शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

सरकारने न्याय दिला असता तर न्यायालयात जाण्याची गरज नव्हती-पुगलिया

By admin | Updated: July 17, 2015 00:52 IST

चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी आपण आधीपासून लढत होतो.

चंद्रपूर : चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी आपण आधीपासून लढत होतो. यासाठी विद्यमान राज्य व केंद्र सरकारकडेही पाठपुरावा केला होता. या सरकारांनी या सामाजिक प्रश्नावरील मागणीला न्याय दिला असता, तर न्यायालयात जाण्याची गरज नव्हती, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केले. गुरूवारी सायंकाळी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे आणि त्यानंतर केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने काढलेल्या आदेशाचे स्वागत केले. ते म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयाने आम्ही समाधानी झालो आहोत. चंद्रपुरात होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयामुळे आता हे शहर एज्युकेशन हब बनणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने ८ जुलैला दिलेल्या आदेशात आठवडाभरात हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे आणि शंभर विद्यार्थ्यांच्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात एमसीआयने सर्वोच्च न्यायालयात अपील केली होती. १५ जुलैला सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपिठासमोर उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात स्टे मागण्याचाही प्रयत्न झाला होता. मात्र उच्च न्यायालयाच्या मुदतीचा हा शेवटचा दिवस असल्याने एमसीआयने पूर्ण प्रयत्न केले. मात्र ते निष्फळ ठरले. १६ जुलैला हे प्रकरण या खंडापिठासमोर पुन्हा सुनावणीला आल्यावर न्यायालयाने स्थगनादेशाला नकार दिला. मात्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच ना.नितीन गडकरी आणि चंद्रपुरातील दोन्ही मंत्र्यांनी या महाविद्यालयासाठी पाठपुरावा केला, असे सांगणे म्हणजे जनतेची दिशाभूल आहे, असे म्हणाले.(जिल्हा प्रतिनिधी)