शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

निर्माल्य संकलनासाठी ठेवलेल्या टँंकची चोरी

By admin | Updated: September 3, 2014 23:16 IST

गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात निर्माल्य भाविक नदी, तलावामध्ये टाकतात. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. सदर प्रदूषण टाळता यावे यासाठी निर्माल्य संकलनासाठी महानगरप्रशासन

चंद्रपूर : गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात निर्माल्य भाविक नदी, तलावामध्ये टाकतात. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. सदर प्रदूषण टाळता यावे यासाठी निर्माल्य संकलनासाठी महानगरप्रशासन तयारीला लागले आहे. यासाठी झोननुसार प्लॉस्टीक ड्रमही खरेदी करण्यात आले आहे. रामाळा तलावाशेजारी निर्माल्यासाठी ठेवण्यात आलेली टाकी चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार मंगळवारी रात्रीच्या सुमारात घडला. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.चंद्रपूरची ओळख प्रदूषित शहर अशी होत आहे. ही ओळख पुसून काढण्यासाठी तसेच आरोग्यासाठी प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविणे गरजेचे आहे. यासाठी नागरिकांनी आणि प्रशासनाचा पुढाकारही तेवढाच महत्त्वाचा आहे. चंद्रपुरात गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. हे टाळण्यासाठी महानगरपालिकेने काही प्रमाणात का होईना प्रयत्न सुरु केले आहे. नगरसेवक संजय वैद्य यांनी इरईनदीच्या पात्रामध्ये गणेश विसर्जन तसेच निर्माल्यदानासाठी पात्र खोल करण्याची सातत्याने मागणी धरून लावली. या मागणीनंतर महानगरपालिकेने इरईचे पात्र खोल करण्याची मोहीम आरंभली आहे. येथील इरई नदीच्या पात्राची स्वच्छता करून तेथे गणेश विसर्जनासाठी पात्र तयार केले आहे. सोबतच निर्माल्य टाकण्याची व्यवस्थाही केली आहे. मागील तीन दिवसांपासून जेसीबीच्या माध्यमातून पात्र खाल करण्याचे काम सुरु आहे. सदर कामावर आयुक्तांसह, नगरसेवक संजय वैद्य, पर्यावरण प्रेमी संस्था, जलबिलादरीसंस्थेचे कार्यकर्ते लक्ष ठेवून आहे. विशेष म्हणजे, बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी नदीपात्राची पाहणी केली. या पाहणीत त्यांनी आणखी काही उपाययोजना सुचविल्या आहे.निर्माल्यजमा करून ते पुरल्या जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात निर्माल्य न टाकता ड्रममध्ये टाकावे, अशी विनंती करण्यात आली आहे. मात्र आजही अनेक भाविक निर्माल्य ड्रममध्ये न टाकता ते नदीपात्रात टाकत असल्याने प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच काही चोरट्यांची नजर या ड्रमवर गेली आहे.रामाळा तलावाशेजारी ठेवलेली टँक चोरट्यांनी पळवून नेली. त्यामुळे मनपा प्रशासनही हतबल झाले आहे.आता मनपा वेगळी व्यवस्था करणार आहे. (नगर प्रतिनिधी)