शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागात १५ सेवांची मिळणार हमी

By admin | Updated: July 20, 2015 00:53 IST

माती तपासणी, ठिबक सिंचन नोंदणी, लागवड साहित्य आयात करण्यासाठी उत्पादकता प्रमाणपत्र देणे यासारख्या....

शासन निर्णय : शेतकऱ्यांना दाद मागण्याचा अधिकार, कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाईचंद्रपूर : माती तपासणी, ठिबक सिंचन नोंदणी, लागवड साहित्य आयात करण्यासाठी उत्पादकता प्रमाणपत्र देणे यासारख्या कृषी विभागाच्या १५ सेवा, निश्चित वेळेत मिळाल्या नाहीत तर शेतकऱ्यांना त्या विरोधात दाद मागता येणार आहे. अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक विलंब करून सेवा पुरविण्यास दिरंगाई केल्याचे निष्पन्न झाल्यास त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते.महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्यानुसार कृषी विभागाच्या १५ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. तसेच या सेवा नेमक्या किती कालावधीत पुरवाव्यात त्याची कालर्मयादा आणि निश्चित कालावधीत सेवा पुरवली नाही तर ज्यांच्याकडे दाद मागता येईल, त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची यादी अधिसूचना काढून जाहीर करण्यात आली आहे. विधानसभेत नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क विधेयक मंजूर करण्यात आले. राज्यातील भाजपा सरकारने पहिल्याच बैठकीत नागरिकांना वेळेत सेवा मिळविण्यासाठी कायदा करण्याचे जाहीर केले होते. तसेच यासंबंधीचा अध्यादेश जारी करण्यात आला होता. या कायद्यामुळे जनतेला निश्चितच वेळेत सेवा मिळण्याचा अधिकार मिळाला असून सरकारी अधिकारी वेळेत काम करण्यास बांधील राहणार आहेत. वेळेत सेवा न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची तरतूद या कायद्यात असून यामुळे अनियमितता, भ्रष्टाचारासारखे प्रकार कमी होतील, असा आशावाद सरकारने व्यक्त केला आहे. राज्य शासनाच्या या कायद्यानुसार शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा कालावधी ठरवून देण्यात आला आहे. कृषी आयुक्तांनी अधिसूचना काढून कृषी विभागाच्या १५ सेवा अधिसूचित केल्या आहेत. ठराविक मुदतीत सेवा न मिळाल्यास शेतकऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी प्रत्येक सेवेसाठी प्रथम व द्वितीय अपलीय अधिकारी ठरवून दिले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)