३० गावातील ग्रामीण रस्त्यांची होणार दर्जोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 23:31 IST

जिल्ह्यातील आडवळणाच्या रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने नागरिकांना पावसाळ्यात संकटांना सामोरे जावे लागत होेते. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत एशियन डेव्हलपमेंटच्या अर्थसहाय्याने ३० गावातील ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी ४ कोटी ९० लाखांचा निधी शनिवारी ग्राम विकास विभागाकडून मंजूर करण्यात आला. २०१९ ते २०२० या वित्तीय वर्षातच ही कामे पूर्ण केली जाणार आहे.

ठळक मुद्देपाच कोटी मंजूर : नागरिकांच्या अडचणी संपणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील आडवळणाच्या रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने नागरिकांना पावसाळ्यात संकटांना सामोरे जावे लागत होेते. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत एशियन डेव्हलपमेंटच्या अर्थसहाय्याने ३० गावातील ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी ४ कोटी ९० लाखांचा निधी शनिवारी ग्राम विकास विभागाकडून मंजूर करण्यात आला. २०१९ ते २०२० या वित्तीय वर्षातच ही कामे पूर्ण केली जाणार आहे.ब्रह्मपुरी तालुक्यातील मांगली (रै.) ते गवर्ला चेक, बेलपातळी (मु.) ते तळोधी (खु.), मुडझा बेटेगाव, चिमूर तालुक्यात बामणी तुकूम मासळ, करवळा, मदनापूर, विहिरगाव वरोरा तालुक्यात फत्तेपूर, उमरी, भद्रावती तालुक्यात चोरा ते चिंचोली, रामा ते चरूर रस्ता राजुरामध्ये रामा ते मुठाळा, खिर्डी, पाचगाव ते कोच्ची, पोंभुर्णा तालुक्यात जुमगाव ते टोक, चंद्रपूर तालुक्यामध्ये बेलसनी, छोटा नागपूर, विचोडा, रय्यतवारी आणि चंद्रपुरातील बिनबा गेट ते चोरा या मार्गाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. पावसाळ्यामध्ये या मार्गावरून वाहने व बैलबंडी नेताना अग्निदिव्याला सामोरे जावे लागते. या मार्गावर लहान-मोठे अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यांची किमान दुरूस्ती करण्याची मागणी पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने केली.लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ही कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामविकास विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता.या प्रस्तावाला शनिवारी मान्यता प्रदान करण्यात आली. शिवाय कामाची अंदाजित रक्कम, पाच वर्षांची नियमित देखभाल तसेच दुरूस्तीसाठी ४ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर केला आहे. तांत्रिक मान्यता प्रदान करण्यापूर्वी या रस्त्यांच्या कामाची तपासणी करून संबंधित अहवाल ग्राम विकास विभागाकडे सादर केल्या जाणार आहे.खासगी जमिनीची तपासणीआठ तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दर्जोन्नती करताना त्यालगत असलेली खासगी जमीन अंतिम मोजणीशिवाय ताब्यात घेऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहे. काम सुरू करताना वाद होऊ नये, यासाठी जमिनीची तपासणी करूनच अहवालाची पूर्तता करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली.