शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

ठाण्यातील दूरध्वनी बनले शोभेची वस्तू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:29 IST

चिमूर : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह जिल्ह्यात कुठेही आणि कोणतीही घटना घडली, तर सर्वात आधी ठाण्यातील टेलिफोन क्रमांकावर ...

चिमूर : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह जिल्ह्यात कुठेही आणि कोणतीही घटना घडली, तर सर्वात आधी ठाण्यातील टेलिफोन क्रमांकावर फोन करून माहिती दिली जाते, परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील ३५ पैकी अनेक पोलीस ठाण्यातील टेलिफोन बंद अवस्थेत असल्याने, नागरिकांना ठाण्यापर्यंत माहिती पोहोचविणे कठीण जात आहे. हे टेलिफोन नेमके कशामुळे बंद झाले की, बंद केले, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

जिल्ह्यात चंद्रपूर येथे रामनगर व शहर ठाणे स्वतंत्र आहेत. त्याचबरोबर, पडोली, घुग्घुस, राजुरा, गडचांदूर, कोरपना, जिवती, ढाबा, गोंडपिपरी, पोंभुर्णा, बल्लारपूर, मूल, सावली, सिंदेवाही, पाथरी, ब्रह्मपुरी, नागभीड, भद्रावती, वरोरा, मांजरी, शेगाव, चिमूर व भिसी व उपपोलीस ठाणे मिळून जिल्ह्यात एकूण ३५ पोलीस ठाणे कार्यरत आहेत. पोलीस प्रशासनाकडून पूर्वीपासूनच जिल्ह्यातील ३५ ठाण्यात भारतीय दूर संचार निगमचे टेलिफोनचा वापर केल्या जातो. जिल्ह्यात घडणाऱ्या घटनांची माहिती तत्काळ पोलीस प्रशासनास मिळावी, यासाठी टेलिफोन महत्त्वपूर्ण मानल्या जातो. येथील बहुतांश पोलीस ठाण्यातील टेलिफोन बंदच असल्याने, ग्रामीण भागात कार्यरत असलेले पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्षासह नागरिकांना माहिती देणे कठीण झाले आहे. सध्या दूरध्वनीचा वापर वाढला असला, तरी टेलिफोनचे महत्त्व अजूनही तेवढेच आहे. अनेक वेळा दूरध्वनीला तांत्रिक अडचण, नेटवर्कचा अडसर येतो. त्यामुळे ठाण्यात टेलिफोन कार्यान्वित असणे अत्यावश्यक आहे, परंतु पोलीस विभागाने या यंत्रणेकडे सातत्याने कानाडोळा केल्याचे दिसून येते.

बॉक्स

कोरोनात पोलिसांची भूमिका महत्त्वाची

जिल्ह्यात मागील पंधरवड्यापासून कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. अशा काळात आरोग्य यंत्रणेसह पोलीस यंत्रणाही तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. या काळात नागरिकांच्या सुरक्षितेची जबाबदारी वाढली आहे. ही जबाबदारी पोलिस यंत्रणा समर्थपणे पेलत आहे. ग्रामीण भागातून ठाण्यात माहिती मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा पाऊल उचलते. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील सर्व ३५ पोलीस ठाण्यापैकी बरेच बंद असलेल्या ठाण्याचे टेलिफोन सुरू होणे अत्यावश्यक झाले आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.