शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

तुटपुंजा निधी वाट्याला येत असल्याने सरपंच नाराज

By साईनाथ कुचनकार | Updated: May 20, 2024 13:59 IST

Chandrapur : बदलता येत नाही आराखडा; बांधले ग्रामपंचायतीचे हात !

  • चंद्रपूर : संविधानातील २८० व्या कलमानुसार केंद्र शासनाने ग्रामपंचायतींना जादा अधिकार देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर डॉ. वाय. व्ही. रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली १४ व्या वित्त आयोगाची स्थापना २०१३ मध्ये केली. आयोगाने शासनाला सादर केलेल्या बहुतांश शिफारसी स्वीकारल्या आहेत. या शिफारसीनुसार राज्यातील स्थानिक संस्थांना पाच वर्षांत केंद्र शासनाकडून टप्प्याटप्याने सुमारे १५ हजार ३५ कोटींचे अनुदान ग्रामपंचायतींना देण्याचा दावा सरकारने केला. १३ व्या वित्त आयोगात ग्रामपंचायतींना ७० टक्के निधी देण्याचा निर्णय बदलवून १४ व्या वित्त आयोगात १०० टक्के केला. ही मोठी उपलब्धीच आहे; परंतु विकास आराखडा तयार करण्यापासून तर प्रत्यक्षात निधी पोहोचविण्याच्या प्रक्रियेपर्यंत अनेक जाचक अटींची पाचर मारून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या आशा-अपेक्षा पूर्ण करताना जिल्ह्यातील ८२७ ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांची दमछाक होत आहे. 

ग्रामपंचायतींना थेट अनुदान दिल्याने सरकारला राजकीय भांडवल करण्यासाठी नामी संधी मिळाली; पण एक हजार लोकसंख्येच्या आतील गावांना केवळ ४ लाख रुपये दिले जातात. त्यातील ५० टक्के रक्कम राखीव ठेवावा लागतो. त्यामुळे २ लाखांत कोणती विकासकामे करणार, असा प्रश्न सरपंच विचारत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्राकडून ११ वित्त आयोगाकडून मिळालेला १०० टक्के निधी जिल्हा परिषदेमार्फत खर्च करण्यात आला. १५ व्या वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषद व पंचायत समितीने प्रत्येकी २५ टक्के व ग्रामपंचायत ५० टक्के याप्रमाणे वर्ग करण्यात आला होता. १४ वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषद १० टक्के, पंचायत समिती २० टक्के तसेच ग्रामपंचायतीला ७० टक्के निधी मिळाला. या कालखंडात आराखड्यात बदल करण्याचे अधिकार होते; पण १६ व्या वित्त आयोगाने १०० टक्के निधी देऊनही विविध किचकट अटी टाकून सरपंचांनी कोंडी केली आहे.               

केंद्रीय वित्त आयोगाचे अनुदान थेट ग्रामपंचायतीलाच मिळत असल्याने जिल्हा परिषद सदस्यांपेक्षा गावचे सरपंच वरचढ ठरू शकतात, असे बोलले जाते. मात्र, गावाचे हित जोपासण्यासाठी गरजेनुसार विकास आराखडा बदलविता येत नाही, तर लोकसंख्या व क्षेत्रफळानुसार तुटपुंजा निधी वाट्याला येत असल्याने सरपंचांमध्ये बरीच अस्वस्थता आहे.

अशा आहेत अडचणीआराखडा बदलविता येत नाही. ग्रामसभेची मान्यता घेऊन तांत्रिक समितीने छाननी करूनही आराखडा बदलण्याची संधी मिळत नाही. नैसर्गिक आपत्तीसाठी तरतूद करता येत नाही. आयोगाकडून मिळणारा ई- ग्रामपंचायतीचा निधी केंद्र संचालकांना दिला जातो. लोकसंख्या व कमी क्षेत्रफळांच्या गावांना तुटपुंजा निधी मिळतो. बेसिक निधी खर्च करूनही प्रोत्साहन निधी मिळत नाही.

निधी असूनही हतबल आयोगाच्या शिफारसीनुसार ग्रामपंचायतींनी 'आमचा गाव आमचा विकास' (जीपीडीपी) हा आराखडा तयार केला. नैसर्गिक आपत्ती, जलसंकटासाठी या आराखड्यात तरतूद नाही. याकरिता निधी खर्च करू नका, असा आदेश अधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे ग्रामपंचायतीचे हात बांधले गेले. उन्हाळ्यात पाणीटंचाई निवारण्यासाठी काहीच करता येत नाही. ७३ व्या घटना दुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्याचे धोरण असताना अडथळे निर्माण करून ग्रामपंचायती खिळखिळ्ळ्या करणे सुरू आहे. ग्रामसेवक व पंचायत समित्या शासन आदेशाला बांधील, तर दुसरीकडे निधी असतानाही गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंचchandrapur-acचंद्रपूर