शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आझाद मैदानावर आंदोलन करावे, इतर कुठेही बसू नये; मुंबई पोलिसांचे आंदोलकांना आवाहन
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
5
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
6
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
7
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
8
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
9
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
15
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
16
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
17
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
18
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
19
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
20
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार

बाबुपेठात विकासकामांचा पत्ताच नाही

By admin | Updated: January 22, 2015 00:54 IST

चंद्रपूर महानगरपालिका आपल्या सीमेचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी आजुबाजुच्या ग्रामपंचायतींना जोडण्याचा प्रस्तावही मनपाने तयार केला आहे.

रवी जवळे चंद्रपूर चंद्रपूर महानगरपालिका आपल्या सीमेचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी आजुबाजुच्या ग्रामपंचायतींना जोडण्याचा प्रस्तावही मनपाने तयार केला आहे. दुसरीकडे ज्या वस्त्या मनपा हद्दीत आहे, त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. तेथील समस्यांचा निपटाराच अद्याप महानगरपालिकेला करता आला नाही. बाबुपेठ प्रभागात तर विकासकामांचा पत्ताच नसल्याचे दिसून आले. एकदोन रस्त्यांचे अपवाद वगळले तर संपूर्ण प्रभागातच रस्त्यांची कामे प्रलंबित आहे.चंद्रपूर शहराच्या एका बाजुला असलेल्या बाबुपेठ परिसराकडे महानगरपालिकेचे अद्याप लक्षच गेले नसल्याचे दिसून येते. महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर विविध करांमध्ये वाढ करण्यात आली. एलबीटीसह विविध योजनांचा निधीही मनपाला प्राप्त होत आहे. असे असले तरी बाबुपेठ प्रभागाच्या विकासासाठी मनपा निधी देण्यात कुचराई तर करीत नाही ना, असा प्रश्न या प्रभागात फिरल्यानंतर उपस्थित होतो. लोकमत चमूने आज बुधवारी बाबुपेठ प्रभागात फेरफटका मारला असता अनेक समस्या दिसून आल्या. नागरिकांनीही पोटतिडकीने लोकमतजवळ आपल्या समस्या मांडल्या. बाबुपेठ प्रभाग शहरातील फार जुनी वस्ती आहे. अनेक वर्षांपूर्वी या वस्तीकडे पालिका प्रशासनाने फारसे लक्ष घातले नाही. त्यामुळे या वस्तीचा फारसा विकास तेव्हा झालेलाच नव्हता. त्यानंतर मधल्या काळात या परिसरात आणखी नागरी वस्ती वाढू लागली. तेव्हा नागरिकांची ओरड बघता या ठिकाणी रस्ते, नाली, पिण्याचे पाणी या सोई उपलब्ध करून देण्यात आल्या. आता पुन्हा या परिसराकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. शहरात सध्या रस्ते व नाल्यांची कामे जोमात सुरू आहे. मात्र बाबुपेठ प्रभागात चारदोन रस्त्यांचा अपवाद सोडला तर इतर सर्व रस्ते उखडलेले आहेत. यापूर्वी ज्या रस्त्यांचे डांबरीकरण झाले, त्या रस्त्यावर सध्या डांबराचा लवलेशही दिसत नाही. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. चंद्रशेखर आझाद चौक परिसरातील रस्त्यांची तर दैना झालेली दिसून आली. या चौकाच्या चारही बाजुचे रस्ते उखडलेले आहेत. चंद्रशेखर आझाद चौकाच्या फलकापासून थोडे पुढे गेल्यावर सिमेंट रस्ता दिसतो. अलिकडेच हा रस्ता बांधला असावा. मात्र या रस्त्यावरही आता सिमेंट उखडून खड्डे पडले आहेत. नागरिकांनी याबाबत अनेकदा येथील नगरसेवक हनुमान चौखे यांना सांगितले. मात्र त्यांनी याकडे लक्षच दिले नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. फुले चौक परिसरातही रस्त्यांची अशीच अवस्था आहे. विशेष म्हणजे, फुले चौक परिसरातील पथदिवे बंद असल्याचे नागरिकांचे सांगितले. त्यामुळे रात्री या ठिकाणी अंधाराचे साम्राज्य पसरले असते. बाबुपेठ प्रभागात नाल्यांची समस्याही रस्त्यांएवढीच भिषण आहे. सुमारे ३० वर्षांपूर्वी या ठिकाणी नाल्या बांधल्या आहेत. सद्यस्थितीत प्रभागातील बहुतांश नाल्या तुटलेल्या आहेत. नाल्यांचा रस्त्यांकडील काठ खचल्याने नाल्यातील सांडपाणी रस्त्यावर येते. काही ठिकाणी पालिकेने अतिशय लहान आणि निमुळत्या नाल्या बांधल्या आहेत. या नाल्यांना स्लोपही नाही. त्यामुळे सांडपाणी वाहत नाही. नाल्या लहान असल्याने प्लॅस्टिकसारखा कचरा नालीत गेला की नाली चौकअप होते. मनपाचे सफाई कर्मचारी तीनचार महिन्यातून एकदा येत असल्याने हा कचरा नालीत तसाच कायम असतो, असेही नागरिकांनी सांगितले. त्यामुळे दुर्गंधी पसरून डासांचा प्रादुर्भाव होत आहे. कचराकुंड्या कमी असल्याने रस्त्यावरच कचरा पडलेला असतो.