शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

ठाण्यातील दूरध्वनी बनले शोभेची वस्तू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:29 IST

चिमूर : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह जिल्ह्यात कुठेही आणि कोणतीही घटना घडली, तर सर्वात आधी ठाण्यातील टेलिफोन क्रमांकावर ...

चिमूर : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह जिल्ह्यात कुठेही आणि कोणतीही घटना घडली, तर सर्वात आधी ठाण्यातील टेलिफोन क्रमांकावर फोन करून माहिती दिली जाते, परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील ३५ पैकी अनेक पोलीस ठाण्यातील टेलिफोन बंद अवस्थेत असल्याने, नागरिकांना ठाण्यापर्यंत माहिती पोहोचविणे कठीण जात आहे. हे टेलिफोन नेमके कशामुळे बंद झाले की, बंद केले, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

जिल्ह्यात चंद्रपूर येथे रामनगर व शहर ठाणे स्वतंत्र आहेत. त्याचबरोबर, पडोली, घुग्घुस, राजुरा, गडचांदूर, कोरपना, जिवती, ढाबा, गोंडपिपरी, पोंभुर्णा, बल्लारपूर, मूल, सावली, सिंदेवाही, पाथरी, ब्रह्मपुरी, नागभीड, भद्रावती, वरोरा, मांजरी, शेगाव, चिमूर व भिसी व उपपोलीस ठाणे मिळून जिल्ह्यात एकूण ३५ पोलीस ठाणे कार्यरत आहेत. पोलीस प्रशासनाकडून पूर्वीपासूनच जिल्ह्यातील ३५ ठाण्यात भारतीय दूर संचार निगमचे टेलिफोनचा वापर केल्या जातो. जिल्ह्यात घडणाऱ्या घटनांची माहिती तत्काळ पोलीस प्रशासनास मिळावी, यासाठी टेलिफोन महत्त्वपूर्ण मानल्या जातो. येथील बहुतांश पोलीस ठाण्यातील टेलिफोन बंदच असल्याने, ग्रामीण भागात कार्यरत असलेले पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्षासह नागरिकांना माहिती देणे कठीण झाले आहे. सध्या दूरध्वनीचा वापर वाढला असला, तरी टेलिफोनचे महत्त्व अजूनही तेवढेच आहे. अनेक वेळा दूरध्वनीला तांत्रिक अडचण, नेटवर्कचा अडसर येतो. त्यामुळे ठाण्यात टेलिफोन कार्यान्वित असणे अत्यावश्यक आहे, परंतु पोलीस विभागाने या यंत्रणेकडे सातत्याने कानाडोळा केल्याचे दिसून येते.

बॉक्स

कोरोनात पोलिसांची भूमिका महत्त्वाची

जिल्ह्यात मागील पंधरवड्यापासून कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. अशा काळात आरोग्य यंत्रणेसह पोलीस यंत्रणाही तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. या काळात नागरिकांच्या सुरक्षितेची जबाबदारी वाढली आहे. ही जबाबदारी पोलिस यंत्रणा समर्थपणे पेलत आहे. ग्रामीण भागातून ठाण्यात माहिती मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा पाऊल उचलते. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील सर्व ३५ पोलीस ठाण्यापैकी बरेच बंद असलेल्या ठाण्याचे टेलिफोन सुरू होणे अत्यावश्यक झाले आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.