शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

तुटपुंजा निधी वाट्याला येत असल्याने सरपंच नाराज

By साईनाथ कुचनकार | Updated: May 20, 2024 13:59 IST

Chandrapur : बदलता येत नाही आराखडा; बांधले ग्रामपंचायतीचे हात !

  • चंद्रपूर : संविधानातील २८० व्या कलमानुसार केंद्र शासनाने ग्रामपंचायतींना जादा अधिकार देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर डॉ. वाय. व्ही. रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली १४ व्या वित्त आयोगाची स्थापना २०१३ मध्ये केली. आयोगाने शासनाला सादर केलेल्या बहुतांश शिफारसी स्वीकारल्या आहेत. या शिफारसीनुसार राज्यातील स्थानिक संस्थांना पाच वर्षांत केंद्र शासनाकडून टप्प्याटप्याने सुमारे १५ हजार ३५ कोटींचे अनुदान ग्रामपंचायतींना देण्याचा दावा सरकारने केला. १३ व्या वित्त आयोगात ग्रामपंचायतींना ७० टक्के निधी देण्याचा निर्णय बदलवून १४ व्या वित्त आयोगात १०० टक्के केला. ही मोठी उपलब्धीच आहे; परंतु विकास आराखडा तयार करण्यापासून तर प्रत्यक्षात निधी पोहोचविण्याच्या प्रक्रियेपर्यंत अनेक जाचक अटींची पाचर मारून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या आशा-अपेक्षा पूर्ण करताना जिल्ह्यातील ८२७ ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांची दमछाक होत आहे. 

ग्रामपंचायतींना थेट अनुदान दिल्याने सरकारला राजकीय भांडवल करण्यासाठी नामी संधी मिळाली; पण एक हजार लोकसंख्येच्या आतील गावांना केवळ ४ लाख रुपये दिले जातात. त्यातील ५० टक्के रक्कम राखीव ठेवावा लागतो. त्यामुळे २ लाखांत कोणती विकासकामे करणार, असा प्रश्न सरपंच विचारत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्राकडून ११ वित्त आयोगाकडून मिळालेला १०० टक्के निधी जिल्हा परिषदेमार्फत खर्च करण्यात आला. १५ व्या वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषद व पंचायत समितीने प्रत्येकी २५ टक्के व ग्रामपंचायत ५० टक्के याप्रमाणे वर्ग करण्यात आला होता. १४ वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषद १० टक्के, पंचायत समिती २० टक्के तसेच ग्रामपंचायतीला ७० टक्के निधी मिळाला. या कालखंडात आराखड्यात बदल करण्याचे अधिकार होते; पण १६ व्या वित्त आयोगाने १०० टक्के निधी देऊनही विविध किचकट अटी टाकून सरपंचांनी कोंडी केली आहे.               

केंद्रीय वित्त आयोगाचे अनुदान थेट ग्रामपंचायतीलाच मिळत असल्याने जिल्हा परिषद सदस्यांपेक्षा गावचे सरपंच वरचढ ठरू शकतात, असे बोलले जाते. मात्र, गावाचे हित जोपासण्यासाठी गरजेनुसार विकास आराखडा बदलविता येत नाही, तर लोकसंख्या व क्षेत्रफळानुसार तुटपुंजा निधी वाट्याला येत असल्याने सरपंचांमध्ये बरीच अस्वस्थता आहे.

अशा आहेत अडचणीआराखडा बदलविता येत नाही. ग्रामसभेची मान्यता घेऊन तांत्रिक समितीने छाननी करूनही आराखडा बदलण्याची संधी मिळत नाही. नैसर्गिक आपत्तीसाठी तरतूद करता येत नाही. आयोगाकडून मिळणारा ई- ग्रामपंचायतीचा निधी केंद्र संचालकांना दिला जातो. लोकसंख्या व कमी क्षेत्रफळांच्या गावांना तुटपुंजा निधी मिळतो. बेसिक निधी खर्च करूनही प्रोत्साहन निधी मिळत नाही.

निधी असूनही हतबल आयोगाच्या शिफारसीनुसार ग्रामपंचायतींनी 'आमचा गाव आमचा विकास' (जीपीडीपी) हा आराखडा तयार केला. नैसर्गिक आपत्ती, जलसंकटासाठी या आराखड्यात तरतूद नाही. याकरिता निधी खर्च करू नका, असा आदेश अधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे ग्रामपंचायतीचे हात बांधले गेले. उन्हाळ्यात पाणीटंचाई निवारण्यासाठी काहीच करता येत नाही. ७३ व्या घटना दुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्याचे धोरण असताना अडथळे निर्माण करून ग्रामपंचायती खिळखिळ्ळ्या करणे सुरू आहे. ग्रामसेवक व पंचायत समित्या शासन आदेशाला बांधील, तर दुसरीकडे निधी असतानाही गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंचchandrapur-acचंद्रपूर