शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
4
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
5
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
6
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
7
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
8
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
9
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
10
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
11
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
12
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
13
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
15
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
16
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
17
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
18
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
19
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
20
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती

ठाण्यातील दूरध्वनी बनले शोभेची वस्तू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:29 IST

चिमूर : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह जिल्ह्यात कुठेही आणि कोणतीही घटना घडली, तर सर्वात आधी ठाण्यातील टेलिफोन क्रमांकावर ...

चिमूर : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह जिल्ह्यात कुठेही आणि कोणतीही घटना घडली, तर सर्वात आधी ठाण्यातील टेलिफोन क्रमांकावर फोन करून माहिती दिली जाते, परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील ३५ पैकी अनेक पोलीस ठाण्यातील टेलिफोन बंद अवस्थेत असल्याने, नागरिकांना ठाण्यापर्यंत माहिती पोहोचविणे कठीण जात आहे. हे टेलिफोन नेमके कशामुळे बंद झाले की, बंद केले, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

जिल्ह्यात चंद्रपूर येथे रामनगर व शहर ठाणे स्वतंत्र आहेत. त्याचबरोबर, पडोली, घुग्घुस, राजुरा, गडचांदूर, कोरपना, जिवती, ढाबा, गोंडपिपरी, पोंभुर्णा, बल्लारपूर, मूल, सावली, सिंदेवाही, पाथरी, ब्रह्मपुरी, नागभीड, भद्रावती, वरोरा, मांजरी, शेगाव, चिमूर व भिसी व उपपोलीस ठाणे मिळून जिल्ह्यात एकूण ३५ पोलीस ठाणे कार्यरत आहेत. पोलीस प्रशासनाकडून पूर्वीपासूनच जिल्ह्यातील ३५ ठाण्यात भारतीय दूर संचार निगमचे टेलिफोनचा वापर केल्या जातो. जिल्ह्यात घडणाऱ्या घटनांची माहिती तत्काळ पोलीस प्रशासनास मिळावी, यासाठी टेलिफोन महत्त्वपूर्ण मानल्या जातो. येथील बहुतांश पोलीस ठाण्यातील टेलिफोन बंदच असल्याने, ग्रामीण भागात कार्यरत असलेले पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्षासह नागरिकांना माहिती देणे कठीण झाले आहे. सध्या दूरध्वनीचा वापर वाढला असला, तरी टेलिफोनचे महत्त्व अजूनही तेवढेच आहे. अनेक वेळा दूरध्वनीला तांत्रिक अडचण, नेटवर्कचा अडसर येतो. त्यामुळे ठाण्यात टेलिफोन कार्यान्वित असणे अत्यावश्यक आहे, परंतु पोलीस विभागाने या यंत्रणेकडे सातत्याने कानाडोळा केल्याचे दिसून येते.

बॉक्स

कोरोनात पोलिसांची भूमिका महत्त्वाची

जिल्ह्यात मागील पंधरवड्यापासून कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. अशा काळात आरोग्य यंत्रणेसह पोलीस यंत्रणाही तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. या काळात नागरिकांच्या सुरक्षितेची जबाबदारी वाढली आहे. ही जबाबदारी पोलिस यंत्रणा समर्थपणे पेलत आहे. ग्रामीण भागातून ठाण्यात माहिती मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा पाऊल उचलते. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील सर्व ३५ पोलीस ठाण्यापैकी बरेच बंद असलेल्या ठाण्याचे टेलिफोन सुरू होणे अत्यावश्यक झाले आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.