शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
8
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
9
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
10
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
11
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
12
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
13
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
14
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
15
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
16
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
17
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
18
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
19
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
20
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय

निर्माल्य संकलनासाठी ठेवलेल्या टँंकची चोरी

By admin | Updated: September 3, 2014 23:16 IST

गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात निर्माल्य भाविक नदी, तलावामध्ये टाकतात. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. सदर प्रदूषण टाळता यावे यासाठी निर्माल्य संकलनासाठी महानगरप्रशासन

चंद्रपूर : गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात निर्माल्य भाविक नदी, तलावामध्ये टाकतात. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. सदर प्रदूषण टाळता यावे यासाठी निर्माल्य संकलनासाठी महानगरप्रशासन तयारीला लागले आहे. यासाठी झोननुसार प्लॉस्टीक ड्रमही खरेदी करण्यात आले आहे. रामाळा तलावाशेजारी निर्माल्यासाठी ठेवण्यात आलेली टाकी चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार मंगळवारी रात्रीच्या सुमारात घडला. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.चंद्रपूरची ओळख प्रदूषित शहर अशी होत आहे. ही ओळख पुसून काढण्यासाठी तसेच आरोग्यासाठी प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविणे गरजेचे आहे. यासाठी नागरिकांनी आणि प्रशासनाचा पुढाकारही तेवढाच महत्त्वाचा आहे. चंद्रपुरात गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. हे टाळण्यासाठी महानगरपालिकेने काही प्रमाणात का होईना प्रयत्न सुरु केले आहे. नगरसेवक संजय वैद्य यांनी इरईनदीच्या पात्रामध्ये गणेश विसर्जन तसेच निर्माल्यदानासाठी पात्र खोल करण्याची सातत्याने मागणी धरून लावली. या मागणीनंतर महानगरपालिकेने इरईचे पात्र खोल करण्याची मोहीम आरंभली आहे. येथील इरई नदीच्या पात्राची स्वच्छता करून तेथे गणेश विसर्जनासाठी पात्र तयार केले आहे. सोबतच निर्माल्य टाकण्याची व्यवस्थाही केली आहे. मागील तीन दिवसांपासून जेसीबीच्या माध्यमातून पात्र खाल करण्याचे काम सुरु आहे. सदर कामावर आयुक्तांसह, नगरसेवक संजय वैद्य, पर्यावरण प्रेमी संस्था, जलबिलादरीसंस्थेचे कार्यकर्ते लक्ष ठेवून आहे. विशेष म्हणजे, बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी नदीपात्राची पाहणी केली. या पाहणीत त्यांनी आणखी काही उपाययोजना सुचविल्या आहे.निर्माल्यजमा करून ते पुरल्या जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात निर्माल्य न टाकता ड्रममध्ये टाकावे, अशी विनंती करण्यात आली आहे. मात्र आजही अनेक भाविक निर्माल्य ड्रममध्ये न टाकता ते नदीपात्रात टाकत असल्याने प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच काही चोरट्यांची नजर या ड्रमवर गेली आहे.रामाळा तलावाशेजारी ठेवलेली टँक चोरट्यांनी पळवून नेली. त्यामुळे मनपा प्रशासनही हतबल झाले आहे.आता मनपा वेगळी व्यवस्था करणार आहे. (नगर प्रतिनिधी)